शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

बळीराजा बनतोय ‘गुंठे-पाटील’

By admin | Updated: December 29, 2014 00:04 IST

खंडाळा, शिरवळ पाठोपाठ सुरुरही : शेती करण्यापेक्षा जागा विकण्याच्या मानसिकतेत वाढ

कवठे : औद्योगिकीकरणामुळे जमिनीच्या किमतीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शेती करण्यापेक्षा जमिनी विकण्याची मानसिकता वाढीस लागली आहे. त्यामुळे बळीराजा आता ‘गुंठेपाटील’ बनायला लागला आहे. खंडाळा तालुका एकेकाळी ओसाड म्हणून ओळखला जायचा. नगदी पिकेही घेता येत नव्हती. यामुळेच खंडाळा तालुक्यातील शेतकरी शेती करायचा नाद सोडून विकण्याची भाषा करू लागला. औद्योगिकीकरणामुळे जमिनीच्या किमती झपाट्याने वाढू लागल्या, तर दुसरीकडे शेतीसाठी धोम धरण कालव्याचे पाणी शिवारातील ओढ्या-नाल्यातून खळखळण्याची चिन्हे दिसू लागली आहे. पैशांच्या लोभापायी खंडाळा तालुक्यातील शेतकरी जमीन विकू लागला. अठराविश्व दारिद्र्यातून बाहेर आल्याने इतका बक्कळ पैसा एकदम पहिला आणि त्याला श्रीमंती चोचले पुरवावी वाटू लागले. त्यातून अनेकांच्या घरासमोर चारचाकी वाहने दिसायला लागली आहेत. पैशांमुळे व्यसनाधीनतेकडे वळालेले जमिनी विकू लागले आहेत. जमिनी संपल्या की, ‘विक गुंठा’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यावरूनच त्यांना ‘गुंठेपाटील’ हे नाव रुढ झाले. याचाच दुष्परिणाम म्हणून काही शेतकऱ्यांना सर्वस्व गमावून आपल्याच विकलेल्या जमिनीच्या तुकड्यावर रखवालदारी करण्याची वेळ नियतीने आणली. धोम कालव्याच्या खंडाळा भागातील पाण्याने शेतकरी वर्गाला शेती करावीशी वाटतेय, तर काही भागांत विकायला शेती उपलब्धच नाही. त्यामुळे शेतजमीन खरेदीविक्री करण्याऱ्या एजंटांचे डोळे या भागावरून हटले आणि आता वाई तालुक्यातील सुरुर, कवठे परिसरातील शेतीवर स्थिरावू लागली आहे. या भागातील शेतकऱ्यांना खंडाळा परिसरातील बक्कळ पैसा दिसू लागलाय आणि या भागातील शेतकरीही खुशीने शेती विकायला लागला आहे. सुरुरपासून वाईपर्यंत रस्त्यालगतच्या बहुतांश जमिनीची मालकी शेतकऱ्यांची न राहता पुणेरी बिगर शेतकऱ्यांची झाली आहे. सुरूर-कवठे परिसरातील शेतकरी दुचाकी, चारचाकी वाहनांतून फिरत आहे. याला शेतकऱ्यांएवढेच श्रीमंतीचे स्वप्न दाखविणारे एजंटही जबाबदार आहेत. (वार्ताहर) कवठे परिसरातील डोंगरावर पवनचक्क्या बसवल्याने रानडुकरे व अन्य प्राणी खाली डोंगर सोडून डोंगरालगतच्या शेतीत वावरून पिकांची नासाडी करू लागलेत. त्यामुळे उत्पन्न सापडत नाही व मुबलक दर मिळत असल्याने येथील शेतकरीही शेताची विक्री करण्याकडे वळत आहे. तसेच वाई-सुरुर रस्त्यालगतची शेतीही मुरमाड असल्याने शेती पिकत नाही व ज्यादा दर मिळत असल्याने तीही विकली जात आहे. यात मात्र प्रत्येक गावातील जमिनीवर ‘शहरी मालक’ कुंपण घालून पडीक शेतजमीन राखताना दिसत आहेत.