शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

...अन् खुर्ची सोडून नगराध्यक्षा मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात! : इतिहासातील पहिलीच घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 23:04 IST

मासिक सभेच्या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी विनंती करूनही मुख्याधिकारी शंकर गोरे हे कक्षात न आल्याने दस्तुरखुद्द नगराध्यक्षा माधवी कदम यांनाच आपली खुर्ची सोडून मुख्याधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये

ठळक मुद्देदोनवेळा निरोप पाठवूनही दुर्लक्ष

सातारा : मासिक सभेच्या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी विनंती करूनही मुख्याधिकारी शंकर गोरे हे कक्षात न आल्याने दस्तुरखुद्द नगराध्यक्षा माधवी कदम यांनाच आपली खुर्ची सोडून मुख्याधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये जावे लागले. सातारा पालिकेच्या इतिहासात अशा प्रकारची ही पहिलीच घटना घडली असावी.

सातारा पालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याला सर्वसाधारण सभेचे आयोजन केले जाते. या सभेपूर्वी विचार-विनिमय करूनच सर्व ठराव अजेंड्यावर घेतले जातात. बुधवारी दुपारी नगराध्यक्षा माधवी कदम यांना फोन करून खासदार उदयनराजे भोसले यांनी काही विषयांची माहिती विचारली.

ही माहिती जाणून घेण्यासाठी तसेच अजेंड्यावरील काही विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांना केबीनमध्ये येण्याचा निरोप दिला. दरम्यान, याचवेळी मुख्याधिकारी त्यांच्या केबीनमध्ये सातारा विकास आघाडीतील काही नगरसेवकांशी चर्चा करीत होते.

दोनवेळा निरोप पाठवून अन् सुमारे पाऊणतास वाट पाहूनही मुख्याधिकारी न आल्याने अखेर नगराध्यक्षा माधवी कदम यांनाच आपल्या खुर्चीवरून उठावे लागले. यानंतर त्यांनी स्वत: मुख्याधिकाºयांच्या केबीनमध्ये जाऊन अत्यावश्यक माहिती जाणून घेतली. दरम्यान, सातारा पालिकेच्या इतिहासात नगराध्यक्षांवर प्रथमच खुर्ची सोडून मुख्याधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये जाण्याची वेळ ओढावल्याने प्रशासनाची कार्यपद्धती उघडकीस आली आहे, अशी प्रतिक्रिया विरोधकांनी व्यक्त केली आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांना तातडीने काही माहिती हवी होती. यासाठीच मुख्याधिकाºयांना केबीनमध्ये येण्याचा निरोप दिला. मात्र, पाऊणतास होऊनही ते न आल्याने त्यांच्या केबीनमध्ये जावे लागले. आत्तापर्यंत अशाप्रकारच्या तीन वेळा घटना घडल्या आहेत.- माधवी कदम, नगराध्यक्षानगराध्यक्षांचा निरोप मिळाल्यानंतर मुख्याधिकाºयांनी हातातील काम सोडून त्यांच्या दालनात जाणे गरजेचे आहे. मात्र, नगराध्यक्षांनाच त्यांच्या दालनात जावे लागते, हे चुकीचे आहे. यावरून नगराध्यक्षांचा प्रशासनावर किती वचक आहे? हे स्पष्ट होते.- अशोक मोने, विरोधी पक्ष नेते, नविआ.मुख्याधिकाऱ्यांचा निरोप मिळाला त्याचवेळी सत्ताधारी आघाडीच्या काही नगरसेवकांची केबीनमध्ये मीटिंग सुरू होती. निरोपानंतर केवळ दहा मिनिटांतच नगराध्यक्षा केबीनमध्ये आल्या. त्यांच्या केबीनमध्ये न जाण्यामागे कोणताही हेतू नव्हता. याचा वेगळा अर्थ काढणे चुकीचे आहे.- शंकर गोरे, मुख्याधिकारी