शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पशुपक्षी आक्रोशात... वणवा विझवायला तरुणाई जोशात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:12 IST

ऑन दि स्पॉट प्रगती जाधव-पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : रात्रीच्या किर्रर अंधारात भैरोबाचा डोंगर पेटलेला अनेकांनी पाहिला; पण ...

ऑन दि स्पॉट

प्रगती जाधव-पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : रात्रीच्या किर्रर अंधारात भैरोबाचा डोंगर पेटलेला अनेकांनी पाहिला; पण तो विझविण्यासाठी डझनभर पोरांनी जिवाचं रान केलं. पशुपक्ष्यांच्या आक्रोशात वनसंपदा जळून खाक होत होती, तर सरपटणारे जीव सैरभैर होऊन पळून पुन्हा आगीच्याच तावडीत सापडून राख होत होते. मनुष्याच्या छोट्याशा चेष्टेने शेकडो जीव या जाळाच्या भक्ष्यस्थानी गेले.

भैरोबाच्या पायथ्याला संध्याकाळी फिरायला आणि व्यायामाला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. शेकडो डोळ्यांनी वणव्याची सुरुवात पाहिली, पण त्याला अटकाव करण्यासाठी कोणीही पुढं गेलं नाही. व्ही केअर ग्रुपमधील काही तरुणांनी ही आग शाहूपुरीत, तर काहींनी यवतेश्वर घाटातून पाहिली आणि त्यांनी भैरोबाच्या पायथ्याकडे धाव घेतली. सहाच्यासुमारास वणवा विझविण्यासाठी गेलेल्या तरुणांनी मिळेल त्या हिरव्या फांद्यांनी ही आग नियंत्रणात आणली. पण आगीने रौद्ररूप धारण केलं आणि हिरव्या झाडांनीही पेट घेतला.

वणवा विझविण्याच्या प्रयत्नात डोंगरात वरपर्यंत गेलेल्या तरुणांना परतीचा मार्ग सापडत नव्हता. त्यांनी पर्यावरण अभ्यासक सुनील भोईटे यांना संपर्क साधून मदतीची मागणी केली. त्यानंतर पाणी आणि खाऊचे साहित्य घेऊन साताऱ्यातून काहीजण भैरोबा पायथा आणि काहीजण यवतेश्वर माथ्यावर पोहोचले. अथक प्रयत्नानंतर मोबाईलच्या लाईटच्या आधारावर त्यांना परतीचा मार्ग दाखवून या मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं.

कोट :

निसर्गचक्रात प्रत्येक घटक अमूल्य आहे. वणवा लावल्यानंतर तिथं होणारी जैविक आणि जीवित हानी न भरून येणारी आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले साप, घोरपड, सरडे, पक्षी यांना बघणं खेदजनक आहे. इथं आम्हाला त्रास झाला ज्वाळांमुळे, जखमाही झाल्या, पण वणवा विझवायला यापुढंही आम्ही धाऊ, हे नक्की.

- ओंकार ढाले, व्ही केअर ग्रुप

चौकट :

देवाची चूड वन्यजीवांसाठी घातक!

नव्याच्या पौर्णिमेला देव शिकारीला जातात. त्यांना मार्ग दाखविण्यासाठी चूड केली जाते, अशी अख्यायिका आहे. मोठ्या काठीला गवत बांधून ते जाळून मंदिराला प्रदशिक्षणा घातली जाते. ही पेटती चूड विझवायची पध्दत नाही म्हणून ती ओढ्यात किंवा अन्य मोकळ्या जागेत टाकली जाते. त्यामुळे या दिवसांत वणवे लागण्याची संख्या अधिक असते.

सहा ते रात्री दीड वणव्याचा थरार

शाहूपुरी परिसरातील मुलांनी भैरोबाच्या पायथ्यापासून वणवा लागलेलं सायंकाळी ६ च्या सुमारास पाहिले. याची माहिती वनविभागाला देऊन तातडीने गाड्या काढून ही मुलं वनक्षेत्रात पोहोचली. हातात येईल त्या हिरव्या फांद्या घेऊन त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण अंधार होईल तसं वाऱ्याच्या वेगाने ही आगही पसरत गेली. आग विझविण्याच्या प्रयत्नात ही मुलं जंगलात आतपर्यंत पोहोचली. सोबत नेलेले पाणीही आगीत गेल्याने तब्बल पाच तास ही मुलं पाण्याशिवाय वणव्याशी दोन हात करत होते.

वनविभागाचे कातडी बचाओ धोरण!

वणवा पेटल्यानंतर तिथं जाण्यापूर्वी मदतीसाठी गेलेल्या तरुणांनी वनविभागाला याची माहिती दिली होती. काही वेळाने वनविभागाचे काही कर्मचारीही तेथे पोहोचले, पण अवघ्या काही मिनिटांतच त्यांनी तिथून काढता पाय घेतला. त्यानंतर विविध वन कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण कोणीही प्रतिसाद दिला नाही.

पॉईंटर

१२ आग विझविणारे

१ चक्कर येऊन कोसळला

४ जणांच्या हाताला ज्वाळांच्या जखमा

२ जणांच्या चप्पल, बुटांमधून विस्तव जाऊन जखम

या तरुणांनी घातला जीव धोक्यात

पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाबाबत संवेदनशील असलेल्या तरुणांनी मिळून व्ही केअर या ग्रुपची स्थापना जास्मीन अफगाण यांच्या नेतृत्वाखाली झाली. वणवा विझविण्यासाठी प्रेम अडागळे, ओंकार ढाले, उमेश काळे, मयूर अडागळे, प्रथमेश सोळस्कर, कुशल रोहिरा, संकेत काळे, ऋतुराज पवार, अथर्व कोडक यांनी प्रयत्न केले. त्यांच्याबरोबर संपर्क ठेवून त्यांना जंगलातून बाहेर येण्यासाठी मार्ग दाखविण्याचे काम समीर चव्हाण आणि सुमित शिंदे यांनी केले.