शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीसेविका करणार आंदोलन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:41 IST

वाई : ‘अंगणवाडीसेविकांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेले आहेत. १५ फेब्रुवारी अंगणवाडीसेविका संघ, भारतीय मजदूर संघटना संयुक्तरीत्या संपूर्ण देशात ...

वाई : ‘अंगणवाडीसेविकांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेले आहेत. १५ फेब्रुवारी अंगणवाडीसेविका संघ, भारतीय मजदूर संघटना संयुक्तरीत्या संपूर्ण देशात जिल्हाधिकारी कार्यालय व पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने करणार आहेत’, अशी माहिती भारतीय मजदूर संघाचे संघटनमंत्री रवींद्र पुरोहित यांनी अंगणवाडीसेविका संघाच्या संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

कोरोनासारख्या महामारीच्या काळात अंगणवाडीसेविकांनी कसलीही तमा न बाळगता समाजातील प्रत्येक घटकापर्यंत जाऊन प्रसार व प्रचार केला. परंतु, अंगणवाडीसेविकांकडे कोणीही लक्ष दिले नाही, यात कसल्याही प्रकारचा भत्ता प्रशासनाने या सेविकांना दिला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडीसेविकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. कोणतेही शासन आले तरीही अंगणवाडीसेविकांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नाही. आश्वासनाशिवाय त्यांच्या पदरी काहीही पडले नाही. त्यातच अंगणवाडीसेविका संघटनेमध्ये अनेक संघटना काम करीत असल्याने राज्यकर्ते त्याच बाबींचा फायदा घेत आहे. यामध्ये अंगणवाडीसेविकांना सरकारी कर्मचारी म्हणून मान्यता मिळावी. योग्य पद्धतीने मानधन मिळावे, अंगणवाडी सेविकांना सहायक शिक्षिका म्हणून मान्यता मिळावी, भविष्यनिर्वाह निधी, पेन्शन मिळावे. इतर शिक्षकांप्रमाणे अंगणवाडीसेविकांना वैयक्तिक व वैद्यकीय रजा मिळाव्यात, यांचा समावेश आहे. यावेळी भारतीय मजदूर संघाचे जिल्हा सरचिटणीस सुरेंद्र बोरकर, अंगणवाडीसेविका संघाच्या जिल्हा सरचिटणीस वनिता सावंत, नंदा सणस, कोमल जगताप, रोहिणी ढगे, शोभा शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्राथमिक शाळेतील मुलांचे पायाभरणी करणाऱ्या वर्गाकडे दुर्लक्ष, प्राथमिक शाळेतील अंगणवाडीतील मुलांकडे अतिशय काटेकोरपणे पाहिल्याशिवाय मुलांचा बेस योग्य रीतीने तयार होत नाही. अंगणवाडीत शिकणारा विद्यार्थी योग्य पद्धतीने शाळेत यायला लागल्यास पुढे जाऊन शिक्षणाचा प्रवाह त्याचा योग्य होऊन तो चांगल्या पद्धतीने शाळेत जाऊन शिक्षण घेतो. तो पायाच कमकुवत राहिल्यास विद्यार्थी घडताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते; परंतु शिक्षणाचा पाया घडविणाऱ्या अंगणवाडीसेविकांकडे प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करते. त्यामुळे या सेविकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तरी, हे चित्र बदलण्याची नितांत गरज आहे.