शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

हक्काचे पाणी बारामतीला विकणाऱ्यांना जाब विचारा : हिंदुराव नाईक-निंबाळकर

By admin | Updated: June 20, 2017 16:26 IST

निरा, देवघरच्या पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ; फलटण तालुक्यात बैठकांमध्या ग्रामस्थांना आवाहन

आॅनलाईन लोकमतफलटण , दि. २0 : लाभ क्षेत्रात नसलेल्या किंबहुना निरा देवघरचा काडी मात्र संबध नसताना फलटण, खंडाळा तालुक्यांचे हक्काचे पाणी बारामती तालुक्याला विकणाऱ्या तथाकथित भगीराथाला तालुक्यातील जनतेने जाब विचारण्याची व आपल्या हक्काच्या पाण्यासाठी संर्घष करण्याची वेळ आली आहे. असे मत माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी केले.निरा देवघर धरणाच्या वस्तुस्थिती मांडण्याबाबत फलटण तालुक्यातील ५१ गावाच्या दौऱ्यात काळज, सासवड, चव्हाणवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निरादेवघर कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम, जयकुमार शिंदे, बाळासाहेब कदम, सिराज शेख, राजेंद्र काकडे, विलास झणझणे, वसंत ठोबरे, मंज्जाबा खताळ, नंदु गाढवे आदी उपस्थीत होते.हिंदुराव नाईक-निंबाळकर पुढे म्हणाले, नियोजित वेळेत कालव्याची कामे झाली असती तर लाभक्षेत्रात असुनही आपल्या तालुक्याना सिंचनापासुन वंचीत रहावे लागले नसते. निरा देवघर प्रकल्प सीडब्ल्यूसी (केंद्रीय जल आयोग) मधुन मंजुर होवुन एआयबीपी मधुन भरीव मदत मिळाण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे होते. निरा देवघर प्रकल्प गेली १३ वर्ष जवळपास शंभर टक्के भरत आहे. असे असुनही केंद्रीय जल आयोगाची मान्यता नाही व त्यामुळे निधी उपलब्ध होत नाही. यासाठी प्रयत्न केले जात नाहीत का? का जाणीवपुर्वक हे घडविले जात आहे, यांचा विचार करणेची वेळ आता आली आहे.लाभ क्षेत्रात असूनही ग्रामस्थांना पाणी नाही. लाभ क्षेत्रात नाहीत ते मात्र अमर्याद व अनिर्बंधपणे पाणी वापर करित आहे हे दुदैर्वी चित्र बदलणे गरजेचे आहे. कालव्याची कामे झाली नाही तर लाभक्षेत्रात नसुनही आपले हक्काचे पाणी कायमस्वरूपी बारामतीला मिळेल व फलटण, माळशिरस हे दुष्काळी तालुके हक्काच्या पाण्यापासून वंचीत राहतील असे हिंदुराव नाईक-निंबाळकर म्हणाले.

सत्तेचा गैरवापर : नरसिंह निकम

अ‍ॅड. नरसिंह निकम म्हणाले की, निरा देवघर प्रकल्पासाठी हिंदुराव यांनी सुरूवातीपासून प्रयत्न केले आहेत. ज्यांच्यासाठी हा प्रकल्प तयार केला त्यांना आद्याप पाणी मिळालेले नाही. त्यांच्या जमीनी गेल्या त्यांना शासनाने आश्वासने दिली पण ती पूर्ण केली गेली नाहीत. आपल्या हक्काचे पाणी मिळविण्यासाठी जनआंदोलन उभे करून लढा उभारणे गरजेचे आहे. आपल्या तालुक्यातील काही स्वार्थी राजकीय प्रतिनिधी यांनी सत्तेचा गैरवापर करून आपल्या हक्काचे पाणी बारामती, इंदापुरकडे पळविले आहे. पाणीसाठ्यापैकी ६० टक्के पाणी नीरा डावा कालव्यासाठी घेतले. म्हणजे दहा वर्ष ज्यांचा पाण्याशी संबध नाही ते पाणी वापरत आहेत, असेही ते म्हणाले.