शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सर्व तिकिटेच माझ्याकडे; काळजी नाही करत..! : उदयनराजेंची गुगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 00:49 IST

‘बसचं तिकीट आहे, पिक्चरचंपण आहे, राहिलं तर शेवटी पोस्टाचंही तिकीट आहेच की. त्यामुळे मी कोणत्याही तिकिटाची काळजी करत नाही,’ अशी गुगली टाकून खासदार उदयनराजे भोसले यांनी राजकीय

ठळक मुद्देराजकीय वर्तुळाचे लक्ष घेतले वेधून

सातारा : ‘बसचं तिकीट आहे, पिक्चरचंपण आहे, राहिलं तर शेवटी पोस्टाचंही तिकीट आहेच की. त्यामुळे मी कोणत्याही तिकिटाची काळजी करत नाही,’ अशी गुगली टाकून खासदार उदयनराजे भोसले यांनी राजकीय वर्तुळाचे लक्ष पुन्हा एकदा वेधून घेतले असल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे.

जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४२ जवान शहीद झाले होते. या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहताना खासदार उदयनराजे यांनी वृत्त वाहिनींशी बोलताना हे वक्तव्य केले.मुंबईत गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. यामध्ये पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी या बैठकीला होते.

या बैठकीत राज्यातील विविध लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी सातारा मतदारसंघाचाही विषय चर्चेत आला. या चर्चेदरम्यान, सातारा जिल्ह्यातील पक्ष आमदारांचा विरोध उदयनराजेंच्या उमेदवारीला असल्याचा मुद्दा समोर आला. त्यानंतर प्रमुख नेत्यांनी साताऱ्यातील पक्ष आमदारांना विचारात घेऊनच उदयनराजेंना उमेदवारी देण्यात यावी, असे ठरविले. मुंबई बैठकीतील ही वार्ता जिल्ह्यात सर्वत्र पसरली.त्यामुळे उदयनराजेंना तिसºयांदा पक्ष साताºयातून उमेदवारी देणार का ? अशीही चर्चा झडू लागली. त्यानंतर उदयनराजे यांनी ‘बसचं, पिक्चरचं, पोस्टांच तिकीट माझ्याकडं आहे. त्यामुळे मी तिकिटाची काळजी करत नाही,’ अशी एकप्रकारे गुगली टाकून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे.

या पार्श्वभूमीवर साताºयातून राष्ट्रवादीची उमेदवारी उदयनराजेंनाच मिळेल, हे जवळपास निश्चित आहे; पण उदयनराजेही सतत भाजप, शिवसेनेतील पदाधिकारी, मंत्र्यांच्या भेटी घेताना दिसतात. दुसरीकडे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साताºयात आल्यावर त्यांच्याबरोबर दिसतात. त्यामुळे उदयनराजे भोसले यांचा अंदाज भल्याभल्यांना आणखी आला नाही. आताही त्यांनी ही गुगली टाकून वेगळाच राजकीय डाव टाकला, हे निश्चित आहे. त्यामुळे त्यांचा अंदाज वर्तविणे कोणालाही कधीच शक्य नसते, हेच पुन्हा एकदा दिसून येत आहे. यावर सोशल मीडियावरही चर्चा रंगायला लागली आहे.जगात शांतता नांदावी...पुलवामातील शहीद जवानांना खासदार उदयनराजे यांनी श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, ‘खºया अर्थाने जातपात नसती तर जग सुखी झाले असते. पूर्वी आणि आताच्या लोकांत खूप फरक आहे. पूर्वीच्या लोकांच्या समोर समाजाचे हित होते. कोणताही धर्म हिंसाचार करा म्हणून सांगत नाही. जगात शांतता राहावी, यासाठी सर्वांनीच मनन आणि चिंतन करावे. कारण, एकदा ठिणगी पडली तर उत्तरला प्रत्युत्तर असते. म्हणूनच जगात शांतता नांदावी, हीच इच्छा आहे.’

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले