शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

बफर झोनच्या अटी मागे घ्या!

By admin | Updated: August 26, 2015 22:40 IST

विक्रमसिंह पाटणकर कडाडले : चाळीस हजार लोकांसाठी लावलेले जाचक कायदे हटवा

पाटण : ‘कोयना व चांदोली अभयारण्यांलगतच्या बफर झोन क्षेत्रात शासनाकडून जाचक अटी लावण्यात आल्या आहेत. अशा अटी मोघलांच्या व इंग्रजांच्या काळातही नव्हत्या. ९६ गावांतील ४० हजार लोकांना देशाचे नागरिक असल्यासारखे राहू द्या. इंग्रज व मोघलांसारखे जाचक कायदे मागे घ्या. जनतेवर अन्याय केल्यास जनता पेटून उठेल,’ असे मत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी व्यक्त केले. पाटण येथील शिक्का मॅन्शन या त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाटणकर म्हणाले, ‘बफर झोनमध्ये वन्य प्राण्यांच्या शिकारीवर बंदी जरूर असावी; मात्र घराची लांबी व रुंदी किती असावी, यावर वनविभागामार्फत मर्यादा घालू नयेत. घरमालकांना त्यांच्या गरजेनुसार घरबांधणीसाठी परवानगी देण्यात यावी. स्वत:चे घर बांधल्यावर ते घर विक्रीसाठी, भाड्याने देण्यासाठी परवानगी देण्यात यावी. डोंगरावरील जमिनीवर नाचणी, भात, मका, गहू पिके ओढ्यानाल्याचे पाणी वळवून घेतली जातात. पाणी वळवल्यानंतर निर्बंध आणू नयेत. झाडांच्या वाफसावलीमुळे पिके येत नाहीत. झाडोरा वाडसायचा नाही, असे बंधन असल्याने पिके घेताच येणार नाहीत. शेतकऱ्यांनी खायचे काय? असा प्रश्न निर्माण होईल. या विभागातील जनतेचे महत्त्वाचे उदरनिर्वाहाचे साधन दुग्धव्यवसाय आहे. वनविभागाने जनावरे चरावयास सोडण्यावर बंदी घातली आहे. म्हशी व गायींच्या किमती ४० ते ६० हजारांवर पोहोचल्या आहेत. नुकतेच शासनाने दुधाचा दर दोन रुपयांनी कमी केलाय. जनावरे चरावयास सोडायची नाहीत, असा कायदा केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. असेही पाटणकर म्हणाले. (प्रतिनिधी).इंग्रज-मोघलांच्या काळातही असं नव्हतंशासनाने प्रारूप आराखडा दोन महिन्यांपूर्वी जाहीर केलाय. त्याला ९९ टक्के लोकांनी विरोध केला आहे. शेतकऱ्यांनी आपले घर २० वर्षे विकायचे नाही. पंधरा वर्षे भाड्याने द्यायचे नाही. ही बंधने वनविभागाने घालायचे कारणच नाही. आम्ही देशाचे नागरिक आहोत. इंग्रज व मोघलांच्या काळात सुध्दा असा जुलमी कायदा नव्हता. आम्हाला सामान्य नागरिकांप्रमाणे राहू द्या.’