शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

वन कर्मचाऱ्याचे पुष्पप्रेम उलगडले कास पठारावर!

By admin | Updated: October 5, 2015 00:18 IST

आठ वर्षे अभ्यास : श्रीरंग शिंदे यांच्या पुस्तकाचे वनसचिवांच्या हस्ते प्रकाशन; जैवविविधतेची माहिती

पेट्री : कास पठारावरील पुष्पवैभवावर सचित्र पुस्तक प्रसिद्ध करण्याचा मोह अनेक निसर्गप्रेमींना होतो; परंतु वन कर्मचाऱ्यानेच असे पुस्तक लिहिण्याची घटना पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच घडली आहे. बामणोलीचे वनपाल श्रीरंग शिंदे यांनी पठाराविषयी दोन पुस्तके लिहिली असून, वनसचिव विकास खारगे यांच्या हस्ते कास पठारावरच रविवारी त्यांचे प्रकाशन करण्यात आले. अनेक वनस्पतितज्ज्ञांनी कास पठारावरील समृद्ध जैवविविधतेचा अभ्यास करून पुस्तके लिहिली आहेत. परंतु कास पठाराचे व्यवस्थापन करणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्याने पुस्तक लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. श्रीरंग शिंदे हे बामणोली विभागाचे वनपाल म्हणून कार्यरत असून, पठारावरील वनस्पतींची, त्यांच्या गुणधर्मांची, फुलण्याच्या दिवसांची त्यांना माहिती आहे. कास पठारावर पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी आतापर्यंत त्यांनी दहा गाइड तयार केले आहेत. त्यांनी लिहिलेल्या मोठ्या पुस्तकात शंभर वनस्पतींची माहिती असून, पन्नास वनस्पतींची माहिती असणारी छोटी आवृत्तीही रविवारी शेकडो पर्यटकांच्या साक्षीने पठारावरच प्रकाशित करण्यात आली.राज्याचे वनसचिव विकास खारगे यांच्या हस्ते झालेल्या या अनौपचारिक प्रकाशन समारंभास कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. के. राव, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, सहायक वनसंरक्षक महादेव मोहिते यांच्यासह दीपक खाडे, तानाजी गायकवाड आणि वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. वनसचिव खारगे यांनी कर्मचारी आणि पर्यटकांशी संवाद साधला. आठ वर्षांपासून सुरू असलेल्या अभ्यासाचे फलित म्हणजे हे पुस्तक असून, कास पठारावरील जैवविविधतेची संपूर्ण माहिती या पुस्तकात लिहिली आहे. पर्यटकांना वस्तुनिष्ठ माहिती मिळेल, असे शिंदे यांनी सांगितले.कास पठारावर कचरा दिसत नसल्याने वनसचिवांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. कासाणी-आटाळी गावांदरम्यान वाहनांच्या पार्किंगची उत्तम सोय झाली तर पठारावर वाहतुकीची कोंडी होणार नाही, असे खारगे यांनी सांगितले. शिंदे यांचे पुस्तक माहितीसाठी सर्व वनपाल, वनरक्षकांना पोहोच करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या अनौपचारिक कार्यक्रमास पर्यटकांची उपस्थिती होती. (वार्ताहर)तीन दिवसांत १३ हजार पर्यटकशुक्रवार ते रविवार जोडून सुट्या आल्याने पठारावर पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली होती. या तीन दिवसांत सुमारे १३ हजार पर्यटकांनी पठाराला भेट दिल्याचे वन कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावर्षी एकंदर एक लाखांहून अधिक पर्यटक पठारावर आले असून, शुल्कवसुली २० लाखांपेक्षा अधिक झाली आहे. २०११ पासूनची ही सर्वाधिक शुल्कवसुली आहे.