शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

औंध, सुरवडीत डॉल्बीला दणका

By admin | Updated: August 20, 2016 00:25 IST

ग्रामस्थांसह मंडळांचा पुढाकार : गणेशोत्सवात घुमणार पारंपरिक वाद्यांचा ‘आव्वाज’--आव्वाज गावाचा... ..नाय डॉल्बीचा !

साखरवाडी : ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘आव्वाज गावाचा, नाय डॉल्बीचा’ या चळवळीला आंध तसेच सुरवडी गावात यश आले असून, सुरवडीतील ग्रामसभेत ग्रामस्थांच्या आवाहनाला प्रतिसाद देत युवकांनीच गावामध्ये डॉल्बीमुक्तीसह अवैध धंदे बंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. तर औंध येथे झालेल्या गणेश मंडळांच्या बैठकीतही मंडळांकडून या निर्णयास सकारात्मक प्रतिसाद मिळाला.सुरवडी, ता. फलटण येथे स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम प्राथमिक शाळा सुरवडीचे प्रांगणात पार पडला. यावेळी गावचे नवनिर्वाचित पोलिस पाटील संतोष पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे-पाटील हे होते. यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कारासह खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी गेली वर्षभर चर्चेत असलेला आणि काही युवकांच्या हट्टापायी यापूर्वी निर्णय होऊ न शकलेला डॉल्बीबंदीचा विषय ग्रामसभेत वादळी ठरला. यावेळी ग्रामस्थांनी डॉल्बीचे दुष्परिणाम व वयोवृद्ध आणि रुग्णांवर होणारे परिणाम या विषयावर चर्चा केली आणि यातून युवकांनीच मार्ग काढण्याचे आवाहन केले असता उपस्थित सर्व युवकांनी आजपासूनच डॉल्बीबंदीचा निर्णय घेण्यात यावा आणि गावात सुरू झालेले अवैध धंदेही पूर्णपणे बंद करण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला. या निर्णयाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. यावेळी ‘लोकमत’च्या डॉल्बीबंदी चळवळीचाही आवर्जून उल्लेख करण्यात आला. यानंतर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मंगल माडकर होत्या. यावेळी प्रामुख्याने गावचे विकास आराखडा, स्वच्छ भारत अभियान, हगणदारीमुक्त गाव तसेच पाणीपुरवठा, वीजवितरण कंपनी, आरोग्य खाते, पशुसंवर्धन आदी विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले.यावेळी सरपंच मंगल माडकर, उपसरपंच बाळासाहेब जगताप, सदस्य शिवाजी जाधव, रंजना साळुंखे, रंजना पवार, जाधव, मुख्याध्यापिका आतार, अंगणवाडी सेविका मदतनीस, कृषी, पशुसंवर्धन खात्याचे प्रतिनिधी व केंद्रप्रमुख राजाराम जगताप आणि ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)स्मशानभूमीचे काम लवकरच हातीग्रामसभेत स्वच्छ भारत अभियान, हगणदारीमुक्त गाव, गावचा विकास आराखडा, कृषी विभागाच्या योजना, पशुवैद्यकीय खात्याच्या योजना, याबाबत सविस्तर चर्चा होऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तसेच गावच्या स्मशानभूमीचा प्रलंबित प्रश्न ही जागेच्या उपलब्धतेमुळे मार्गी लागला असून, अद्ययावत स्मशानभूमीसाठी चालू आर्थिक वर्षात तरतूद करण्यात येऊन कामही सुरू करण्यात येणार असल्याचे धनंजय साळुंखे-पाटील यांनी सांगितले...अन्यथा डॉल्बीसह वाहन जप्त : काळेऔंध : ‘सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा अवलंब करावा, सर्व आवश्यक परवानगी घेऊन गणेशोत्सव डॉल्बीमुक्त भक्तिमय वातावरणात साजरा करा, डॉल्बी लावलेली निदर्शनास आल्यास डॉल्बी व वाहन जप्त करणार असल्याचा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत काळे यांनी दिल्या.औंध येथे पोलिस स्टेशनच्या वतीने आयोजित औंध परिसरातील ४० गावांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव, वडूजचे पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के, सहायक पोलिस निरीक्षक सुनील चव्हाण, सरपंच रोहिणी थोरात, उपसरपंच बापूसाहेब कुंभार, आलीम मोदी, रवी थोरात, विनोद थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. काळे म्हणाले, ‘प्रत्येक मंडळांनी गणेशोत्सव काळात किमान चार कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र हजर राहून मूर्ती, देखावे व सजावटीचे रक्षण करण्यासाठी खबरदारी घ्यावी. मिरवणुका शांततेत काढण्याची सूचनाही यावेळी त्यांनी दिली.’विकास जाधव म्हणाले, ‘मंडळांनी जागा मालकाचे संमतीपत्र, अधिकृत लाईटचा वापर, रहदारीस अडथळा होऊ नये, अशा ठिकाणी शेड, आक्षेपार्ह देखावा नसावा. अनावश्यक बोर्ड लावू नये तसेच जलसंधारण, बेटी बचाव, स्वदेशी असे देखावे तयार करा, गोरगरीब हुशार मुलांना दत्तक घ्या, असे समाजपयोगी कामे करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी आलीम मोदी, बापूसाहेब कुंभार यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना गणेशोत्सव कसा साजरा करावा, याविषयी मार्गदर्शन केले. (वार्ताहर)एक खिडकी योजना २५ आॅगस्ट पासून‘एक खिडकी योजना’ ही येत्या २५ तारखेपासून औंध पोलिस स्टेशनमधून मंडळांना सर्व आवश्यक परवाने या योजनेद्वारे दिले जातील, त्यामुळे ज्यांची नोंदणी नाही त्यांना सुद्धा नोंदणी करता येणार आहे.