शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

अतिरेकी हस्तक्षेपामुळे कोपतोय निसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : आपत्ती आल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाने सक्रिय होण्यापेक्षा ती येऊच नये यासाठी प्रयत्न होणे आवश्यक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : आपत्ती आल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाने सक्रिय होण्यापेक्षा ती येऊच नये यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. वनविभागासह महसूल, कृषी, पाटबंधारे विभागाने एकत्र येऊन भूस्खलनासारखी समस्या दूर करण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

भूस्खलन होण्याला जेवढी नैसर्गिक कारणे आहेत, तितकंच मानवी हस्तक्षेपाचा वाटाही मोठा आहे. त्यामध्ये डोंगराळ क्षेत्रातील खोदकाम, खाण व्यवसाय, डोंगर उतारावरील जमिनीचे सपाटीकरण, रस्त्यांचा विस्तार, वणवा ही अशास्त्रीय कारणेही महत्त्वाची आहेत. यातील सर्वाधिक धोका हा वणव्यामुळे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वणवा लागल्यामुळे जमिनीची अतिरिक्त धूप होऊन तो भूभाग उघडा बोडका होतो. त्यामुळे जमिनीत अतिरिक्त पाणी मुरते. प्रमाणापेक्षा जास्त पाणी जमिनीत मुरण्याने जमीन आतून सैल होते. सैल झालेला हा भाग पाण्याच्या दबावामुळे कोसळतो त्यालाच भूस्खलन असे म्हणतात.

पाऊस येणार आणि मग भूस्खलन होणार असं गृहीत धरण्यापेक्षा शासकीय यंत्रणांनी याची तयारी जानेवारी महिन्यापासूनच करणे आवश्यक आहे. जानेवारी ते मे या कालावधीत वणवे लागत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविले तर भविष्यातील भूस्खलनाचा होणारा त्रास टाळता येऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.

चौकट :

वणव्याचा नैसर्गिक आपत्तीत समावेश व्हावा

वनक्षेत्रांसह डोंगराळ भागात लावले जाणारे वणवे निव्वळ पशूपक्ष्यांचे आश्रयस्थान उद्ध्वस्त करतात असं नाही. त्याच्या झळांनी आता माणसालाही होरपाळून टाकलं आहे. भूस्खलनाच्या मुळाशी वणव्याची धग असल्याने वणव्याचा नैसर्गिक आपत्तीत समावेश होणे गरजेचे बनले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय आपत्ती व्यवस्थापन विभागाने वन विभागाच्या बरोबरीने वणवा रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी पुढे येणे महत्त्वाचे आहे.

हे आहेत काही उपाय...!

वणवामुक्त गावांच्या संकल्पनेला प्रोत्साहन द्यावे

ग्रामस्वच्छता अभियानात वणवामुक्तीचा समावेश

वणवा प्रवण क्षेत्रातील गावांमध्ये जलसंवर्धनाशी निगडित योजनांची अंमलबजावणी नको

वणवा लागणाऱ्या गावांवर महसुली दंडात्मक कारवाई

सलग तीन वर्षे वणवा लागलेल्या गावांना शासकीय योजनांचा लाभ नको

युवकांचा सहभाग घेऊन वणवा लागणार नाही यासाठी डोंगर दत्तक योजना राबविणे

कोट :

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने ज्या पद्धतीने विविध अभियाने राबवून गावकऱ्यांचा त्यात सहभाग घेतला, त्याच पद्धतीने वणवामुक्तीसाठी कालबद्ध, कृतिबद्ध कार्यक्रम हाती घेणं महत्त्वाचं आहे. नाही तर भविष्यात मानवाला निसर्ग कोपाच्या विविध रूपांना सामोरे जावे लागेल.

- सुनील भोईटे, मानद वन्यजीवरक्षक, सातारा

पॉर्इंटर

कुठला विभाग काय करेल

पाटंबधारे : वणव्यामुळे जलसाठ्यांची पाणी साठवण क्षमता आणि जल प्रकल्पाची उपयुक्तता कमी होते. त्यामध्ये या विभागाने काम केले तर धरणे पूर्ण क्षमतेने वापरात येतील

कृषी :

निसर्गातील बहुतांश किडे, किटके यांना वनक्षेत्रात वणवे लागल्याने खायला शिल्लक राहत नाही, परिणामी ते पिकांवर येतात. या विभाागने शेतकऱ्यांना प्रबोधन करणे अपेक्षित आहे.

महसुली :

विविध विभागांच्या समन्वयाने वणवा प्रतिबंध आणि निर्मूलनासाठी आराखडा तयार करून वणवा प्रवण क्षेत्रांमध्ये त्याचा अवलंब करावा. गाववार वणवा दक्षता समितीची गरज

वनविभाग :

वणवाप्रवण क्षेत्रांमध्ये प्रतीवर्षी प्राधान्याने जाळरेषा काढणे, ग्रामस्थांमध्ये जनजागृती करून दोषींवर कडक कारवाई करणे

....................