शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

विधानसभेचं गणित, साताऱ्यातील दोन मतदारसंघ महिलांसाठी राखीव...

By नितीन काळेल | Updated: September 19, 2023 19:57 IST

५० वर्षांत दोनच महिला आमदार

सातारा :राजकारणातमहिलांची संख्या अजुनही कमी आहे. पण, संसदेच्या विशेष अधिवेशनात ३३ टक्के महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यास लोकसभेबरोबरच विधानसभेचे मतदारसंघही महिलांसाठी राखीव होणार आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातीलही आठपैकी दोनतरी विधानसभा मतदारसंघ राखीव होऊ शकतात. तर जिल्ह्यात ५० वर्षांत दोनच महिला आमदार झाल्या आहेत.   

संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी मोदी सरकारने देशभरातील महिला वर्गाला एक मोठं गिफ्ट दिलेलं आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत संसदेत ३३ टक्के महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास लोकसभा मतदारसंघाच्या ३३ टक्के जागा या महिलांसाठी राखीव होतील. तसेच विधानसभेतही असेच गणित पाह्याला मिळणार आहे. सातारा जिल्ह्याचा विचार करता येथेही हे सूत्र लागू होणार आहे. 

सातारा जिल्ह्यात पूर्वी विधानसभेचे १० मतदारसंघ होते. मात्र, विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर आठच मतदारसंघ राहिले. यामध्ये सातारा-जावळी, कऱ्हाड दक्षिण आणि कऱ्हाड उत्तर, तसेच पाटण, माण, फलटण, कोरेगाव, वाई हे मतदारसंघ झाले. मागील तीन निवडणुका पुनर्रचित मतदारसंघात झाल्या आहेत. यातील फलटण विधानसभा मतदारसंघ हा अनुसुचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. पण, आता ३३ टक्के महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर झाल्यास जिल्ह्यातील आणखी दोन मतदारसंघ महिलांसाठी राखीव होऊ शकतात. ते कोणते असणार याबाबत निश्चित स्पष्टता नसलीतरी जिल्ह्याच्या राजकारणातही महिलांचा टक्का वाढणार हे निश्चित आहे. यामुळे मातब्बर घराण्यातील महिलाच आमदार होऊ शकतात असा अंदाज आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसरWomenमहिला