शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
4
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
5
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
6
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
7
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
8
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
9
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
10
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
11
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
12
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
13
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
14
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
15
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
16
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
17
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
18
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
19
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
20
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
Daily Top 2Weekly Top 5

वन कर्मचाऱ्याचे पुष्पप्रेम उलगडले कास पठारावर!

By admin | Updated: October 5, 2015 00:18 IST

आठ वर्षे अभ्यास : श्रीरंग शिंदे यांच्या पुस्तकाचे वनसचिवांच्या हस्ते प्रकाशन; जैवविविधतेची माहिती

पेट्री : कास पठारावरील पुष्पवैभवावर सचित्र पुस्तक प्रसिद्ध करण्याचा मोह अनेक निसर्गप्रेमींना होतो; परंतु वन कर्मचाऱ्यानेच असे पुस्तक लिहिण्याची घटना पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच घडली आहे. बामणोलीचे वनपाल श्रीरंग शिंदे यांनी पठाराविषयी दोन पुस्तके लिहिली असून, वनसचिव विकास खारगे यांच्या हस्ते कास पठारावरच रविवारी त्यांचे प्रकाशन करण्यात आले. अनेक वनस्पतितज्ज्ञांनी कास पठारावरील समृद्ध जैवविविधतेचा अभ्यास करून पुस्तके लिहिली आहेत. परंतु कास पठाराचे व्यवस्थापन करणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्याने पुस्तक लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे. श्रीरंग शिंदे हे बामणोली विभागाचे वनपाल म्हणून कार्यरत असून, पठारावरील वनस्पतींची, त्यांच्या गुणधर्मांची, फुलण्याच्या दिवसांची त्यांना माहिती आहे. कास पठारावर पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी आतापर्यंत त्यांनी दहा गाइड तयार केले आहेत. त्यांनी लिहिलेल्या मोठ्या पुस्तकात शंभर वनस्पतींची माहिती असून, पन्नास वनस्पतींची माहिती असणारी छोटी आवृत्तीही रविवारी शेकडो पर्यटकांच्या साक्षीने पठारावरच प्रकाशित करण्यात आली.राज्याचे वनसचिव विकास खारगे यांच्या हस्ते झालेल्या या अनौपचारिक प्रकाशन समारंभास कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन. के. राव, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, सहायक वनसंरक्षक महादेव मोहिते यांच्यासह दीपक खाडे, तानाजी गायकवाड आणि वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. वनसचिव खारगे यांनी कर्मचारी आणि पर्यटकांशी संवाद साधला. आठ वर्षांपासून सुरू असलेल्या अभ्यासाचे फलित म्हणजे हे पुस्तक असून, कास पठारावरील जैवविविधतेची संपूर्ण माहिती या पुस्तकात लिहिली आहे. पर्यटकांना वस्तुनिष्ठ माहिती मिळेल, असे शिंदे यांनी सांगितले.कास पठारावर कचरा दिसत नसल्याने वनसचिवांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. कासाणी-आटाळी गावांदरम्यान वाहनांच्या पार्किंगची उत्तम सोय झाली तर पठारावर वाहतुकीची कोंडी होणार नाही, असे खारगे यांनी सांगितले. शिंदे यांचे पुस्तक माहितीसाठी सर्व वनपाल, वनरक्षकांना पोहोच करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या अनौपचारिक कार्यक्रमास पर्यटकांची उपस्थिती होती. (वार्ताहर)तीन दिवसांत १३ हजार पर्यटकशुक्रवार ते रविवार जोडून सुट्या आल्याने पठारावर पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली होती. या तीन दिवसांत सुमारे १३ हजार पर्यटकांनी पठाराला भेट दिल्याचे वन कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावर्षी एकंदर एक लाखांहून अधिक पर्यटक पठारावर आले असून, शुल्कवसुली २० लाखांपेक्षा अधिक झाली आहे. २०११ पासूनची ही सर्वाधिक शुल्कवसुली आहे.