शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

चाकरमानींच्या येण्याने गावकऱ्यांमध्ये धाकधूक, गणेशोत्सवासाठी मुंबई-पुण्याहून पुन्हा ये-जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 15:10 IST

परळी खोऱ्याला निसर्गाच्या सौंदर्याचे वरदान लाभले पण रोजगार नसल्याने येथील ऐंशी टक्के तरुण मुंबई-पुण्यात स्थित आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही चाकरमानी पुन्हा गावी येऊ लागले आहेत. साताऱ्याचा पास नाही मिळाला तर कोल्हापूर, सांगलीचा मिळवून ते गावी येत आहेत. यामुळे गावकऱ्यांची धाकधूक मात्र वाढली आहे.

ठळक मुद्दे चाकरमानींच्या येण्याने गावकऱ्यांमध्ये धाकधूक, गणेशोत्सवासाठी मुंबई-पुण्याहून पुन्हा ये-जासाताऱ्याचा पास न मिळाल्याने सांगली, कोल्हापूरच्या ई-पासवर दाखल

अक्षय सोनटक्केपरळी : परळी खोऱ्याला निसर्गाच्या सौंदर्याचे वरदान लाभले पण रोजगार नसल्याने येथील ऐंशी टक्के तरुण मुंबई-पुण्यात स्थित आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही चाकरमानी पुन्हा गावी येऊ लागले आहेत. साताऱ्याचा पास नाही मिळाला तर कोल्हापूर, सांगलीचा मिळवून ते गावी येत आहेत. यामुळे गावकऱ्यांची धाकधूक मात्र वाढली आहे.सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात सात हजारांपेक्षा अधिक रुग्ण वाढले आहेत. तरीही पुणे, मुंबई या बाधित भागातून गावी येणाऱ्यांचे प्रमाण वाढतच आहे. गणेशोत्सवात गर्दी वाढल्यास कोरोनावर नियंत्रण मिळवणे अशक्य होणार आहे. आता गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच येणाऱ्यांच्या विलगीकरणाचा कालावधी दहा दिवस की चौदा दिवस, याबाबतचा संभ्रम अधिक वाढला आहे.गणेशोत्सवासाठी गावाला येण्याचा चाकरमान्यांचा निर्धार कायम आहे. काही ई-पास घेऊन दाखलही झाले आहेत. चौदा दिवसांचे विलगीकरण गृहीत धरून त्यानंतर गणेशोत्सवाचा निखळ आनंद घेण्याच्यादृष्टीने जुलैपासूनच काही मुंबई-पुणेकर भागात दाखल झाले आहेत. बाकीचे ई-पासची प्रतीक्षा करीत आहेत. काहींच्या ई-पासला विलंब होऊ लागल्याने त्यांचा जीवही टांगणीला लागला आहे.गणेशोत्सवासाठी येणाऱ्यांमध्ये सौम्य लक्षणे आढळल्यास त्यांना चौदा दिवसांचे संस्थात्मक तसेच घरी विलगीकरण करण्यात येईल, तर लक्षणे नसणाऱ्यांचे थेट घरी चौदा दिवस विलगीकरण करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने आधीच जाहीर केले आहे. तरीही नक्की किती दिवसांचे होम क्वारंटाईन होणार याचा मेळ लागत नाही.

या सगळ्या गदारोळात चाकरमानी गावातही दाखल होऊ लागल्याने ग्रामस्थांची भीती वाढली आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढणार, या भयाने काही गावांनी चाकमान्यांनी चौदा दिवस विलगीकरणाचा नियम पाळलाच पाहिजे, अशी भूमिका घेतली होती. चाकरमान्यांना ई पासबाबत अनेक अडचणी येत आहेत. वेळेत पास मिळत नसल्याने त्यांच्याही मनात धाकधूक आहे.ई-पासचा होतोय विलंबकोरोनामुळे जिल्ह्यात दाखल होण्यासाठी ई-पासची सोय केली आहे. परंतु साताऱ्यातील इ-पास मिळण्यासाठी विलंब होत आहे. तर काहीवेळेला मिळत नाही. त्यामुळे चाकरमान्यांना ई-पासबाबत अनेक अडचणी येत आहेत. काहीवेळेला सातारा पास मिळत नसल्याने सांगली, कोल्हापूर नावाने पास जनरेट करुन सातारा जिल्ह्यात दाखल होत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरcollectorजिल्हाधिकारी