शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्यातील धरणांमध्ये आणखी १०२ टीएमसी पाणी शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 20:11 IST

सातारा : पाणीदार सातारा जिल्यातील प्रमुख धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, धोम-बलकवडी, तारळी या प्रमुख धरणांमध्ये मिळून २० फेबु्रवारीपर्यंत तब्बल १०२.६० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्याचबरोबरच बहुतांश लघुप्रकल्प व तलावांमध्येही पाणी शिल्लक असल्याने यंदा उन्हाळा सुस' जाणार आहे.सातारा जिल्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. जिल्यातून ...

ठळक मुद्देउन्हाळा सुस' : लहान-मोठ्या तलावांमध्येही मुबलक साठा असल्याने चिंता दूर

सातारा : पाणीदार सातारा जिल्यातील प्रमुख धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, धोम-बलकवडी, तारळी या प्रमुख धरणांमध्ये मिळून २० फेबु्रवारीपर्यंत तब्बल १०२.६० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्याचबरोबरच बहुतांश लघुप्रकल्प व तलावांमध्येही पाणी शिल्लक असल्याने यंदा उन्हाळा सुस' जाणार आहे.

सातारा जिल्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. जिल्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. दुष्काळी मराठवाड्यातील एखाद्या जिल्'ात वर्षभर पडत असेल तेवढा पाऊस महाबळेश्वर, नवजा, तापोळा या परिसरात एका दिवसात पडतो. त्यामुळे या जिल्'ातील धरणेही मोठ्या प्रमाणावर भरलेले असते. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या १०५.२५ टीएमसी क्षमतेचे कोयना धरणात दरवर्षी आॅगस्टपर्यंतच भरून ओसांडून वाहत असते.सातारा, महाबळेश्वर, जावळी, वाई, पाटण, कºहाड या परिसरात मुसळधार पाऊस पडत असला तरी माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यांना दुष्काळाच्या झळाही तेवढ्याच तीव्रतेने जाणवतात. जनावरांना पशुधन मिळत नसल्याने चारा छावण्या सुरू करण्याची वेळ माण, खटावमध्ये येत होती.गेल्यावर्षी जिल्'ात चांगल्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणांमध्ये मुलबक पाणीसाठा झाला आहे. प्रमुख धरणांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त पाणी शिल्लक आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता असणार नाही; पण शेतीच्या पाण्याचा प्रश्न डोके वर काढू शकतो.लघु प्रकल्पांतही साठासातारा शहराला कास, शहापूर, महादरे तलावातून पाणीपुरवठा केला जातो. या तिन्हीमध्ये सध्या पाणी आहे. तरीही सातारा पालिकेने आठवड्यातून एकदा पाणीकपातीचे संकेत दिले आहेत. त्याचप्रमाणे येरळामध्ये ०.२२, नेरमध्ये ०.१३६, आंधळीत ०.०८८ तर राणंदमध्ये ०.१३४ टीएमसी पाणी शिल्लक आहे.दुष्काळीपट्ट्यातही पाणी योजनेचे काममाण, खटाव या तालुक्यामधील दुष्काळ कायमचा हद्दपार करण्यासाठी अनेक गावांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर पाण्याची कामे झाले आहेत. या भागातही पाणीसाठा काही अंशी शिल्लक आहे. एप्रिल, मे महिन्यात त्या तालुक्यांची तहान भागविण्याची मदार या कामावर आहे.आता बाष्पीभवनही वाढणारमार्च महिना उजेडला की उन्हाची तीव्रता वाढणार आहे. साहजिकच बाष्पीभवन झपाट्याने होऊन पाणी कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सध्या मुबलक पाणी असले तरी पाण्याची बचत करणेच योग्य ठरणार आहे.