शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

"जुने मुद्दे काढणे ही फालतुगिरी"; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यावर निशाणा

By नितीन काळेल | Updated: April 9, 2023 18:19 IST

आता तर फडतूस, काडतूस म्हणायचे, हे काय चालले आहे राज्यात, असे सांगून पवार यांनी अदानींच्या मुद्द्यावरही भाष्य केले.

सातारा : ‘सध्या जुने मुद्दे काढून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविले जात आहे. यामुळे बेरोजगारी, महागाई कमी होणार आहे का? आता त्यांच्याकडे महत्त्वाचे मुद्देच राहिले नाहीत, ही तर फालतुगिरी आहे,’ अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला, तर ट्वीटच्या मुद्द्यावर त्यांनी उत्तर द्यायला बांधिल आहे का, त्याने अंगाला भोके पडतात का? असा प्रश्नही उपस्थित केला.

सातारा जिल्हा दाैऱ्यावर रविवारी अजित पवार होते. साताऱ्यातील जिल्हा बॅंकेतील कार्यक्रमावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांनाही उत्तरे दिली. या कार्यक्रमाला आमदार मकरंद पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, ‘महत्त्वाच्या व्यक्तीने काय वक्तव्य केले तर त्याबद्दल मत व्यक्त करावे लागते. कारण, मत व्यक्त केले नाही तर लोकांच्या मनात समज-गैरसमज निर्माण होतात. त्याबद्दल उत्तर द्यायला बांधिल आहे. पण, रोजच हाैसे, गवसे ट्वीट करणार. त्याच्या बातम्याही येणार म्हणून काय उत्तर द्यावे एवढेच काम नाही.

आता तर फडतूस, काडतूस म्हणायचे, हे काय चालले आहे राज्यात, असे सांगून पवार यांनी अदानींच्या मुद्द्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, टाटा, बिर्ला यांनी उद्योगाचा पाया रचला. लोकांना रोजगार दिला. त्याचा अर्थव्यवस्थेवर चांगला परिणाम झाला. अंबानी आणि अदानींनीही तसेच केले. आता अदानींबाबत समिती नेमण्यात येणार आहे. समिती नेमल्यानंतर वस्तूस्थिती समोर येईल. पण, आपण लगेच कुणाला तरी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतो हेही बरोबर नाही. अदानींमुळे महाविकास आघाडीत फूट पडणार नाही. शरद पवार, सोनिया गांधी आणि उध्दव ठाकरे पाठिशी आहेत. तोपर्यंत काही होणार नाही.

राज्यात वळीव पावसामुळे नुकसान झाले आहे. अशावेळी मुख्यमंत्री अयोध्या दाैऱ्यावर असल्याच्या प्रश्नावर पवार यांनी ‘मुख्यमंत्री पंचनामे करत नाहीत. आम्हीसुध्दा जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्याबाबत सूचना करू, शकतो. मुंबईला गेल्यावर मुख्य सचिवांशी याबाबत बोलणार आहे. पण, श्रध्दा असल्याने आम्हीही कोणत्याही देवस्थानला जातो. काही लोक शिर्डी, जेजुरी, तिरुपतीला जातात. ज्यांना योग्य वाटते ते तसे जातात, असे स्पष्टीकरण दिले.जिल्हा बॅंकेचे काम चांगले...

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही देशातील अग्रगण्य असणाऱ्या पहिल्या पाचमध्ये आहे. या बॅंकेचे नेतृत्व आतापर्यंत दिग्गजांनी केले आहे. आता नितीन पाटील यांच्या रुपाने नवीन पिढी चांगले काम करत आहे, असे ग़ाैरवोद्गारही अजित पवार यांनी काढले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे