शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

ऐन उन्हाळ्यात वीज कंपनीचा मेंटेनन्स, साताराकर घामाघूम : तापमान ३९ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 17:05 IST

उन्हाळ्याने लोकांना हैराण केले असतानाच सातारा शहरातील वीजपुरवठा मंगळवारी मेंटेनन्ससाठी वीज कंपनीने बंद केल्याने नागरिक त्रासून गेले. तर दुसऱ्या बाजुला ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने शेतीपंपाची कनेक्शन्स काही ठिकाणी बंद असल्याने शेतकऱ्यावर संक्रात आली आहे. त्यामुळे वीज कंपनी एकप्रकारे सुड उगवत आहे की काय, अशी विचारणा नागरिक व शेतकऱ्यांतून होत आहे. दरम्यान, साताऱ्यांतील कमाल तापमान ३९ अंशावर गेले असून घामाच्या धारा लागत आहेत.

ठळक मुद्देऐन उन्हाळ्यात वीज कंपनीचा मेंटेनन्स, साताराकर घामाघूम तापमान ३९ अंशावर ग्रामीण भागात तर विजेअभावी शेतकऱ्यांवर संक्रात

सातारा : उन्हाळ्याने लोकांना हैराण केले असतानाच सातारा शहरातील वीजपुरवठा मंगळवारी मेंटेनन्ससाठी वीज कंपनीने बंद केल्याने नागरिक त्रासून गेले. तर दुसऱ्या बाजुला ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने शेतीपंपाची कनेक्शन्स काही ठिकाणी बंद असल्याने शेतकऱ्यावर संक्रात आली आहे. 

वीज कंपनी एकप्रकारे सुड उगवत आहे की काय, अशी विचारणा नागरिक व शेतकऱ्यांतून होत आहे. दरम्यान, साताऱ्यांतील कमाल तापमान ३९ अंशावर गेले असून घामाच्या धारा लागत आहेत.गेल्या एक महिन्यापासून जिल्ह्यात उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. साताऱ्यांतील कमाल तापमान ३९ अंशावर गेले असून जिल्ह्यातील पूर्व भागात तर ४० च्या आसपास आहे. त्यामुळे अंगाची काहिली होत आहे.

वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या सुमारास सर्वजण घरात थांबणे पसंद करतात. त्यावेळी पंखा, एसी, कुलरचा वापर करण्यात येत आहे. असे असतानाच वीज कंपनीकडून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार होत आहे.साताऱ्यात तर मंगळवारी सकाळपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीज वितरण कंपनीकडून मेंटेशन्ससाठी वीज बंद करण्यात आली आहे, असे सांगण्यात आले. येथून पुढे गरज असेल त्यावेळी मंगळवारच्या दिवशी वीज बंद ठेवण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना उनाबरोबच वीज नसल्याने त्रास सहन करावा लागणार आहे.दुसरीकडे माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील एका ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे विद्युत पंप बंद पडले आहेत. त्यामुळे उन्हाळी पिकांना पाणी कसे द्यायचे असा प्रश्न पडला आहे.

याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर विजेचे थकित बील असल्याने ट्रान्सफॉर्मर मिळत नाही, असे सांगण्यात आले. ऐन उन्हाळ्यातच वीज कंपनीचा असा कारभार सुरू असल्याने नागरिकांसह शेतकरीही हैराण झाले आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTemperatureतापमान