शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

बलकवडी म्हणजे... आओ जाओ घर तुम्हारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाई : वाई तालुक्यासह फलटण, खंडाळा तालुक्यांना पाणीपुरवठा करणारे बलकवडी धरण सध्या विविध समस्येच्या गर्तेत अडकले आहे. धरणाच्या सुरक्षेविषयीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धरणावर कसलीही सुरक्षा नसल्याने प्रेमीयुगलांसह मद्यपींचा वावर वाढला असून ‘आओ-जाओ घर तुम्हारा’ असे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.बलकवडी धरणाच्या मुख्य भिंतीवरच झाडा-झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाई : वाई तालुक्यासह फलटण, खंडाळा तालुक्यांना पाणीपुरवठा करणारे बलकवडी धरण सध्या विविध समस्येच्या गर्तेत अडकले आहे. धरणाच्या सुरक्षेविषयीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. धरणावर कसलीही सुरक्षा नसल्याने प्रेमीयुगलांसह मद्यपींचा वावर वाढला असून ‘आओ-जाओ घर तुम्हारा’ असे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.बलकवडी धरणाच्या मुख्य भिंतीवरच झाडा-झुडपांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे धरणाच्या बांधकामालाच धोका पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सुरक्षा राम भरोसे असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. वाढलेली झाडे मद्यपी तसेु प्रेमीयुगुलांचा आश्रय बनली आहेत. त्यामुळे बलकवडी धरण परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.बलकवडी धरणाच्या उभारणीसाठी कोट्यवधी निधी खर्च करण्यात आला आहे. वाई तालुक्याची जिव्हाळ्याची असणारी ‘जललक्ष्मी’ योजना याच धरणावर आहे. हजारो हेक्टर जमीन या योजनेच्या पाण्यावर भिजते. या भागातील अनेकांनी धरणासाठी आपल्या जमिनी देऊन स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवले आहे. नागरिकांच्या त्यागामुळेच धरण परिसराचा कायापालट झाला आहे. ही बाब पाटबंधारे विभाग गांभीर्याने घेत नसल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. धरणाच्या सुरक्षिततेबाबत पाटबंधारे विभागाला अनेकदा सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र, या विभागाच्या दुर्लक्षामुळे धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.सध्या दिवाळीची सुटी पडल्याने धरण परिसराला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. अनेक पर्यटक थेट धरणाच्या भिंतीवर जाऊन फोटोसेशन करताना दिसत आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने पर्यटकांना अडविणारे कोणीही नाही. याचा फायदा घेऊन पर्यटक संपूर्ण धरणावर बिनधास्तपणे वावरत आहेत. त्यामुळे दुर्दैवाने एखादी घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, हाही प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित होत आहे.धरणाच्या मुख्य भिंतीवरच झाडे उगविल्याने भिंतीवरील माती वाहून गेल्याने दगडाच्या बांधकामाला धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक धरणाची सुरक्षा धरणावर झाडे उगविल्याने धोक्यात आली आहे. अनेक धरणांना झाडाझुडपांमुळे गळती लागून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. अशी अनेक उदाहरणे समोर असताना बलकवडी धरणाच्या सुरक्षेकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. पाटबंधारे विभागाच्या वतीने भिंतीवरील झुडपे तातडीने काढावी तसेच याठिकाणी कायमस्वरूपी सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.झाडाझुडपात बाटल्यांचा खच...धरण परिसरात मद्यपींचा वावर वाढला असून हे चित्र दररोज पहावयास मिळते. या ठिकारी झाडाझुडपात दारूच्या बाटल्यांचा खच साचला असून बाटल्यांचे प्रमाण दररोज वाढतच चालले आहे. त्यामुळे धरण परिसरात घाणीचे साम्राज्य पसरत चालले आहे. या धरणाच्या सुरक्षेविषयी अनेकवेळा आवाज उठवूनही पाटबंधारे विभाग याकडे गांभिर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. मद्यपींचा बंदोबस्त करण्यासाठी पाटंबधारे विभागाने पोलिस प्रशासनाच्या मदतीने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी येथील नागरिकांच्या वतीने केली जात आहे.