शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दलाकडे जनतेचा बघण्याचा दृष्टिकोन हुतात्म्यांमुळे बदलला

By admin | Updated: November 28, 2014 00:15 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे प्रतिपादन

भुर्इंज : ‘सातारची भूमी ही शूरवीरांची भूमी आहे. इथल्या मातीने क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांच्यासारख्या रत्नांबरोबरच २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यात अजमल कसाब सारख्या दहशतवाद्याला पकडणाऱ्या हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्यासारखा धाडशी पोलीस अधिकारीही दिला आहे. या वीरांनी राज्यातील जतनेचा पोलीस दलाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला,’ असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी केले. किसन वीर कारखाना कार्यस्थळावर २६/११ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला परतवून लावताना आपल्या प्राणाची बाजी लावणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन, मानवंदना आणि संविधान दिन अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खंडाळा साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, भुर्इंज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची उपस्थिती होती.देशमुख म्हणाले, ‘तुकाराम ओंबळेंनी कसाबला पकडले नसते, तर मुंबईत आणखी लोक मारले गेले असते. दहशतवाद्यांचे मनसुबे जगाला कळले नसते. ओंबळेंनी देशभक्तीने प्रेरित होऊन हिमतीचे काम केले. त्यांच्यासह या हल्ल्यातील हुतात्म्यांचे कल्पनाशक्तीचा योग्य वापर करत उचित स्मारक उभारून मदन भोसलेंनी देशभक्तीतून सामाजिक बांधिलकी जपलेली आहे. कारखान्याने उभारलेले हे स्मारक खऱ्या अर्थाने आजच्या तरुण पिढीचे प्रेरणास्थळ आहे.’ प्रारंभी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दल व कारखान्याच्या सुरक्षारक्षकांनी हुतात्म्यांना मानवंदना दिली. यावेळी कारखान्याचे संचालक संचालक नारायणराव पवार, नंदाभाऊ जाधव, हणमंतराव पिसाळ, चंद्रकांत इंगवले, सुभाष साळुंखे, संदीप पोळ, अशोक मोरे, रोहिदास पिसाळ, अ‍ॅड. प्रभाकर बर्गे, किसनराव कदम, रतनसिंह शिंदे, नंदकुमार निकम, लालसिंग जमदाडे, सचिन साळुंखे, सुनंदा चव्हाण, कार्यकारी संचालक विजय वाबळे, मोहनराव भोसले, प्रल्हाद चव्हाण, बापूसाहेब शिंदे, सतीश भोसले, धनाजी डेरे, प.ना. पोतदार, चंद्रकांत चव्हाण, शंकरराव पवार, नवनाथ केंजळे, बाळासाहेब कांबळे, विलासराव जाधव, मधुकर शिंदे, शिवाजीराव जाधव-पाटील, उपस्थित होते. (प्रतिनिधी)