शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
4
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
5
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
6
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
7
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
8
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
9
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
10
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
11
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
12
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
13
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
14
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
15
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
16
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
17
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
18
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
19
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
20
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल

अप्पासाहेब सार्वजनिक जीवनाचे भूषण : राम नाईक: जयवंतराव भोसलेंना जयंतीदिनी अभिवादन; म्युझियमचे लोकार्पण, पुतळ्याचे अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 23:36 IST

कºहाड : ‘जयवंतराव भोसले हे जबरदस्त इच्छाशक्ती असणारे व्यक्तिमत्त्व होते. म्हणून तर त्यांच्या हातून एवढे मोठे कार्य उभे राहिले. त्यांच्या कार्याविषयी ऐकून होतो;

कºहाड : ‘जयवंतराव भोसले हे जबरदस्त इच्छाशक्ती असणारे व्यक्तिमत्त्व होते. म्हणून तर त्यांच्या हातून एवढे मोठे कार्य उभे राहिले. त्यांच्या कार्याविषयी ऐकून होतो; पण ते प्रत्यक्ष पाहता यावे, त्यातून मला काही प्रेरणा घेता यावी म्हणून आजच्या जयंती कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलो. अप्पासाहेब महाराष्ट्रातील सार्वजनिक जीवनाचे भूषण आहेत,’ असे मत उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी व्यक्त केले.कºहाड येथे जयवंतराव भोसले यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते जयवंतराव भोसले म्युझियमचे लोकार्पण, जयवंतराव भोसले यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि ‘भगीरथ’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आमदार पतंगराव कदम, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार दिलीप देशमुख, चिमणराव डांगे, मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते, डॉ. सुरेश भोसले, रघुनाथराजे निंबाळकर, मधुकर भावे, डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.राम नाईक म्हणाले, ‘मी आमदार असताना १९८० मध्ये जयवंतराव भोसले हेही काहीकाळ विधान परिषदेवर आमदार होते. त्यावेळी त्यांच्याशी माझा परिचय झाला. एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची त्यावेळी ख्याती निर्माण झाली होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल मनात कुतूहल होते. येथे आल्यानंतर त्यांच कर्तृत्व पाहायला आणि ऐकायला मिळालं. अन् अप्पासाहेब महाराष्ट्रातील सार्वजनिक जीवनाचे भूषण आहेत, याची मनोमन खात्री पटली. माणसं अलहाबादला त्रिवेणी संगम पाहायला येतात; पण याठिकाणी जयवंतराव भोसले यांच्या म्युझियमचे लोकार्पण, पुतळ्याचे अनावरण आणि त्यांच्यावरील ‘भगीरथ’ या ग्रंथाचे प्रकाशन करून त्रिवेणी संगम साधला.’डॉ. पतंगराव कदम म्हणाले, ‘यशवंत हो, जयवंत हो या दोन भावांचं कर्तृत्व साºया महाराष्ट्रानं पाहिलं आहे. यशवंतराव चव्हाण यांनीही या दोघांना खिलार बैलांची जोड म्हणून गौरविले होते. त्यांचे कार्य खरंच कौतुकास्पद आहे.’शिवाजीराव नाईक म्हणाले, ‘कृष्णा काठावर परिवर्तन घडविणारे नेतृत्व म्हणून जयवंतराव भोसले यांच्याकडे पाहावे लागेल. राज्याला प्रेरणा देतील, अशा प्रकारे त्यांनी संस्थांचा कारभार करून दाखविला.’माजी मंत्री दिलीप देशमुख म्हणाले, ‘सहकार क्षेत्र हे लोकशाहीच्या बळकटीचे क्षेत्र आहे, हे जयवंतराव भोसले यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.’मदनराव मोहिते म्हणाले, ‘जयवंतराव भोसले यांनी ‘आधी केले आणि मग सांगितले’ या उक्तीचा वापर केला. त्यामुळेच ही विकासगंगा पाहायला मिळते.’डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ‘अप्पांची जयंती आम्ही संकल्प दिन म्हणून साजरी करतो. त्यांनी केलेल्या कामाला यादिवशी उजाळा देतो. आणि जे अपूर्ण आहे, ते पूर्ण करण्याचा संकल्प करीत असतो.’डॉ. अतुल भोसले म्हणाले, ‘दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या पुतळ्याचे अनावरण आज तितक्याच तोलामोलाचे असणाºया व्यक्तीच्या हस्ते होत आहे. उत्तरप्रदेशला उत्तम प्रदेश बनविण्याचा प्रयत्न राम नाईक करीत आहेत.’... अन् साºयांचे डोळे पाणावलेजयवंतराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला दिग्गजांची उपस्थिती होती. तर समोर हजारो कार्यकर्तेही होते. व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला जयवंतराव भोसले यांच्या अर्धांगिनी जयमाला भोसले स्थानापन्न झाल्या होत्या. आणि कार्यक्रमाच्या मध्येच अप्पांना सुख-दु:खात साथ देणाºया जयमाला भोसले यांना सत्कारासाठी व्यासपीठावर बोलविण्यात आले. त्यावेळी त्यांचे डोळे पाणावले. तर सहृदयी सत्कार पाहून उपस्थितांच्या पापण्याही ओलावल्या.कºहाड येथे शुक्रवारी जयवंतराव भोसले यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी जयवंतराव भोसले यांच्या पुतळ्याचे अनावरण उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, माजी मंत्री पतंगराव कदम, डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले आदी उपस्थित होते.