शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
6
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
7
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
8
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
9
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
10
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
12
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
13
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
14
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
15
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
17
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
18
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
19
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
20
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

सैन्य दलाच्या तळापासून बनले ‘तळिये’

By admin | Updated: March 30, 2015 00:10 IST

१७ व्या शतकापासून इतिहास : तळहिरा ओढ्याच्या काठी वसले गाव

संजय कदम - वाठार स्टेशन -१७ व्या शतकात कोरेगाव तालुक्यातील देऊर गाव हे नागपूरकर भोसले महाराजांचे संस्थान होते. या काळात या राज्याचे संपूर्ण सैन्य देऊर नजीकच्या तळहिरा ओढ्याकाठी असलेल्या ‘चांदणमाळ’ या ठिकाणी तळ ठोकून होते. हाच तळाचा परिसर आज ‘तळिये’ या नावाने ओळखला जात आहे. गावालाही तेच नाव पडले आहे. कोरेगाव तालुक्यातील तळिये गावाशी चव्हाण या आडनावाचे मोठे नाते आहे. पूर्वीचे चौहान व आजचे चव्हाण हे मूळ अजमेर, कोटा व बुंदी (राजस्थान) या ठिकाणचे. मराठ्यांच्या इतिहासात हंबीरराव चव्हाण यांनी मोठी कर्तबगारी दाखवली. त्यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा विठोजी चव्हाण यांनी ही राजाराम महाराजांच्या काळात पराक्रम दाखवला. याचा मोबदला म्हणून विठोजी चव्हाण यांना ‘हिंमत ए बहादूर’ हा किताब देऊन शिरोळ, आटपाडी व कवठेमहांकाळ व सांगोला या ठिकाणी जहागिरी मिळाली होती. आटपाडी येथील तीन भाऊ हे नेर (खटाव), दुसरा तळिये (कोरेगाव) व तिसरा चव्हाणवाडी (फलटण) या ठिकाणी स्थायिक झाले. तळिये गावात आजही चव्हाणांच्या मूळ व्यक्तीची गावातील ग्रामदैवत भैरवनाथ व विठ्ठल मंदिरासमोर समाधी आहे, असा इतिहास असल्याचे येथील स्थानिक ग्रामस्थ सांगतात.तळिये गावाच्या उत्तरेस सर्मथ वाग्देव महाराजांचे समाधिस्थळ आहे. वाग्देव महाराज हे खंडोबा देवाचे भक्त असल्याने ते नियमित जेजुरीची पायी वारी करत. या काळातच त्यांनी तळिये गावतील भिकू गोपाळ चव्हाण यांच्या शेतात खंडोबाच्या पादुका स्थापन केल्या असल्याचे गावकरी सांगतात. या शेजारीच नाथ पंथीय कानिफनाथांचे मंदिर आहे. तळिये हे सुमारे अडीच हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावाची रचना गोलाकार आहे. गावच्या चारही बाजूंने जाण्या-येण्यासाठी प्रशस्त रस्ते व गटारांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वारकरी सांप्रदायिक म्हणून या गावाची या भागात वेगळी ओळख आहे.१९३६ मध्ये या गावाने ग्रामसुधारणा अभियानात सहभाग घेतला होता. गावातील रस्ते, गटारव्यवस्था पाहून या गावचा गौरव ब्रिटिशांनी केला होता. परंतु याच दरम्यान गावाशेजारील तळहिरा ओढ्यात पूर्व बाजूस एक प्रेत जळत होते. याचा धूर यावेळी गाव पाहण्यासाठी आलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या डोळ्यात गेल्याने तळिये गावाचा पहिला नंबर गेल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले. याचा चुकीचा अर्थ काढीत ग्रामस्थांनी अंत्यसंस्काराची जागा प्रत्येकाच्या शेतातच करण्याचे ठरविले. त्यामुळे गेली ७५ वर्षे या गावास स्मशानभूमीची समस्या आहे. नव्याने हा प्रश्न आता सुटला असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. ज्वारी पिकासाठी तळिये हे गाव प्रसिद्ध आहे. येथील ज्वारीस मोठी मागणी आहे. याशिवाय कांदा व बटाटा हे पीक या गावात मोठ्या प्रमाणात घेतले जाते.१७ व्या शतकातील बंधारा आजही...गावाच्या अगदी जवळूनच तळहिरा ओढा गेला आहे. या ओढ्यावर १७ व्या शतकात नागपूरकर भोसले यांनी देऊर संस्थानासाठी पाण्याचे नियोजन करण्यासाठी बंधारा बांधला होता. आजही हा बंधारा या ठिकाणी अस्तित्वात आहे. याच बंधाऱ्याखाली आता तळहिरा हा मोठा पाझर तलाव बांधण्यात आला आहे. या तलावाचा फायदा तळिये, देऊर व वाठारस्टेशन या गावांना होत आहे.