शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
5
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
6
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
7
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
8
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
9
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
10
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
11
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
12
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
13
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
14
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
15
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
16
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
17
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
18
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
19
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
20
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

चाकरमानींच्या येण्याने गावकऱ्यांमध्ये धाकधूक, गणेशोत्सवासाठी मुंबई-पुण्याहून पुन्हा ये-जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 15:10 IST

परळी खोऱ्याला निसर्गाच्या सौंदर्याचे वरदान लाभले पण रोजगार नसल्याने येथील ऐंशी टक्के तरुण मुंबई-पुण्यात स्थित आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही चाकरमानी पुन्हा गावी येऊ लागले आहेत. साताऱ्याचा पास नाही मिळाला तर कोल्हापूर, सांगलीचा मिळवून ते गावी येत आहेत. यामुळे गावकऱ्यांची धाकधूक मात्र वाढली आहे.

ठळक मुद्दे चाकरमानींच्या येण्याने गावकऱ्यांमध्ये धाकधूक, गणेशोत्सवासाठी मुंबई-पुण्याहून पुन्हा ये-जासाताऱ्याचा पास न मिळाल्याने सांगली, कोल्हापूरच्या ई-पासवर दाखल

अक्षय सोनटक्केपरळी : परळी खोऱ्याला निसर्गाच्या सौंदर्याचे वरदान लाभले पण रोजगार नसल्याने येथील ऐंशी टक्के तरुण मुंबई-पुण्यात स्थित आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही चाकरमानी पुन्हा गावी येऊ लागले आहेत. साताऱ्याचा पास नाही मिळाला तर कोल्हापूर, सांगलीचा मिळवून ते गावी येत आहेत. यामुळे गावकऱ्यांची धाकधूक मात्र वाढली आहे.सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात सात हजारांपेक्षा अधिक रुग्ण वाढले आहेत. तरीही पुणे, मुंबई या बाधित भागातून गावी येणाऱ्यांचे प्रमाण वाढतच आहे. गणेशोत्सवात गर्दी वाढल्यास कोरोनावर नियंत्रण मिळवणे अशक्य होणार आहे. आता गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच येणाऱ्यांच्या विलगीकरणाचा कालावधी दहा दिवस की चौदा दिवस, याबाबतचा संभ्रम अधिक वाढला आहे.गणेशोत्सवासाठी गावाला येण्याचा चाकरमान्यांचा निर्धार कायम आहे. काही ई-पास घेऊन दाखलही झाले आहेत. चौदा दिवसांचे विलगीकरण गृहीत धरून त्यानंतर गणेशोत्सवाचा निखळ आनंद घेण्याच्यादृष्टीने जुलैपासूनच काही मुंबई-पुणेकर भागात दाखल झाले आहेत. बाकीचे ई-पासची प्रतीक्षा करीत आहेत. काहींच्या ई-पासला विलंब होऊ लागल्याने त्यांचा जीवही टांगणीला लागला आहे.गणेशोत्सवासाठी येणाऱ्यांमध्ये सौम्य लक्षणे आढळल्यास त्यांना चौदा दिवसांचे संस्थात्मक तसेच घरी विलगीकरण करण्यात येईल, तर लक्षणे नसणाऱ्यांचे थेट घरी चौदा दिवस विलगीकरण करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने आधीच जाहीर केले आहे. तरीही नक्की किती दिवसांचे होम क्वारंटाईन होणार याचा मेळ लागत नाही.

या सगळ्या गदारोळात चाकरमानी गावातही दाखल होऊ लागल्याने ग्रामस्थांची भीती वाढली आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढणार, या भयाने काही गावांनी चाकमान्यांनी चौदा दिवस विलगीकरणाचा नियम पाळलाच पाहिजे, अशी भूमिका घेतली होती. चाकरमान्यांना ई पासबाबत अनेक अडचणी येत आहेत. वेळेत पास मिळत नसल्याने त्यांच्याही मनात धाकधूक आहे.ई-पासचा होतोय विलंबकोरोनामुळे जिल्ह्यात दाखल होण्यासाठी ई-पासची सोय केली आहे. परंतु साताऱ्यातील इ-पास मिळण्यासाठी विलंब होत आहे. तर काहीवेळेला मिळत नाही. त्यामुळे चाकरमान्यांना ई-पासबाबत अनेक अडचणी येत आहेत. काहीवेळेला सातारा पास मिळत नसल्याने सांगली, कोल्हापूर नावाने पास जनरेट करुन सातारा जिल्ह्यात दाखल होत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरcollectorजिल्हाधिकारी