शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

पुढचे आमदार अमित कदमच!

By admin | Updated: January 22, 2017 23:46 IST

उदयनराजेंची व्यूहरचना जाहीर : ...अन्यथा मिशी काढू; शिवेंद्रसिंहराजेंवर जोरदार टीका

मेढा : जावळीच्या जनतेला सर्वसामान्य आमदार म्हणून अमित कदम हेच योग्य उमेदवार असणार आहेत. ‘अमित, तू फक्त हो म्हण. नाही आमदार केलं तर आपण मूँछ काढून देईन,’ असा इरादाच खासदार उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केला. ‘इथल्या आमदारांना जावळीत आल्यावर वाघ झाल्यासारखे वाटते; पण मी इथं आलो की ते मांजर कसे होतात,’ अशी घणाघाती टीकाही त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे नाव न घेता केली. येथील नक्षत्र मंगल कार्यालयात माजी आमदार जी. जी. कदम (अण्णा) यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमत्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष रवी साळुंखे, सुनील काटकर, बाबासाहेब कदम, जावळीचे सभापती मोहन शिंदे, दत्ता पवार, पांडुरंग जवळ आदी उपस्थित होते. खासदार उदयनराजे म्हणाले, ‘कुठं जी. जी. अण्णा व कुठं आताचे जावळीचे आमदार. यांना जनतेची जपणूक करता येत नसून ते चोपणूक करत आहेत. इथल्या आमदारांना जावळीत आल्यावर वाघ झाल्यासारखे वाटते; पण मी इथं आलो की ते मांजर कसे होतात. सातबाऱ्याचा विषय काय घेऊन बसलाय मी निवडणूक झाली की जावळीतील शेतकऱ्यांच्या घरी जाऊन सातबारा कोरा करणार आहे. त्यामुळे माझ्यावर कुणी टीका करण्याची गरज नाही. ही जनताच माझे सर्वस्व असून, सर्वसामान्य जनतेत राहण्यातच मी माझे श्रेष्ठत्व मानतो. पद येतात अन् जातात; परंतु गोरगरीब कुटुंबाला केंद्रबिंदू मानून त्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मी सोडवणार आहे. बोंडारवाडी धरण झालेच पाहिजे, यासाठी मी स्वत: पुढाकार घेऊन जनतेचा प्रश्न मार्गी लावणार आहे. बाधित शेतकऱ्यांना शासनाने जमिनी नाही दिल्या तर मी स्वत: त्या शेतकऱ्यांना माझी जमीन देईन. त्यामुळे लोकांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता आपल्या विचाराने पुढील वाटचाल करावी.’ आ. शशिकांत शिंदे म्हणाले, ‘जनमाणसाचे नेतृत्व दिवंगत जी. जी. आण्णांनी केले असून, आजही त्यांचे विचार सर्वसामान्य जनतेच्या स्मरणात आहेत. म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात जनता वीस वर्षांनंतरही आण्णांना आदरांजली वाहण्यासाठी येत आहे.’सदाशिव सपकाळ म्हणाले, ‘राजकारणाच्या पलीकडे जाऊन आण्णांनी माझ्यावर प्रेम केले. मी त्यांना पराभूत केले. तरीही खिलाडूवृत्तीने त्यांनी ते स्वीकारून उलट मलाच विधानसभेत कशा पद्धतीने प्रश्न मांडावेत, यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या पश्चात अमितचे जनमाणसात विकास-कामांच्या माध्यमातून अतिशय उत्तम काम असून, अमितसाठी पुढील काळात आपण सर्वतोपरी सहकार्य करणार आहे.’ जगन्नाथ वाडकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)