शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

सदरबझारमधील ‘बंड्या’ बनलाय स्वच्छतादूत! अविरत सेवा : प्रामाणिकपणाचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 23:36 IST

उन्हाळा असो की पावसाळा नागरिकांनी हाक दिली की तो हाती खोरं अन् पाटी घेऊन लगेचच कामाला धावतो. नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी त्याची सतत धडपड सुरू असते.

ठळक मुद्देकामाचे अनेकांना कुतूहल

सातारा : उन्हाळा असो की पावसाळा नागरिकांनी हाक दिली की तो हाती खोरं अन् पाटी घेऊन लगेचच कामाला धावतो. नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी त्याची सतत धडपड सुरू असते. नागरिकांना स्वच्छतेचं महत्त्वं पटवून देणाऱ्या या ‘बंड्या’च्या प्रामाणिकपणाचे नागरिक भरभरून कौतुक करतात. आता तर त्याला ‘स्वच्छतादूत’ म्हणूनच ओळखले जात आहे.

सदरबझारमध्ये पालिकेच्या आरोग्य कर्मचाºयांबरोबर ठेका पद्धतीने काम करणारा हा बंड्या स्वभावाने भोळा-भाबडा आहे. समोर आलेलं काम प्रामाणिकपणे मार्गी लावण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्न असतो. अनेकदा काही कर्मचाºयांकडून काम करण्यास टाळाटाळ केली जाते. मात्र, बंड्या याला अपवाद ठरत आहे.गेल्या सात वर्षांपासून बंड्या ठेका पद्धतीने पालिकेत स्वच्छता विभागात काम करत आहे. त्याच्या घरीदेखील कोणीच नसल्याने त्याला पालिकेत काम मिळवूनदेण्यासाठी काही नागरिकांनी प्रयत्न केला होता. मध्यंतरी त्याला ठेक्यावरून कमी करण्यात आले होते. त्यावेळी येथील स्वच्छतेवर परिणाम जाणवू लागल्याने एका अधिकाºयाने पुन्हा त्याला ठेका पद्धतीने कामावर घेतले.

स्वच्छतागृह, गटार, मरून पडलेली जनावरे, डुक्कर उचलण्याची कामे करण्यासाठी बºयाचदा आरोग्य विभागाचे कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. हे कामही शक्यतो बंड्याच मार्गी लागवत असल्याचे नागरिकांनी सांगितले. स्वच्छतेचा दूत बनलेला बंड्या आजही गटारातील घाण डोक्यावरून वाहून नेत असतो. त्याच्याकडे आरोग्याच्या दृष्टीने कोणतेच सुरक्षेचे साहित्य नाही. तरी देखील सांगेल ती तो कामे करतो. त्यामुळे ‘बंड्या’तील स्वच्छतादूताचे सर्वांनाच कुतूहल वाटते.

जबाबदारीने कामे पूर्णअनेक वेळा कुत्री, डुकरे मरून पडलेली असतात. दुर्गंधीमुळे नागरिक नगरसेवकांनी वारंवार फोन लावून जनावरे उचलण्याची मागणी करत असतात. मात्र, आरोग्य कर्मचारी इतरत्र कामावर आहे, असे सांगितले जाते. त्यावेळी बंड्यालाच हे मृत जनावरे उचलण्याची जबाबदारी दिली जाते.

 

आमच्या परिसरात अनेकदा बंड्याच स्वच्छता करण्यासाठी येत असतो. त्याला सांगितलेली स्वच्छता तो लगेच करतो. त्यामुळे आमचा परिसर स्वच्छ राहत आहे.- निलोफर शेख, गृहिणी

 

टॅग्स :SangliसांगलीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान