शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

बंबाचे पाणी तोंडाने ओढणे जिवावर बेतले

By admin | Updated: February 12, 2015 00:39 IST

कवठे येथील घटना : लग्नाच्या वाढदिवशीच दुर्घटनेने गुरव कुटुंबात हळहळ

कवठे : लग्नाच्या वाढदिवशी घरगुती अपघातात प्राण गमवावे लागण्याचे दुर्दैव येथील विजय नरहरी क्षीरसागर (गुरव) (वय ३८, रा. कवठे, ता. वाई) यांच्या वाट्याला आले. पाणी तापवत असताना वाफ आणि गरम पाणी तोंडावाटे श्वासनलिकेत जाऊन त्यांचा मृत्यू झाला.याबाबत माहिती अशी : आज सकाळी विजय गुरव हे पहाटे उठून घरासमोर कॉईल असलेला पाण्याचा बंब पेटविण्याचा प्रयत्न करीत होते. या बंबात कॉईलच्या वरच्या भागात कागद पेटते ठेवले असता आतून पाणी फिरवले की लगेचच तापलेले पाणी खालील बाजूने बाहेर येते. तथापि, पाणी बाहेर येईना, हे लक्षात आल्यावर त्यांनी बंबाच्या खालील बाजूस रबरी पाईपचा छोटासा तुकडा जोडला व तोंडाने हवा ओढण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी पाईपमध्ये अडकलेला कचरा निघाला व वाफेसह गरम पाणी जोराने क्षीरसागर यांच्या तोंडात गेले. त्यामुळे त्यांच्या श्वासनलिकेला इजा झाली.विशेष म्हणजे, हा प्रकार घडल्यानंतर ते स्वत: आपल्या चारचाकी वाहनाने वाई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्यास गेले; परंतु श्वासनलिकेला आतून झालेली इजा एवढी वाढली की त्यांना श्वास घेणे अशक्य झाले व उपचार सुरु होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. ते वाई येथील एका पतसंस्थेत काम करीत होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने कवठे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)