शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही; मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
2
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
3
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
4
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
5
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
6
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
7
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
8
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
9
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
10
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
11
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
12
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
13
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
14
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
15
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
16
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
17
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
18
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
19
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
20
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 

वन कर्मचाऱ्याचे पुष्पप्रेम उलगडले कास पठारावर!

By admin | Updated: October 5, 2015 00:18 IST

आठ वर्षे अभ्यास : श्रीरंग शिंदे यांच्या पुस्तकाचे वनसचिवांच्या हस्ते प्रकाशन; जैवविविधतेची माहिती

पेट्री : कास पठारावरील पुष्पवैभवावर सचित्र पुस्तक प्रसिद्ध करण्याचा मोह अनेक निसर्गप्रेमींना होतो; परंतु वन कर्मचाऱ्यानेच असे पुस्तक लिहिण्याची घटना पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच घडली आहे. बामणोलीचे वनपाल श्रीरंग शिंदे यांनी पठाराविषयी दोन पुस्तके लिहिली असून, वनसचिव विकास खारगे यांच्या हस्ते कास पठारावरच रविवारी त्यांचे प्रकाशन करण्यात आले. अनेक वनस्पतितज्ज्ञांनी कास पठारावरील समृद्ध जैवविविधतेचा अभ्यास करून पुस्तके लिहिली आहेत. परंतु कास पठाराचे व्यवस्थापन करणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्याने पुस्तक लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. श्रीरंग शिंदे हे बामणोली विभागाचे वनपाल म्हणून कार्यरत असून, पठारावरील वनस्पतींची, त्यांच्या गुणधर्मांची, फुलण्याच्या दिवसांची त्यांना माहिती आहे. कास पठारावर पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी आतापर्यंत त्यांनी दहा गाइड तयार केले आहेत. त्यांनी लिहिलेल्या मोठ्या पुस्तकात शंभर वनस्पतींची माहिती असून, पन्नास वनस्पतींची माहिती असणारी छोटी आवृत्तीही रविवारी शेकडो पर्यटकांच्या साक्षीने पठारावरच प्रकाशित करण्यात आली.राज्याचे वनसचिव विकास खारगे यांच्या हस्ते झालेल्या या अनौपचारिक प्रकाशन समारंभास कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. के. राव, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, सहायक वनसंरक्षक महादेव मोहिते यांच्यासह दीपक खाडे, तानाजी गायकवाड आणि वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. वनसचिव खारगे यांनी कर्मचारी आणि पर्यटकांशी संवाद साधला. आठ वर्षांपासून सुरू असलेल्या अभ्यासाचे फलित म्हणजे हे पुस्तक असून, कास पठारावरील जैवविविधतेची संपूर्ण माहिती या पुस्तकात लिहिली आहे. पर्यटकांना वस्तुनिष्ठ माहिती मिळेल, असे शिंदे यांनी सांगितले.कास पठारावर कचरा दिसत नसल्याने वनसचिवांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. कासाणी-आटाळी गावांदरम्यान वाहनांच्या पार्किंगची उत्तम सोय झाली तर पठारावर वाहतुकीची कोंडी होणार नाही, असे खारगे यांनी सांगितले. शिंदे यांचे पुस्तक माहितीसाठी सर्व वनपाल, वनरक्षकांना पोहोच करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या अनौपचारिक कार्यक्रमास पर्यटकांची उपस्थिती होती. (वार्ताहर)तीन दिवसांत १३ हजार पर्यटकशुक्रवार ते रविवार जोडून सुट्या आल्याने पठारावर पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली होती. या तीन दिवसांत सुमारे १३ हजार पर्यटकांनी पठाराला भेट दिल्याचे वन कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावर्षी एकंदर एक लाखांहून अधिक पर्यटक पठारावर आले असून, शुल्कवसुली २० लाखांपेक्षा अधिक झाली आहे. २०११ पासूनची ही सर्वाधिक शुल्कवसुली आहे.