शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

अर्धनग्न मोर्चेकऱ्यांना घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 23:25 IST

सातारा : खंडाळा तालुक्यातील केसुर्डीसह दहा गावांतील शेतकºयांनी काढलेला अर्धनग्न मोर्चा पोलिसांनी मानखुर्दमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता ...

सातारा : खंडाळा तालुक्यातील केसुर्डीसह दहा गावांतील शेतकºयांनी काढलेला अर्धनग्न मोर्चा पोलिसांनी मानखुर्दमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कारण देत अकरा तास भर उन्हात अडवून ठेवला. संध्याकाळी सातच्या सुमारास मोर्चेकºयांचे सुरक्षतेचे कारण सांगत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत चेंबूर येथील साधू वासवानी हायस्कूलमध्ये रवानगी केली.विशेष म्हणजे, मानखुर्दमध्ये मोर्चा अडवल्यानंतर एका आंदोलकाने पालकमंत्री विजय शिवतारे यांना दूरध्वनीद्वारे मदतीची याचना केली. तेव्हा शेतकºयांनी पाठविलेला आंदोलनाचा मेल मिळालाच नाही,’ असे सांगितले. याचाही जाहीर निषेध केला. याबाबतची पालकमंत्री व आंदोलकांमध्ये झालेल्या संभाषणाची ध्वनिफीत सोशल मीडियावर दिवसभर फिरत होती.खंडाळा तालुक्यातील एमआयडीसी टप्पा क्रं. १, २, ३ यामध्ये जमीन संपादन झालेल्या केसुर्डीसह दहा गावांतील शेतकºयांनी खंडाळा तहसील कार्यालय ते मंत्रालय असा अर्धनग्न मोर्चा काढला आहे. शेतकºयांना दोन दिवसांपासून शासनाच्या लालफितीचा फटका बसत आहे. मुंबईच्या वेशीवरच थांबवत कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, असे सांगत मोर्चा अडवण्यात आला. रविवारी तब्बल अकरा तास भर उन्हात शेतकरी बांधवांसहित महिलांनाही अडवण्यात आल्याने शेतकरी बांधवांची कुंचबणा झाली.मानखुर्दमध्ये मोर्चा अडवल्यानंतर मोर्चेकºयांनी पोलिसांकडे केवळ मंत्रालयाकडे जाण्याकरिता मुंबईमधील नागरिकांना कोणताही त्रास न होता केवळ पाच फूट फूटपाथाची मागणी केली. प्रशासनाने मोर्चेकºयांना वरिष्ठ अधिकारी तथा मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या आदेशानुसार मानखुर्दपुढे जाता येणार नसल्याचे सांगण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी त्याचठिकाणी ठिय्या मांडला. पोलिसांनी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास अचानक आंदोलनकर्त्यांच्या सुरक्षतेचे कारण सांगत चेंबूर येथील साधु वासवानी हायस्कूल याठिकाणी पोलिसांच्या गाड्या तसेच आंदोलनकर्र्त्यांच्या बरोबर असलेल्या वाहनातून महिलांसहित रवानगी केली.