शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

आधीच फटाक्यांचा वास; त्यात थंडीचा त्रास!

By admin | Updated: October 27, 2014 23:45 IST

ऐन दिवाळीत हवा बदलाचा परिणाम : वातावरणात संसर्गामुळे चिमुकल्यांच्या आरोग्य तक्रारीत वाढ

सातारा : हिवाळ्याच्या दिवसात पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे या दिवसांत संसर्गाचे धोके वाढतात. यावेळी ऐन हिवाळ्यात पाऊस पडल्यामुळे त्याचा विपरित परिणाम ज्येष्ठ आणि चिमुकल्यांच्या आरोग्यावर होऊ शकतो. म्हणूनच या बदललेल्या वातावरणात पाणी उकळून आणि भरपूर पिण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत.थंडीची चाहूल घेऊनच दिवाळीचे आगमन होते. त्यामुळे वातावरणात पुरेसा गारवा असतो. यावेळी पहिल्यांदाच ऐन दिवाळी सणात पाऊस पडल्यामुळे घरातील अनेकांच्या प्रकृती बिघडल्या आहेत. त्यात हिवाळ्यात फारशी तहान लागत नाही. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने रोग प्रतिकार करण्याची शक्ती क्षीण होते.हिवाळ्यात पाऊस पडल्यामुळे वातावरणात सर्दी, खोकला, कफ, ताप निर्माण करणाऱ्या जंतूंचा फैलाव होतो. काही मुलांच्या अंगावर, तळहात आणि तळ पायावर लाल रंगांचे पुरळ उठत आहेत. हे पुरळही वातावरणातील संसर्गाचा परिणाम आहे. कितीही खबरदारी घेतली तरीही औषधांचा योग्य डोस देणे गरजेचे आहे. साधारण चार ते पाच दिवस लहान मुलांमध्ये हा संसर्ग राहात असल्याचे दिसते. त्यामुळे या दिवसांत कोणताही आजार चिमुकल्यांच्या अंगावर काढण्यापेक्षा किंवा त्यांना घरगुती उपाय करण्यापेक्षा तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. फटाक्यांमुळे पाच ते दहा वर्षांतील मुले जखमी होतात. वातावरणातील बदलाचा परिणाम सर्दी स्वरूपात सहा महिन्यांच्या बाळापासून सहा वर्षांच्या मुलांपर्यंत होऊ शकतो. शरीरावर पुरळ उठण्याचे प्रकार एक ते सात वर्षे वयोगटातील मुलांमध्ये अधिक आहे. तर श्वसनाच्या आजारांचा त्रास एक ते चार वर्षांच्या मुलांना होतो, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. (प्रतिनिधी)फटाक्यांच्या वासामुळे श्वसनाचे आजारदिवाळीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. आवाजाबरोबरच शोभेचे फटाके उडविण्याकडे नागरिकांचा कल असतो. फटाके फुटल्यानंतर त्यातून येणारा धूरही आता अनेकांना त्रासदायक ठरू लागला आहे. विशेषत: लहान मुलांना याचा त्रास अधिक होत आहे. फटाके पेटवताना आणि फुटल्यानंतर त्यांची होणारी गडबड आणि दंगा यामुळे हा धूर त्यांच्या तोंडात जातो. यामुळे मुलांसह ज्येष्ठांनाही श्वसनाचे आजार होऊ लागले आहेत. घशात खरखरणे हे त्याचे मुख्य लक्षण आहे. फटाक्यांच्या या धुरापासून जास्तीत जास्त अंतरावर थांबणे हाच उपाय आहे.तान्हुल्यांना फक्त स्पंजिंग!दिवाळीनिमित्त अभ्यंगस्नान केले जाते. हे स्नान तान्हुल्यांनीही करावे, अशी आग्रही मागणी ज्येष्ठांची असते. वास्तविक या दिवसात गारठा लक्षात घेता तान्हुल्यांना दोन-तीन दिवसांतून एकदा अंघोळ व इतर वेळी केवळ गरम पाण्याने अंग पुसले तर सर्दीचा त्रास जाणवणार नाही. तसेच या दिवसांत डोके कोरडे राहील याचीही खबरदारी आवश्यक असते.बाहेरचे अन्नपदार्थ टाळाचदिवाळीच्या दिवसांत घरात पाहुण्यांची गर्दी मोठी असते. त्यामुळे अनेक घरांमध्ये बाहेरून अन्नपदार्थ नेऊन ते खाणे याकडे कल दिसतो; पण हे आरोग्यासाठी धोक्याचे आहे. वातावरणातील बदल झाल्यामुळे शरीरातील प्रतिकार शक्ती क्षीण झालेली असते. त्यातच बाहेरचे अन्नपदार्थ पुरेशी स्वच्छता न ठेवता केलेले असतील, तर त्यामुळे जंतू संसर्गाचा धोका अधिक संभवतो. यामुळे पोटात दुखणे, उलटी होणे यासारखे प्रकारही घडू शकतात.वातावरणातील बदलांमुळे सध्या मुलांना संसर्गजन्य आजार होत आहेत. स्वच्छेतीची काळजी घेण्याबरोबरच योग्य ते औषधोपचार घेतले, तर मुलांची प्रकृती लवकर बरी होऊ शकते.- डॉ. अच्युत गोडबोले