शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

साताऱ्यात पाचशे एकर क्षेत्रात कृषी उद्योग उभारणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

By प्रमोद सुकरे | Updated: November 25, 2022 16:30 IST

‘रावणाला दहा तोंडं होती. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला शंभर तोंडे आहेत. म्हणूनच कमी खर्चात आणि कमी श्रमात जास्त उत्पन्न कसं मिळेल, याकडे कृषी विभागाने लक्ष दिले पाहिजे.

कऱ्हाड : ‘रावणाला दहा तोंडं होती. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नाला शंभर तोंडे आहेत. म्हणूनच कमी खर्चात आणि कमी श्रमात जास्त उत्पन्न कसं मिळेल, याकडे कृषी विभागाने लक्ष दिले पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी सातारा जिल्ह्यात पाचशे एकर क्षेत्रात कृषी इंडस्ट्रीज साकारणार आहोत. तर कऱ्हाडचे विमानतळ एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव सादर करा. म्हणजे विमानतळाचा विकास गतीने होऊन त्याचा सर्वांना फायदा होईल,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.कऱ्हाड येथे शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने आयोजित यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी शुक्रवारी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिसप्रमुख समीर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.एकनाथ शिंदे म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून प्रतिवर्षी जे कृषी प्रदर्शन कऱ्हाडला आयोजित केले जाते, ही अभिमानाची बाब आहे. यशवंतराव चव्हाण यांचे कार्य महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. खुर्च्या, सत्ता, पदे येतात आणि जातात. मात्र, नेत्याला लोकांशी जिव्हाळ्याचे नाते जपता आले पाहिजे, हा गुण यशवंतरावांकडून शिकण्यासारखा आहे.

गेल्या तीन-चार महिन्यांत आमच्या सरकारने सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मी सातारा जिल्ह्याचा सुपुत्र आहे, याचा मला अभिमान आहे. त्यामुळे या जिल्ह्याप्रती माझी जबाबदारी वाढत आहे, याचे मला भान आहे. त्यामुळे निधी कमी पडू देणार नाही.’मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्रात सर्वात मोठं होणारं कऱ्हाडचं हे कृषी प्रदर्शन आहे. माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांनी या प्रदर्शनाची मुहूर्तमेढ रोवली. ती शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरत आहे. जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे बहुउद्देशीय कृषी संशोधन केंद्र जिल्ह्यात सुरू करण्याचा आमचा मानस आहे. तर जिल्ह्यात डोंगराळ भागही खूप मोठा आहे. त्या भागासाठी जलयुक्त शिवारासारखी योजना जिल्ह्यासाठी आम्ही राबविणार आहोत. त्यासाठी जिल्ह्याला मुख्यमंत्र्यांनी विशेष निधी द्यावा.’यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, कृषी प्रदर्शनचे इव्हेंट प्रमुख संदीप गिड्डे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होतेकऱ्हाडचे विमानतळ एमआयडीसीकडे द्याकऱ्हाडचे विमानतळ एमआयडीसीकडे द्या. त्याचा विकास आम्ही तातडीने करू व सातारा जिल्ह्यात ॲग्रो इंडस्ट्रीज सुरू करावी, अशी मागणी उद्योगमंत्री म्हणून यावेळी उदय सामंत यांनी केली. त्या मागणीला दुजोरा देत मुख्यमंत्री शिंदे यांनी या दोन्ही गोष्टीला आपल्या भाषणात संमती दिली.बाळासाहेब म्हणे.. ते आम्हीच केले!नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पन्नास हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान एकनाथ शिंदे यांच्या सरकारने सुमारे ७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यावेळी व्यासपीठावर असणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी, ते तर आम्ही जाहीर केले होते, अशी टिप्पणी केली. त्यावर मंत्री सामंत यांनी ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे भाग्य मात्र एकनाथ शिंदे यांना लाभले, असा हजरजबाबीपणा दाखविला. त्यावर उपस्थितांमध्ये खसखस पिकली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरEknath Shindeएकनाथ शिंदेagricultureशेती