शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘दोरया म्हणा मोरयाऽऽ’चा अंगापुरात भक्तांकडून गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:39 IST

अंगापूर : शेकडो वर्षांची परंपरा असणारा अंगापूर वंदन व अंगापूर तर्फ तारगाव या दोन्ही गावांमधील गणेशोत्सव म्हणजे भद्रोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी ‘दोरया म्हणा मोरया-मोरया, म्हणा दोरया,’च्या गजराने दोन्ही गावांतील परिसर दुमदुमून गेला. या उत्सवाला राज्यभरासह जिल्ह्यातील हजारो भाविकांची उपस्थिती होती.हा उत्सव भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्र्रपद शुद्ध पंचमी ...

अंगापूर : शेकडो वर्षांची परंपरा असणारा अंगापूर वंदन व अंगापूर तर्फ तारगाव या दोन्ही गावांमधील गणेशोत्सव म्हणजे भद्रोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी ‘दोरया म्हणा मोरया-मोरया, म्हणा दोरया,’च्या गजराने दोन्ही गावांतील परिसर दुमदुमून गेला. या उत्सवाला राज्यभरासह जिल्ह्यातील हजारो भाविकांची उपस्थिती होती.हा उत्सव भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्र्रपद शुद्ध पंचमी या पाच दिवसांपासून सुरू होता. या पाच दिवसांत श्रींच्या धार्मिक विधीबरोबरच कीर्तन व भजनाचे आयोजन करण्यात आले होते. चतुर्थी व पंचमी हे उत्सवातील मुख्य दिवस असल्याने या दोन्ही दिवशी मोठ्या प्रमाणात यात्रा भरविली जाते. राज्यासह जिल्ह्यातील भाविक-भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने रांगा लावल्या होत्या.गणेशचतुर्थीला सायंकाळी दोरेकऱ्यांचे आगमन गणपती मंदिरात झाले. या दोरेकºयांनी ‘दोरया म्हणा मोरयाऽ’चा गजर करत पाच प्रदक्षिणा घातल्या. यावेळी मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. रात्री बाराला श्रींची जन्मकाळ झाला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. भाद्रपद शुद्ध पंचमीला ग्रामदैवत एवर्जीनाथांच्या मंदिरात भदपात्र प्रज्वलित करून गेले महिनाभर अनुष्ठान केलेले हणमंत दीक्षित यांनी डोक्यावर घेऊन दोन्ही गांवाना तसेच मंदिरात पाच प्रदक्षिणा घातल्या. त्यांच्यासोबत दोन्हीगावच्या श्रींच्या पालख्या घेऊन मानकरी सहभागी झाले होते. या प्रज्वलित भक्त पात्रात भाविकांनी धूप, ऊद, खारीक टाकून दर्शन घेतले. यात्राकाळात भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. हार, नारळ, मेवा, मिठाई, खेळणी, पाळण्याच्या दुकानांनी परिसर व्यापून गेला होता.