शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बंडातात्या यांच्या सुटकेसाठी शिवसेनेच्या आमदाराने हातात घेतले टाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 16:00 IST

shivsena satara : बंडा तात्या कऱ्हाडकर यांची स्थानबद्धतेतून सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी हातात टाळ घेतले. बंडा तात्या यांना ठराविक वारकऱ्यांना सोबत घेऊन पंढरीची वारी करण्यास परवानगी द्यावी, मागणी आमदार शिंदे यांनी यावेळी केली.

ठळक मुद्देशिवसेनेचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांचे आंदोलनकोरोनाच्या काळात अध्यात्मिक शक्ती महत्वाची असल्याचा दावा

सातारा : बंडा तात्या कऱ्हाडकर यांची स्थानबद्धतेतून सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी हातात टाळ घेतले. बंडा तात्या यांना ठराविक वारकऱ्यांना सोबत घेऊन पंढरीची वारी करण्यास परवानगी द्यावी, मागणी आमदार शिंदे यांनी यावेळी केली.वारकरी प्रतिष्ठान महाराष्ट्र या संघातर्फे बंडातात्या कऱ्हाडकर यांची स्थानबद्ध तेथून सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमला होता.जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ज्ञानोबा-तुकारामाच्या जयघोषात करत आमदार शिंदे आणि इतर वारकऱ्यांनी टाळ वाजावून बंडा तात्यांच्या स्थानबद्धतेचा निषेध केला. प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने बंडातात्या कऱ्हाडकर यांना स्थानबद्ध केले आहे, त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाचे वातावरण असून बंडा तात्यांना मोजक्‍या वारकऱ्यांना सोबत घेऊन पंढरीची वारी करण्यास परवानगी द्यावी, याबाबतचे निवेदन प्रशासनाला सादर केले आहे.या आंदोलनाबाबतची भूमिका व्यक्त करताना आमदार महेश शिंदे म्हणाले, इतर राजकीय कार्यक्रमांसाठी दीड दोन हजार लोक एकत्र आले. मात्र वारीला परवानगी दिली जात असल्याने महाराष्ट्रातील वारकऱ्यांमध्ये वेगळी भावना आहे. वारकरी कोरोनाचे सर्व नियम पाळून वारी काढणार आहेत. कोरोनाच्या काळामध्ये अध्यात्मिक शक्तींना रोखणे चुकीचे होईल. याबाबत मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. मुख्यमंत्री आणि वारकरी यांचा जुना ऋणानुबंध आहे. ते निश्चितपणाने मोजक्या लोकांच्या वारीला परवानगी देतील, अशी खात्री आहे.दरम्यान पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी या या कोंडीतून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती आ. शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.कोरोनाच्या काळामध्ये लोकांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे, हे संतुलन पूर्ववत करण्यासाठी अध्यात्मिक शक्तीच कामी येणार आहे. या शक्तीला रोखून धरणे चुकीचे ठरेल. दाऊ आंदोलन अशा पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा वारकरी यांनी केलेले आंदोलन सगळ्यांनाच माहित आहे त्या पद्धतीचे आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर निश्चितपणे येणार नाही, असेही आमदार शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPandharpur Wariपंढरपूर वारीSatara areaसातारा परिसर