शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

हक्काचे पाणी बारामतीला विकणाऱ्यांना जाब विचारा : हिंदुराव नाईक-निंबाळकर

By admin | Updated: June 20, 2017 16:26 IST

निरा, देवघरच्या पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ; फलटण तालुक्यात बैठकांमध्या ग्रामस्थांना आवाहन

आॅनलाईन लोकमतफलटण , दि. २0 : लाभ क्षेत्रात नसलेल्या किंबहुना निरा देवघरचा काडी मात्र संबध नसताना फलटण, खंडाळा तालुक्यांचे हक्काचे पाणी बारामती तालुक्याला विकणाऱ्या तथाकथित भगीराथाला तालुक्यातील जनतेने जाब विचारण्याची व आपल्या हक्काच्या पाण्यासाठी संर्घष करण्याची वेळ आली आहे. असे मत माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी केले.निरा देवघर धरणाच्या वस्तुस्थिती मांडण्याबाबत फलटण तालुक्यातील ५१ गावाच्या दौऱ्यात काळज, सासवड, चव्हाणवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निरादेवघर कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम, जयकुमार शिंदे, बाळासाहेब कदम, सिराज शेख, राजेंद्र काकडे, विलास झणझणे, वसंत ठोबरे, मंज्जाबा खताळ, नंदु गाढवे आदी उपस्थीत होते.हिंदुराव नाईक-निंबाळकर पुढे म्हणाले, नियोजित वेळेत कालव्याची कामे झाली असती तर लाभक्षेत्रात असुनही आपल्या तालुक्याना सिंचनापासुन वंचीत रहावे लागले नसते. निरा देवघर प्रकल्प सीडब्ल्यूसी (केंद्रीय जल आयोग) मधुन मंजुर होवुन एआयबीपी मधुन भरीव मदत मिळाण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे होते. निरा देवघर प्रकल्प गेली १३ वर्ष जवळपास शंभर टक्के भरत आहे. असे असुनही केंद्रीय जल आयोगाची मान्यता नाही व त्यामुळे निधी उपलब्ध होत नाही. यासाठी प्रयत्न केले जात नाहीत का? का जाणीवपुर्वक हे घडविले जात आहे, यांचा विचार करणेची वेळ आता आली आहे.लाभ क्षेत्रात असूनही ग्रामस्थांना पाणी नाही. लाभ क्षेत्रात नाहीत ते मात्र अमर्याद व अनिर्बंधपणे पाणी वापर करित आहे हे दुदैर्वी चित्र बदलणे गरजेचे आहे. कालव्याची कामे झाली नाही तर लाभक्षेत्रात नसुनही आपले हक्काचे पाणी कायमस्वरूपी बारामतीला मिळेल व फलटण, माळशिरस हे दुष्काळी तालुके हक्काच्या पाण्यापासून वंचीत राहतील असे हिंदुराव नाईक-निंबाळकर म्हणाले.

सत्तेचा गैरवापर : नरसिंह निकम

अ‍ॅड. नरसिंह निकम म्हणाले की, निरा देवघर प्रकल्पासाठी हिंदुराव यांनी सुरूवातीपासून प्रयत्न केले आहेत. ज्यांच्यासाठी हा प्रकल्प तयार केला त्यांना आद्याप पाणी मिळालेले नाही. त्यांच्या जमीनी गेल्या त्यांना शासनाने आश्वासने दिली पण ती पूर्ण केली गेली नाहीत. आपल्या हक्काचे पाणी मिळविण्यासाठी जनआंदोलन उभे करून लढा उभारणे गरजेचे आहे. आपल्या तालुक्यातील काही स्वार्थी राजकीय प्रतिनिधी यांनी सत्तेचा गैरवापर करून आपल्या हक्काचे पाणी बारामती, इंदापुरकडे पळविले आहे. पाणीसाठ्यापैकी ६० टक्के पाणी नीरा डावा कालव्यासाठी घेतले. म्हणजे दहा वर्ष ज्यांचा पाण्याशी संबध नाही ते पाणी वापरत आहेत, असेही ते म्हणाले.