शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

बळीराजा बनतोय ‘गुंठे-पाटील’

By admin | Updated: December 29, 2014 00:04 IST

खंडाळा, शिरवळ पाठोपाठ सुरुरही : शेती करण्यापेक्षा जागा विकण्याच्या मानसिकतेत वाढ

कवठे : औद्योगिकीकरणामुळे जमिनीच्या किमतीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शेती करण्यापेक्षा जमिनी विकण्याची मानसिकता वाढीस लागली आहे. त्यामुळे बळीराजा आता ‘गुंठेपाटील’ बनायला लागला आहे. खंडाळा तालुका एकेकाळी ओसाड म्हणून ओळखला जायचा. नगदी पिकेही घेता येत नव्हती. यामुळेच खंडाळा तालुक्यातील शेतकरी शेती करायचा नाद सोडून विकण्याची भाषा करू लागला. औद्योगिकीकरणामुळे जमिनीच्या किमती झपाट्याने वाढू लागल्या, तर दुसरीकडे शेतीसाठी धोम धरण कालव्याचे पाणी शिवारातील ओढ्या-नाल्यातून खळखळण्याची चिन्हे दिसू लागली आहे. पैशांच्या लोभापायी खंडाळा तालुक्यातील शेतकरी जमीन विकू लागला. अठराविश्व दारिद्र्यातून बाहेर आल्याने इतका बक्कळ पैसा एकदम पहिला आणि त्याला श्रीमंती चोचले पुरवावी वाटू लागले. त्यातून अनेकांच्या घरासमोर चारचाकी वाहने दिसायला लागली आहेत. पैशांमुळे व्यसनाधीनतेकडे वळालेले जमिनी विकू लागले आहेत. जमिनी संपल्या की, ‘विक गुंठा’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यावरूनच त्यांना ‘गुंठेपाटील’ हे नाव रुढ झाले. याचाच दुष्परिणाम म्हणून काही शेतकऱ्यांना सर्वस्व गमावून आपल्याच विकलेल्या जमिनीच्या तुकड्यावर रखवालदारी करण्याची वेळ नियतीने आणली. धोम कालव्याच्या खंडाळा भागातील पाण्याने शेतकरी वर्गाला शेती करावीशी वाटतेय, तर काही भागांत विकायला शेती उपलब्धच नाही. त्यामुळे शेतजमीन खरेदीविक्री करण्याऱ्या एजंटांचे डोळे या भागावरून हटले आणि आता वाई तालुक्यातील सुरुर, कवठे परिसरातील शेतीवर स्थिरावू लागली आहे. या भागातील शेतकऱ्यांना खंडाळा परिसरातील बक्कळ पैसा दिसू लागलाय आणि या भागातील शेतकरीही खुशीने शेती विकायला लागला आहे. सुरुरपासून वाईपर्यंत रस्त्यालगतच्या बहुतांश जमिनीची मालकी शेतकऱ्यांची न राहता पुणेरी बिगर शेतकऱ्यांची झाली आहे. सुरूर-कवठे परिसरातील शेतकरी दुचाकी, चारचाकी वाहनांतून फिरत आहे. याला शेतकऱ्यांएवढेच श्रीमंतीचे स्वप्न दाखविणारे एजंटही जबाबदार आहेत. (वार्ताहर) कवठे परिसरातील डोंगरावर पवनचक्क्या बसवल्याने रानडुकरे व अन्य प्राणी खाली डोंगर सोडून डोंगरालगतच्या शेतीत वावरून पिकांची नासाडी करू लागलेत. त्यामुळे उत्पन्न सापडत नाही व मुबलक दर मिळत असल्याने येथील शेतकरीही शेताची विक्री करण्याकडे वळत आहे. तसेच वाई-सुरुर रस्त्यालगतची शेतीही मुरमाड असल्याने शेती पिकत नाही व ज्यादा दर मिळत असल्याने तीही विकली जात आहे. यात मात्र प्रत्येक गावातील जमिनीवर ‘शहरी मालक’ कुंपण घालून पडीक शेतजमीन राखताना दिसत आहेत.