शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

यांत्रिकीकरणाचा ‘जीवा-शिवा’च्या जोडीला फटका !, बैलांच्या संख्येत घट

By नितीन काळेल | Updated: July 9, 2025 14:23 IST

छोटी यंत्रे आली; बैलांचा वर्षभर सांभाळा नको !

नितीन काळेलसातारा : गावांचेही शहरीकरण आणि शेतात यांत्रिकीकरणाला सुरूवात झाल्याने बळीराजाच्या ‘जीवा-शिवा’ची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे. मागील २० व्या पशुगणेत जिल्ह्यात सुमारे ४० हजारांवर बैल नोंद झाले होते. पण, आताच्या २१ व्या गणनेत २४ हजारांवर नोंद झाल्याचे समोर येत आहे. यामुळे बळीराजाही बैलांपासून दूर जात असल्याचे स्पष्ट होत आहे.शेती कसण्यासाठी पूर्वांपार बैलाचा वापर करण्यात येत असे. २५ वर्षांपूर्वीपर्यंततरी अधिक करुन बैल हेच शेतीच्या कामासाठीचे मुख्य साधन होते. पण, जागतिकीकरणाच्या लाटेत सर्वच क्षेत्रात अमुलाग्र बदल झाला आहे. गावांत सर्व सुख, सुविधा, यंत्रे पोहोचलीत. त्यामुळे गावेही कात टाकत असून शहरीकरण वाढत चालले आहे. त्यामुळे शेतीतही क्रांतिकारक बदल होत आहेत. शेतकरी यांत्रिकीकरणाला प्राधान्य देत आहे. त्यामुळे शेती कसण्यासाठी बैलांचा वापर कमी झाला आहे. तसेच शेतकरी यंत्रे खरेदी करुन वापर करत आहेत. याचा परिणाम असा झाला आहे की बैलांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे.सातारा जिल्ह्यात पाच वर्षांपूर्वी २० वी पशुगणना झाली. त्यावेळी ४० हजार ६६९ बैलांची नोंद झालेली. पण, नुकत्याच झालेल्या २१ व्या पशुगणनेत जिल्ह्यात फक्त २४ हजार २१७ बैलांची नोंद आहे. म्हणजे काही वर्षांतच बैलांच्या संख्येत जवळपास ४० टक्के घट झाल्याचे स्पष्ट होत आहे. आताच्या पशुगणनेची आकडेवारी अजून जाहीर नसलीतरी नोंदीचा आकडा समोर आलेला आहे.

छोटी यंत्रे आली; बैलांचा वर्षभर सांभाळा नको !शेतीसाठी छोटी यंत्रे आली आहेत. ट्रॅक्टरही छोटा मिळत आहे. यामुळे शेतकरी ही यंत्रे सहजच खरेदी करतो. तर दुसरीकडे बैलांचा वर्षभर सांभाळ करायचा. त्यांना खाऊ घालायचे. त्यासाठी चारा आणि मनुष्यबळ लागते. त्यापेक्षा यंत्रे फायद्याची हे गणित ओळखून शेतकऱ्यांचा बैलाकडे ओढा कमी झाल्याचे वास्तव आहे.

जिल्ह्यातील पशुधन ११ लाखांवर..जिल्ह्यात २० व्या पशुगणनेनुसार १२ लाख ८ हजार ८७५ पशुधनाची नोंद झाली होती. तर आताच्या २१ व्या गणनेत ११ लाख १३ हजार ६०४ जनावरांची नोंद झालेली आहे. केंद्र शासन अधिकृतरित्या ही आकडेवारी जाहीर करणार आहे. पण, मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील पशुधनात ७ ते ८ टक्के घट झाली आहे. तसेच गायवर्गीय पशुधनाची संख्या वाढली आहे. म्हैसवर्गीय जनावरांची संख्या कमी झाली आहे. गायवर्गीय ३ लाख ५६ हजार ४८३ तर म्हैसवर्गीय संख्या २ लाख ५२ हजार १३० आहे.