शहरं
Join us  
Trending Stories
1
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
2
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
3
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

हक्काचे पाणी बारामतीला विकणाऱ्यांना जाब विचारा : हिंदुराव नाईक-निंबाळकर

By admin | Updated: June 20, 2017 16:26 IST

निरा, देवघरच्या पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ; फलटण तालुक्यात बैठकांमध्या ग्रामस्थांना आवाहन

आॅनलाईन लोकमतफलटण , दि. २0 : लाभ क्षेत्रात नसलेल्या किंबहुना निरा देवघरचा काडी मात्र संबध नसताना फलटण, खंडाळा तालुक्यांचे हक्काचे पाणी बारामती तालुक्याला विकणाऱ्या तथाकथित भगीराथाला तालुक्यातील जनतेने जाब विचारण्याची व आपल्या हक्काच्या पाण्यासाठी संर्घष करण्याची वेळ आली आहे. असे मत माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी केले.निरा देवघर धरणाच्या वस्तुस्थिती मांडण्याबाबत फलटण तालुक्यातील ५१ गावाच्या दौऱ्यात काळज, सासवड, चव्हाणवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निरादेवघर कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम, जयकुमार शिंदे, बाळासाहेब कदम, सिराज शेख, राजेंद्र काकडे, विलास झणझणे, वसंत ठोबरे, मंज्जाबा खताळ, नंदु गाढवे आदी उपस्थीत होते.हिंदुराव नाईक-निंबाळकर पुढे म्हणाले, नियोजित वेळेत कालव्याची कामे झाली असती तर लाभक्षेत्रात असुनही आपल्या तालुक्याना सिंचनापासुन वंचीत रहावे लागले नसते. निरा देवघर प्रकल्प सीडब्ल्यूसी (केंद्रीय जल आयोग) मधुन मंजुर होवुन एआयबीपी मधुन भरीव मदत मिळाण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे होते. निरा देवघर प्रकल्प गेली १३ वर्ष जवळपास शंभर टक्के भरत आहे. असे असुनही केंद्रीय जल आयोगाची मान्यता नाही व त्यामुळे निधी उपलब्ध होत नाही. यासाठी प्रयत्न केले जात नाहीत का? का जाणीवपुर्वक हे घडविले जात आहे, यांचा विचार करणेची वेळ आता आली आहे.लाभ क्षेत्रात असूनही ग्रामस्थांना पाणी नाही. लाभ क्षेत्रात नाहीत ते मात्र अमर्याद व अनिर्बंधपणे पाणी वापर करित आहे हे दुदैर्वी चित्र बदलणे गरजेचे आहे. कालव्याची कामे झाली नाही तर लाभक्षेत्रात नसुनही आपले हक्काचे पाणी कायमस्वरूपी बारामतीला मिळेल व फलटण, माळशिरस हे दुष्काळी तालुके हक्काच्या पाण्यापासून वंचीत राहतील असे हिंदुराव नाईक-निंबाळकर म्हणाले.

सत्तेचा गैरवापर : नरसिंह निकम

अ‍ॅड. नरसिंह निकम म्हणाले की, निरा देवघर प्रकल्पासाठी हिंदुराव यांनी सुरूवातीपासून प्रयत्न केले आहेत. ज्यांच्यासाठी हा प्रकल्प तयार केला त्यांना आद्याप पाणी मिळालेले नाही. त्यांच्या जमीनी गेल्या त्यांना शासनाने आश्वासने दिली पण ती पूर्ण केली गेली नाहीत. आपल्या हक्काचे पाणी मिळविण्यासाठी जनआंदोलन उभे करून लढा उभारणे गरजेचे आहे. आपल्या तालुक्यातील काही स्वार्थी राजकीय प्रतिनिधी यांनी सत्तेचा गैरवापर करून आपल्या हक्काचे पाणी बारामती, इंदापुरकडे पळविले आहे. पाणीसाठ्यापैकी ६० टक्के पाणी नीरा डावा कालव्यासाठी घेतले. म्हणजे दहा वर्ष ज्यांचा पाण्याशी संबध नाही ते पाणी वापरत आहेत, असेही ते म्हणाले.