शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी! पाकसमोर टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

कृत्रिम तळ््याच्या भिंतीवर घसरगुंडी!

By admin | Updated: January 7, 2016 01:00 IST

गाळ कायम : लहान मुलांचा जीवघेणा खेळ; काही तरी मिळण्याच्या हव्यासापोटी मोठ्यांचीही शोधमोहीम

सातारा : सातारा नगरपालिकेने गणेशमूर्ती व दुर्गा मूर्ती विसर्जनासाठी येथील प्रतापसिंह शेती फार्ममध्ये तयार केलेल्या कृत्रिम तळ््याची सुरक्षा रामभरोसे आहे. मूर्ती विसर्जनाला तीन महिने उलटले असले तरीही पालिकेने या तळ्यातील गाळ काढलेला नाही. मंगळवार व मोती तळ््यातील जलप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेने शहरात कृत्रिम तळी तयार करून त्यात मूर्ती विसर्जनाची सोय केली. लाखो रुपये खर्चून पालिकेने ही उपाययोजना केली आहे. मात्र, मूर्ती विसर्जनानंतर साठणाऱ्या गाळाचे काय?, याबाबत निर्णय घेतला नसल्याने विसर्जित केलेल्या मूर्ती तळ्यात तशाच पडलेल्या दिसतात. तळ्यातील पाणीही आटले असल्याने रंग निघून गेलेल्या मूर्ती उघड्या पडल्या आहेत. तळ्याच्या भिंतीची माती पिचिंग केलेली नसल्याने ती तळ््यात खाली ढासळत आहे. या तळ््यातून काही साहित्य मिळेल या हेतूनेही काही लोक या ठिकाणी तळ ठोकून असल्याचे पाहायला मिळते. मोठी माणसे तळ्यात उतरुन मूर्तींच्या भोवतीचे लोखंड काढण्यात गुंतलेली असतात. या भंगाराच्या माध्यमातून आपल्या गुजराण करण्यासाठी ही मंडळी मोठी जोखीम उचलत असल्याचे याठिकाणी पाहायला मिळत आहे. लोखंडी, लाकडी फळ््या, बांबू असे काही साहित्य त्यांच्या हाती लागते. मोठी माणसे भंगार गोळा करण्यासाठी तळ््यात उतरत असताना त्यांची लहान मुले तळ्याच्या भिंतीवर घसरगुंडीचा खेळ खेळत असतात. तळ्याच्या भिंतींचा वापर लहान मुले घसरगुंडीसारखा करत आहेत. या खेळामुळे तळ्याच्या भिंतींची माती तळ्यात कोसळत आहे. त्यात भिंतींना योग्य प्रकारे पिचिंग केले नसल्याने या भिंती खाली कोसळून एखाद्याचा गुदमरून जीवही जाऊ शकतो. पालिकेने मात्र विसर्जनानंतर या तळ्याकडे पुरते दुर्लक्ष केलेले आहे. गाळ काढून पालिकेने या तळ्यावर देखरेख ठेवण्याची मागणी सातारकरांमधून होत आहे. (प्रतिनिधी)सुरक्षा रामभरोसे..तळ्याच्या भिंतीवरून घसरत तळ्यात जाण्याचे प्रयत्न मुलांकडून होत आहेत. मुलांना हा खेळ खेळताना गंमत वाटली असली तरी तळे कोरडे असल्याने एखाद्या वेळेस तोल जाऊन कोणी तळ्यात कोसळले तर तळ्यात असणाऱ्या लोखंडी गजावर पडून एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. तळ्यावरच्या हालचाली रस्त्यावरून दिसून येत नाहीत; परंतु एखाद्या वेळेस दुर्घटना घडली तरी ते लगेच कळून येणेही अवघड आहे. त्यामुळे दुर्घटनेतील व्यक्तिंना तत्काळ मदत कशी मिळणार? हा प्रश्न पडतो.- संभाजी लोखंडे, नागरिक