शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

पशुपक्षी आक्रोशात... वणवा विझवायला तरुणाई जोशात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:12 IST

ऑन दि स्पॉट प्रगती जाधव-पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : रात्रीच्या किर्रर अंधारात भैरोबाचा डोंगर पेटलेला अनेकांनी पाहिला; पण ...

ऑन दि स्पॉट

प्रगती जाधव-पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : रात्रीच्या किर्रर अंधारात भैरोबाचा डोंगर पेटलेला अनेकांनी पाहिला; पण तो विझविण्यासाठी डझनभर पोरांनी जिवाचं रान केलं. पशुपक्ष्यांच्या आक्रोशात वनसंपदा जळून खाक होत होती, तर सरपटणारे जीव सैरभैर होऊन पळून पुन्हा आगीच्याच तावडीत सापडून राख होत होते. मनुष्याच्या छोट्याशा चेष्टेने शेकडो जीव या जाळाच्या भक्ष्यस्थानी गेले.

भैरोबाच्या पायथ्याला संध्याकाळी फिरायला आणि व्यायामाला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. शेकडो डोळ्यांनी वणव्याची सुरुवात पाहिली, पण त्याला अटकाव करण्यासाठी कोणीही पुढं गेलं नाही. व्ही केअर ग्रुपमधील काही तरुणांनी ही आग शाहूपुरीत, तर काहींनी यवतेश्वर घाटातून पाहिली आणि त्यांनी भैरोबाच्या पायथ्याकडे धाव घेतली. सहाच्यासुमारास वणवा विझविण्यासाठी गेलेल्या तरुणांनी मिळेल त्या हिरव्या फांद्यांनी ही आग नियंत्रणात आणली. पण आगीने रौद्ररूप धारण केलं आणि हिरव्या झाडांनीही पेट घेतला.

वणवा विझविण्याच्या प्रयत्नात डोंगरात वरपर्यंत गेलेल्या तरुणांना परतीचा मार्ग सापडत नव्हता. त्यांनी पर्यावरण अभ्यासक सुनील भोईटे यांना संपर्क साधून मदतीची मागणी केली. त्यानंतर पाणी आणि खाऊचे साहित्य घेऊन साताऱ्यातून काहीजण भैरोबा पायथा आणि काहीजण यवतेश्वर माथ्यावर पोहोचले. अथक प्रयत्नानंतर मोबाईलच्या लाईटच्या आधारावर त्यांना परतीचा मार्ग दाखवून या मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं.

कोट :

निसर्गचक्रात प्रत्येक घटक अमूल्य आहे. वणवा लावल्यानंतर तिथं होणारी जैविक आणि जीवित हानी न भरून येणारी आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले साप, घोरपड, सरडे, पक्षी यांना बघणं खेदजनक आहे. इथं आम्हाला त्रास झाला ज्वाळांमुळे, जखमाही झाल्या, पण वणवा विझवायला यापुढंही आम्ही धाऊ, हे नक्की.

- ओंकार ढाले, व्ही केअर ग्रुप

चौकट :

देवाची चूड वन्यजीवांसाठी घातक!

नव्याच्या पौर्णिमेला देव शिकारीला जातात. त्यांना मार्ग दाखविण्यासाठी चूड केली जाते, अशी अख्यायिका आहे. मोठ्या काठीला गवत बांधून ते जाळून मंदिराला प्रदशिक्षणा घातली जाते. ही पेटती चूड विझवायची पध्दत नाही म्हणून ती ओढ्यात किंवा अन्य मोकळ्या जागेत टाकली जाते. त्यामुळे या दिवसांत वणवे लागण्याची संख्या अधिक असते.

सहा ते रात्री दीड वणव्याचा थरार

शाहूपुरी परिसरातील मुलांनी भैरोबाच्या पायथ्यापासून वणवा लागलेलं सायंकाळी ६ च्या सुमारास पाहिले. याची माहिती वनविभागाला देऊन तातडीने गाड्या काढून ही मुलं वनक्षेत्रात पोहोचली. हातात येईल त्या हिरव्या फांद्या घेऊन त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण अंधार होईल तसं वाऱ्याच्या वेगाने ही आगही पसरत गेली. आग विझविण्याच्या प्रयत्नात ही मुलं जंगलात आतपर्यंत पोहोचली. सोबत नेलेले पाणीही आगीत गेल्याने तब्बल पाच तास ही मुलं पाण्याशिवाय वणव्याशी दोन हात करत होते.

वनविभागाचे कातडी बचाओ धोरण!

वणवा पेटल्यानंतर तिथं जाण्यापूर्वी मदतीसाठी गेलेल्या तरुणांनी वनविभागाला याची माहिती दिली होती. काही वेळाने वनविभागाचे काही कर्मचारीही तेथे पोहोचले, पण अवघ्या काही मिनिटांतच त्यांनी तिथून काढता पाय घेतला. त्यानंतर विविध वन कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण कोणीही प्रतिसाद दिला नाही.

पॉईंटर

१२ आग विझविणारे

१ चक्कर येऊन कोसळला

४ जणांच्या हाताला ज्वाळांच्या जखमा

२ जणांच्या चप्पल, बुटांमधून विस्तव जाऊन जखम

या तरुणांनी घातला जीव धोक्यात

पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाबाबत संवेदनशील असलेल्या तरुणांनी मिळून व्ही केअर या ग्रुपची स्थापना जास्मीन अफगाण यांच्या नेतृत्वाखाली झाली. वणवा विझविण्यासाठी प्रेम अडागळे, ओंकार ढाले, उमेश काळे, मयूर अडागळे, प्रथमेश सोळस्कर, कुशल रोहिरा, संकेत काळे, ऋतुराज पवार, अथर्व कोडक यांनी प्रयत्न केले. त्यांच्याबरोबर संपर्क ठेवून त्यांना जंगलातून बाहेर येण्यासाठी मार्ग दाखविण्याचे काम समीर चव्हाण आणि सुमित शिंदे यांनी केले.