शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा बनतोय ‘गुंठे-पाटील’

By admin | Updated: December 29, 2014 00:04 IST

खंडाळा, शिरवळ पाठोपाठ सुरुरही : शेती करण्यापेक्षा जागा विकण्याच्या मानसिकतेत वाढ

कवठे : औद्योगिकीकरणामुळे जमिनीच्या किमतीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शेती करण्यापेक्षा जमिनी विकण्याची मानसिकता वाढीस लागली आहे. त्यामुळे बळीराजा आता ‘गुंठेपाटील’ बनायला लागला आहे. खंडाळा तालुका एकेकाळी ओसाड म्हणून ओळखला जायचा. नगदी पिकेही घेता येत नव्हती. यामुळेच खंडाळा तालुक्यातील शेतकरी शेती करायचा नाद सोडून विकण्याची भाषा करू लागला. औद्योगिकीकरणामुळे जमिनीच्या किमती झपाट्याने वाढू लागल्या, तर दुसरीकडे शेतीसाठी धोम धरण कालव्याचे पाणी शिवारातील ओढ्या-नाल्यातून खळखळण्याची चिन्हे दिसू लागली आहे. पैशांच्या लोभापायी खंडाळा तालुक्यातील शेतकरी जमीन विकू लागला. अठराविश्व दारिद्र्यातून बाहेर आल्याने इतका बक्कळ पैसा एकदम पहिला आणि त्याला श्रीमंती चोचले पुरवावी वाटू लागले. त्यातून अनेकांच्या घरासमोर चारचाकी वाहने दिसायला लागली आहेत. पैशांमुळे व्यसनाधीनतेकडे वळालेले जमिनी विकू लागले आहेत. जमिनी संपल्या की, ‘विक गुंठा’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यावरूनच त्यांना ‘गुंठेपाटील’ हे नाव रुढ झाले. याचाच दुष्परिणाम म्हणून काही शेतकऱ्यांना सर्वस्व गमावून आपल्याच विकलेल्या जमिनीच्या तुकड्यावर रखवालदारी करण्याची वेळ नियतीने आणली. धोम कालव्याच्या खंडाळा भागातील पाण्याने शेतकरी वर्गाला शेती करावीशी वाटतेय, तर काही भागांत विकायला शेती उपलब्धच नाही. त्यामुळे शेतजमीन खरेदीविक्री करण्याऱ्या एजंटांचे डोळे या भागावरून हटले आणि आता वाई तालुक्यातील सुरुर, कवठे परिसरातील शेतीवर स्थिरावू लागली आहे. या भागातील शेतकऱ्यांना खंडाळा परिसरातील बक्कळ पैसा दिसू लागलाय आणि या भागातील शेतकरीही खुशीने शेती विकायला लागला आहे. सुरुरपासून वाईपर्यंत रस्त्यालगतच्या बहुतांश जमिनीची मालकी शेतकऱ्यांची न राहता पुणेरी बिगर शेतकऱ्यांची झाली आहे. सुरूर-कवठे परिसरातील शेतकरी दुचाकी, चारचाकी वाहनांतून फिरत आहे. याला शेतकऱ्यांएवढेच श्रीमंतीचे स्वप्न दाखविणारे एजंटही जबाबदार आहेत. (वार्ताहर) कवठे परिसरातील डोंगरावर पवनचक्क्या बसवल्याने रानडुकरे व अन्य प्राणी खाली डोंगर सोडून डोंगरालगतच्या शेतीत वावरून पिकांची नासाडी करू लागलेत. त्यामुळे उत्पन्न सापडत नाही व मुबलक दर मिळत असल्याने येथील शेतकरीही शेताची विक्री करण्याकडे वळत आहे. तसेच वाई-सुरुर रस्त्यालगतची शेतीही मुरमाड असल्याने शेती पिकत नाही व ज्यादा दर मिळत असल्याने तीही विकली जात आहे. यात मात्र प्रत्येक गावातील जमिनीवर ‘शहरी मालक’ कुंपण घालून पडीक शेतजमीन राखताना दिसत आहेत.