शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
5
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
7
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
8
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
9
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
10
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
11
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
12
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
13
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
14
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
15
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
16
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
17
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
18
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
19
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
20
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार

कांद्याच्या सतरा हजार पिशव्यांची आवक लोणंद बाजार समिती ; दरातील चढ-उतारामुळे शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 11:54 PM

लोणंद : कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन हळव्या कांद्यांच्या सतरा हजार पिशव्यांची आवक झाली.

लोणंद : कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन हळव्या कांद्यांच्या सतरा हजार पिशव्यांची आवक झाली. कांद्याचे दर दीड हजार रुपये प्रति क्ंिवटलपर्यंत तेजीत निघाले. दरामध्ये चढ-उतार होत असल्याने कांदा काढणीस आलेले शेतकरी बाजारभावाचा अंदाज घेऊन आपला कांदा टप्प्याटप्प्याने लोणंद बाजार समितीत विक्रीस आणत आहेत.

लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा खरेदी-विक्रीसाठी राज्यात प्रसिद्ध आहे. लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीत खंडाळा, फलटण, माण, कोरेगाव, वाई, पुरदंर, बारामती तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीस येतो. लोणंद परिसरात पिकणाºया दर्जेदार कांद्यामुळे कांद्याचा देशभरात नावलौकिक आहे.

कांदा नाशवंत पीक असून, उन्हाळ्यात शेतकºयांनी साठवलेला गरवा कांदा काही काळापर्यंत मार्केटला पुरतो. उन्हाळी कांदा फक्त महाराष्ट्रातच पिकतो, त्यामुळे नंतर नवीन हळवा कांदा बाजार येईपर्यंत कांदाचे दर मोठ्या प्रमाणात वाढतात. गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, तामिळनाडू राज्यात मोठ्या प्रमाण कांदा पिकतो. यंदा पडलेला पाऊस सर्वत्रच कांदा पिकास पोषक वातावरण असून, कांदा उत्पादक भागामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पन्न झाले आहे. त्यामुळे बाजार समित्यामधील कांदयाची आवक चांगलीच वाढलेली दिसत आहे.

लोणंद कृषी उत्त्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हळव्या कांद्याची आवक सतरा हजार पिशव्या झाली आहे. कांद्याचे दर दीड हजार रुपये प्रति क्विटंलपर्यंत निघाले. कांद्याचा दर दीड हजार रुपयांवर गेल्याने कांदा उत्पादकांना अनेक वर्षांनी चांगले दिवस आल्याचे दिसत आहे. लोणंद बाजार समितीत कांद्याच्या दरामध्ये चढ-उतार होत असल्याने कांदा काढणीस आलेले कांदा उत्पादक शेतकरी बाजारभावाचा अंदाज घेऊन आपला कांदा टप्प्याटप्प्याने लोणंद विक्रीस आणताना दिसत आहे.कांद्याचे दर (प्रति क्विंटल)यामध्ये नंबर एक १, २०० ते १,५००. नंबर दोन ९०० ते १, २०० तर तीन नंबरचा कांदा ५०० ते ९००. गोल्टी कांदा ५०० ते ७०० रुपये असे निघाले आहेत.

प्रतवारी करून आणावेलोणंद बाजार समितीमध्ये शेतकºयांनी कांदा चांगला वाळवून प्रतवारी करून विक्रीस आणावा, असे आवाहन सभापती राजेंद्र तांबे, उपसभापती दत्तात्रय बिचुकले व सचिव विठ्ठल सपकाळ यांनी केले.