शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

जिल्यातील धरणांमध्ये आणखी १०२ टीएमसी पाणी शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 20:11 IST

सातारा : पाणीदार सातारा जिल्यातील प्रमुख धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, धोम-बलकवडी, तारळी या प्रमुख धरणांमध्ये मिळून २० फेबु्रवारीपर्यंत तब्बल १०२.६० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्याचबरोबरच बहुतांश लघुप्रकल्प व तलावांमध्येही पाणी शिल्लक असल्याने यंदा उन्हाळा सुस' जाणार आहे.सातारा जिल्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. जिल्यातून ...

ठळक मुद्देउन्हाळा सुस' : लहान-मोठ्या तलावांमध्येही मुबलक साठा असल्याने चिंता दूर

सातारा : पाणीदार सातारा जिल्यातील प्रमुख धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना, धोम, कण्हेर, उरमोडी, धोम-बलकवडी, तारळी या प्रमुख धरणांमध्ये मिळून २० फेबु्रवारीपर्यंत तब्बल १०२.६० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्याचबरोबरच बहुतांश लघुप्रकल्प व तलावांमध्येही पाणी शिल्लक असल्याने यंदा उन्हाळा सुस' जाणार आहे.

सातारा जिल्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. जिल्यातून गेलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. दुष्काळी मराठवाड्यातील एखाद्या जिल्'ात वर्षभर पडत असेल तेवढा पाऊस महाबळेश्वर, नवजा, तापोळा या परिसरात एका दिवसात पडतो. त्यामुळे या जिल्'ातील धरणेही मोठ्या प्रमाणावर भरलेले असते. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या १०५.२५ टीएमसी क्षमतेचे कोयना धरणात दरवर्षी आॅगस्टपर्यंतच भरून ओसांडून वाहत असते.सातारा, महाबळेश्वर, जावळी, वाई, पाटण, कºहाड या परिसरात मुसळधार पाऊस पडत असला तरी माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यांना दुष्काळाच्या झळाही तेवढ्याच तीव्रतेने जाणवतात. जनावरांना पशुधन मिळत नसल्याने चारा छावण्या सुरू करण्याची वेळ माण, खटावमध्ये येत होती.गेल्यावर्षी जिल्'ात चांगल्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणांमध्ये मुलबक पाणीसाठा झाला आहे. प्रमुख धरणांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त पाणी शिल्लक आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता असणार नाही; पण शेतीच्या पाण्याचा प्रश्न डोके वर काढू शकतो.लघु प्रकल्पांतही साठासातारा शहराला कास, शहापूर, महादरे तलावातून पाणीपुरवठा केला जातो. या तिन्हीमध्ये सध्या पाणी आहे. तरीही सातारा पालिकेने आठवड्यातून एकदा पाणीकपातीचे संकेत दिले आहेत. त्याचप्रमाणे येरळामध्ये ०.२२, नेरमध्ये ०.१३६, आंधळीत ०.०८८ तर राणंदमध्ये ०.१३४ टीएमसी पाणी शिल्लक आहे.दुष्काळीपट्ट्यातही पाणी योजनेचे काममाण, खटाव या तालुक्यामधील दुष्काळ कायमचा हद्दपार करण्यासाठी अनेक गावांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर पाण्याची कामे झाले आहेत. या भागातही पाणीसाठा काही अंशी शिल्लक आहे. एप्रिल, मे महिन्यात त्या तालुक्यांची तहान भागविण्याची मदार या कामावर आहे.आता बाष्पीभवनही वाढणारमार्च महिना उजेडला की उन्हाची तीव्रता वाढणार आहे. साहजिकच बाष्पीभवन झपाट्याने होऊन पाणी कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सध्या मुबलक पाणी असले तरी पाण्याची बचत करणेच योग्य ठरणार आहे.