शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळली सातारानगरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 23:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : लक्ष्मी पूजनानिमित्त लक्ष-लक्ष दिव्यांनी सातारा शहर उजळून निघाले होते. वसाहती, बंगले, दुकानांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सायंकाळी सातनंतर लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर आकाशात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.दिवाळीच्या चार दिवसांमध्ये लक्ष्मी पूजनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. लक्ष्मी पूजनापूर्वी घराचे अंगण, दुकानांसमोर सडा-रांगोळी अन् पणत्या लावून आकर्षक सजावट ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : लक्ष्मी पूजनानिमित्त लक्ष-लक्ष दिव्यांनी सातारा शहर उजळून निघाले होते. वसाहती, बंगले, दुकानांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सायंकाळी सातनंतर लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर आकाशात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.दिवाळीच्या चार दिवसांमध्ये लक्ष्मी पूजनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. लक्ष्मी पूजनापूर्वी घराचे अंगण, दुकानांसमोर सडा-रांगोळी अन् पणत्या लावून आकर्षक सजावट करण्यात आली होती.साताºयात सायंकाळी सव्वा सहानंतर लक्ष्मी पूजनाला प्रारंभ झाला. घरोघरी, दुकानांमधून कुबेर-लक्ष्मीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.सुमारे दोन तास पूजन करण्यात आले असले तरी रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरूच होती. राजवाडा, पोवई नाका, राजपथावर सर्वाधिक आतषबाजी सुरू होती. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.यंदा साताºयाच्या बाजारपेठेत दिवाळीनिमित्त नवी दालने सुरू झाली आहेत. या दुकांनामध्येही लक्ष्मी पूजन शास्त्रोक्तपद्धतीने करण्यात आले. घरातल्या लहान मुलांसह महिलांनीही नवे कपडे परिधान करून लक्ष्मी पूजन केले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत फटाक्यांची आतषबाजी सुरूच होती.यवतेश्वरमध्ये लक्ष्मी पूजनादिवशी यात्रायवतेश्वर येथे लक्ष्मी पूजनादिवशी यात्रा भरते. या यात्रेला यवतेश्वर, आंबेदरे, सारखळ, गवडी, सांबरवाडी तसेच सातारा शहर व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. सकाळपासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आंब्याचा मोहर. पूर्वीपासूनच या यात्रेत आंब्याचा मोहर शोधण्याचा मान गुरव समाजाला असतो. सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान ‘यवतोबाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात पालखीची मिरवणूक आंब्यापर्यंत काढण्यात आली. आंब्याचा मोहर पुजारी हातात घेऊन पालखी पुन्हा मंदिराकडे येते. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची प्रचंड गर्दी असते.