शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कारप्राप्त गावाला म्हणे नावच बदलायचंय--गाव बदललं, नाव बदलायचंय

By admin | Updated: February 13, 2015 00:50 IST

वाड्यांना लागले नामकरणाचे वेध! जखिण‘वाडी’ नको, जखणापूर म्हणा : प्रस्ताव अडकला लालफितीत; सरपंच नाचवतायत कागदी घोडी,

संजय पाटील --- कऱ्हाड नावात काय आहे, असं म्हणतात; पण कधी-कधी कर्तृत्व मोठं असलं तरी नेमकं नावातच घोडं अडतं. इच्छा नसली तरी त्यावेळी नाव बदलावसं वाटतं. कऱ्हाड तालुक्यातील जखिणवाडी या पुरस्कारप्राप्त गावाचंही सध्या तेच झालंय. या गावाने राज्यपातळीवरील पुरस्कारांवर आपलं नाव कोरलंय; पण सध्या हेच नाव ग्रामस्थांना नकोस झालंय. जखिण‘वाडी’ऐवजी गावाला ‘जखणापूर’ नाव देण्यात यावं, असं ग्रामसभेचं म्हणणं. तसा प्रस्तावही जिल्हा परिषदेकडे गेलाय. वाई तालुक्यातील ‘चोराचीवाडी’ या महसुली गावाचा काही दिवसांपूर्वीच नाव बदल झाला. गावाचं अपमानास्पद नाव बदलण्यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या वीस वर्षांच्या प्रयत्नाला अखेर यश आलं. ‘चोराचीवाडी’ आता ‘आनंदपूर’ बनलं. चोराचीवाडी गावाप्रमाणेच जिल्ह्यातील इतर काही गावांचे नाव बदलाचे प्रस्ताव जिल्हा परिषदेत सध्या धूळखात पडलेत. संबंधित गावातील ग्रामस्थांना आपल्या गावाचं नाव का बदलायचंय, याचा ज्यावेळी ‘लोकमत’ने शोध घेतला, त्यावेळी भन्नाट कारणे समोर आली. इतर गावांप्रमाणेच जखिणवाडीच्या ग्रामस्थांना आपल्या गावाचं नाव बदलायचंय. ग्रामस्वच्छता, तंटामुक्ती यासह विविध अभियानांमध्ये या गावानं तब्बल पंधरा पुरस्कार मिळवलेत; पण तरीही येथील ग्रामस्थांना ‘जखिणवाडी’ऐवजी ‘जखणापूर’ नाव आपल्या गावासाठी योग्य वाटतंय. ‘वाडी’ म्हटलं की, पाहणाऱ्यांचा दृष्टिकोन बदलतो, असंच ग्रामस्थांचं मत. मात्र, सरपंचांनी नाव बदलामागचं वेगळंच कारण समोर ठेवलं. आमच्या गावाचं नाव तसं चांगलं आहे. मात्र, नावामुळे थोडासा ‘प्रॉब्लेम’ होतोय. सरपंच नरेंद्र नांगरे-पाटील सांगत होते. ‘कऱ्हाडप्रमाणेच खानापूर तालुक्यात जखिणवाडी नावाचं गाव आहे. त्यामुळे आमच्या गावातील महत्त्वाची पत्रं त्या गावात जातायत. पै-पाहुण्यांचं टपालं, मुलांची शाळा व कॉलेजची पत्रं एवढंच नव्हे नोकरीची नियुक्तीपत्रही खानापूर तालुक्यातील जखिणवाडीला गेली. तेथून ती परत आमच्याकडे आली. मात्र, तोपर्यंत बरेच दिवस उलटल्यामुळे नोकरी, शाळा, कॉलेजची कामे झाली नाहीत.’ २०११ मध्ये गावाचं नाव बदलण्याचा विषय ग्रामसभेमध्ये आला, त्यावेळी काय नाव द्यावं, या प्रश्नानंही डोकं वर काढलं. गावात जखणाई देवीचं पुरातन मंदिर. या देवीच्या नावावरूनच गावाला ‘जखिणवाडी’ हे नाव पडलेलं. त्यामुळे गावाच्या नावात जखणाईदेवीचा उल्लेख असावा, अशी ग्रामस्थांची मनोमन इच्छा. त्यामुळे बदलण्यात येणाऱ्या नावाबाबत चांगलीच चर्चा झाली. अखेर ‘जखणापूर’ हे नाव निश्चित झालं. ग्रामसभेत तसा ठराव झाला. प्रस्ताव तयार झाला. तो शासन दरबारीही पोहोचला. मात्र, गेली चार वर्षे या प्रस्तावाबाबत काहीच कार्यवाही झालेली नाही. गावाचं नाव बदलण्यास महसूल विभाग अनास्था दाखवित असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. ( क्रमश:) पंधरा पुरस्कारांवर ‘जखिणवाडी’चं नाव जखिणवाडी गावाने चार वर्षांत तब्बल पंधरा पुरस्कार मिळवलेत. त्यामध्ये २०१० मध्ये निर्मलग्राम, २०११ मध्ये आदर्श ग्राम, २०१२ मध्ये पर्यावरण समृद्ध गाव, संत गाडगेबाबा अभियान कऱ्हाड तालुक्यात प्रथम, महात्मा गांधी तंटामुक्त गाव विशेष पुरस्कार, दिवंगत वसंतराव नाईक पाणी व सांडपाणी व्यवस्थापन पुरस्कार, यशवंत पंचायत राजमध्ये कऱ्हाड तालुक्यात प्रथम, २०१३ मध्ये गौरव ग्रामसभेस मानांकन तसेच विकासरत्न पुरस्कार, २०१४ मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये जिल्हास्तरीय प्रथम, संत गाडगेबाबा अभियान पुणे, विभागात द्वितीय व २०१५ मध्ये यशवंत ‘पंचायत राज’मध्ये जखिणवाडीने जिल्ह्यात प्रथम मिळविला आहे. राज्यसभा सदस्य आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींकडून आम्ही आमच्या गावासाठी निधी मिळवलंय. पाच वर्षांपूर्वीची आणि आत्ताची जखिणवाडी यामध्ये खूप मोठी तफावत आहे. गावाचा चेहरामोहरा बदललंय. आता गावाचं नाव बदलावं एवढीच ग्रामस्थांची अपेक्षा आहे. - महेश गुरव, उपसरपंच जखिणवाडी नावामुळे प्रशासकीय पातळीवर आम्हाला काही अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ग्रामस्थांची टपालाद्वारे येणारी महत्त्वाची कागदपत्रं वेळेवर पोहोचत नाहीत. खानापूर तालुक्यातील जखिणवाडीला ही कागदपत्रं जातात. त्यामुळे गावाचं नाव बदलावं, असा प्रस्ताव आम्ही पाठवलंय. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होतंय. - रामचंद्र पाटील, माजी सरपंच