शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

गळतीच्या पाण्याचा शिवतीर्थाला वळसा

By admin | Updated: November 28, 2015 00:11 IST

पालिकेचे दुर्लक्ष : परिसरात दुर्गंधी; पादचाऱ्यांसह वाहनधारकांची डोकेदुखी वाढली

सातारा : सातारकरांचे मानाचे पान असणाऱ्या पोवई नाक्यावरील शिवतीर्थाच्या परिसराला गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीयुक्त गळतीच्या पाण्याचा वळसा पडताना पाहायला मिळतो आहे. पालिकेने आयडीबीआय बँकेसमोर बांधलेल्या बहुचर्चित दुभाजकाला ओलांडून हे पाणी शिवतीर्थाकडे जाऊन दुर्गंधी पसरली असली तरी पालिका अद्यापही गांधारीच्या भूमिकेत आहे. रयत शिक्षण संस्थेपासून पोवई नाक्याकडे जात असताना शाहूनगरला जाणाऱ्या फाट्याजवळच रस्त्याच्या मध्यभागी उपळा लागल्याप्रमाणे पाणी वर येत आहे. तिथून उताराने ते मरिआई कॉम्प्लेक्सच्या समोरून शिवतीर्थाकडे वाहत जाते. रस्त्याकडेची पार्किंगची जागा, रिक्षा स्टॉप या परिसरातील सखल भागात हे पाणी साठून राहत आहे. शिवतीर्थाला वळसा घालून हे पाणी सिव्हिल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याकडे जात आहे. या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरली असून, व्यावसायिकांना नाकाला रुमाल लावूनच व्यवसायाच्या ठिकाणी बसावे लागत आहे. तसेच रस्त्यावरून जाणारे पादचारीही त्रस्त झाले आहेत. शिवतीर्थ हे सातारकरांसाठी पूजनीय आहे. पण याच पूजनीय ठिकाणी दुर्गंधीयुक्त पाणी जात असताना पालिकेने डोळे मिटून घेतले आहेत. येथीलच एका हॉटेलातील ड्रेनेजच्या पाईपलाईनला गळती लागल्याचे नागरिकांची तक्रार आहे; परंतु पालिकेने या तक्रारीकडे दुर्लक्ष केले आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा प्रकार सुरु असतानाही पालिका हातावर हात धरुन बसली आहे. एसटीने साताऱ्यातील पोवईनाक्यावरुन जाणाऱ्या परजिल्ह्यातील नागरिकांकडूनही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वाहतूक शाखेचे पोलीसही याच घाण पाण्यात उभे राहून आपली सेवा बजावत आहेत. (प्रतिनिधी)घोटाभर पाण्यातून लोकांची वारी!पावसाळ्यात ज्याप्रमाणे पोवई नाक्यावरून पाण्याचे लोट वाहत असतात, त्याचप्रमाणे सध्या हे पाणी वाहून जात आहे. त्यामुळे घोटाभर पाण्यातून नागरिकांना जावे लागते. परंतु हे पाणी बाधक ठरून लोकांना त्वचाविकाराला सामोरे लाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून हे पाणी वाहत आहे. लोकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत असले तरी पालिकेने कारवाई केलेली नाही. शिवतीर्थावर हे दुर्गंधीयुक्त पाणी जात असल्याने लोक संतप्त झाले आहेत.- संतोष जांभळे