शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

बंडातात्या यांच्या सुटकेसाठी शिवसेनेच्या आमदाराने हातात घेतले टाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 16:00 IST

shivsena satara : बंडा तात्या कऱ्हाडकर यांची स्थानबद्धतेतून सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी हातात टाळ घेतले. बंडा तात्या यांना ठराविक वारकऱ्यांना सोबत घेऊन पंढरीची वारी करण्यास परवानगी द्यावी, मागणी आमदार शिंदे यांनी यावेळी केली.

ठळक मुद्देशिवसेनेचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांचे आंदोलनकोरोनाच्या काळात अध्यात्मिक शक्ती महत्वाची असल्याचा दावा

सातारा : बंडा तात्या कऱ्हाडकर यांची स्थानबद्धतेतून सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांनी हातात टाळ घेतले. बंडा तात्या यांना ठराविक वारकऱ्यांना सोबत घेऊन पंढरीची वारी करण्यास परवानगी द्यावी, मागणी आमदार शिंदे यांनी यावेळी केली.वारकरी प्रतिष्ठान महाराष्ट्र या संघातर्फे बंडातात्या कऱ्हाडकर यांची स्थानबद्ध तेथून सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमला होता.जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ज्ञानोबा-तुकारामाच्या जयघोषात करत आमदार शिंदे आणि इतर वारकऱ्यांनी टाळ वाजावून बंडा तात्यांच्या स्थानबद्धतेचा निषेध केला. प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने बंडातात्या कऱ्हाडकर यांना स्थानबद्ध केले आहे, त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाचे वातावरण असून बंडा तात्यांना मोजक्‍या वारकऱ्यांना सोबत घेऊन पंढरीची वारी करण्यास परवानगी द्यावी, याबाबतचे निवेदन प्रशासनाला सादर केले आहे.या आंदोलनाबाबतची भूमिका व्यक्त करताना आमदार महेश शिंदे म्हणाले, इतर राजकीय कार्यक्रमांसाठी दीड दोन हजार लोक एकत्र आले. मात्र वारीला परवानगी दिली जात असल्याने महाराष्ट्रातील वारकऱ्यांमध्ये वेगळी भावना आहे. वारकरी कोरोनाचे सर्व नियम पाळून वारी काढणार आहेत. कोरोनाच्या काळामध्ये अध्यात्मिक शक्तींना रोखणे चुकीचे होईल. याबाबत मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. मुख्यमंत्री आणि वारकरी यांचा जुना ऋणानुबंध आहे. ते निश्चितपणाने मोजक्या लोकांच्या वारीला परवानगी देतील, अशी खात्री आहे.दरम्यान पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी या या कोंडीतून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती आ. शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.कोरोनाच्या काळामध्ये लोकांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे, हे संतुलन पूर्ववत करण्यासाठी अध्यात्मिक शक्तीच कामी येणार आहे. या शक्तीला रोखून धरणे चुकीचे ठरेल. दाऊ आंदोलन अशा पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा वारकरी यांनी केलेले आंदोलन सगळ्यांनाच माहित आहे त्या पद्धतीचे आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर निश्चितपणे येणार नाही, असेही आमदार शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPandharpur Wariपंढरपूर वारीSatara areaसातारा परिसर