शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

केवळ पोपटपंची करून विकास होत नाही अजित पवार; चाफळमध्ये विक्रमसिंह पाटणकरांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:08 IST

चाफळ : ‘विधानसभेच्या पराभवाची पाटणकरांची खंत २०१९ मध्ये भरून काढण्याची तयारी केली आहे. नुसती पोपटपंची करून विकास होत नाही.

चाफळ : ‘विधानसभेच्या पराभवाची पाटणकरांची खंत २०१९ मध्ये भरून काढण्याची तयारी केली आहे. नुसती पोपटपंची करून विकास होत नाही. त्यासाठी धमक असावी लागते. ती धमक पाटणच्या विद्यमान आमदारांकडे नाही,’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

चाफळ येथे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा अमृत महोत्सव वर्ष प्रारंभप्रसंगी बुधवारी मेळावा पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर होते. ज्येष्ठ नेते तात्यासाहेब दिवशीकर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार नरेंद्र पाटील, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, सत्यजित पाटणकर, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुनील माने, माजी आमदार प्रभाकर घाडगे, सारंग पाटील, वसंतराव मानकुमरे, राजेश पाटील, सुजित पाटील, सभापती उज्ज्वला जाधव, बाजार समितीचे उपसभापती दादासाहेब यादव उपस्थित होते.

रामराजे म्हणाले, ‘दुर्गम पाटण तालुक्यातील गावागावांत विकासाची गंगा पाटणकरांनी पोहोचवली. राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत.’विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, ‘तरुणांनी फसवणाºयांच्या मागे न लागता राष्ट्रवादीची ताकद मजबूत करून २०१९ ची तयारी अशी करा की विरोधकाला थेट साताºयाच्या घरी पाठवण्याची सोय होईल.’सत्यजित पाटणकर, आमदार नरेंद्र पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. विक्रमसिंह पाटणकर यांना दिलेल्या मानपत्राचे वाचन प्रा. दीपक डांगे- पाटील यांनी केले. रुपाली पाटील, चंद्रकांत देशमुख, शिवाजीराव पाटील, सरपंच विनोद कदम यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती व सरपंच, सदस्य उपस्थित होते. सभापती राजेश पवार यांनी प्रास्ताविक केले. दादासाहेब यादव यांनी आभार मानले.रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसादचाफळ येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यानिमित्त निसरे फाटा ते चाफळपर्यंत भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. यामध्ये तरुणांसह तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यावेळी तरुणांच्या घोषणाबाजीने संपूर्ण चाफळ परिसर दणाणून गेला होता.जनतेला देशोधडीला लावण्याचे काम!राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जिवाभावाचे सहकारी म्हणून विक्रमसिंह पाटणकर यांची संपूर्ण राज्यात ओळख आहे. महापुरुषांची नावे घेऊन भावनिक राजकारण करणारा भाजप हा जातीयवादी पक्ष सामान्य जनतेला न्याय देणार नाही. राज्यावर कर्ज करणाºया या भाजप सरकारला हाकलून देण्याची वेळ आली आहे. राज्यातील व केंद्रातील भाजप सरकार केवळ सामान्य जनतेला देशोधडीला लावण्याचे काम करत आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्याची दुर्दशा झाली आहे, अशी टिका अजित पवार यांनी केली.फडणवीस नव्हे ‘फसवणूक’ सरकार !सध्याचे भाजप, शिवसेना सरकार शेतकºयांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांची उघडपणे फसवणूक करीत आहे. हे फडणवीस नव्हे तर ‘फसवणूक सरकार’ आहे. भाजप, शिवसेना शासनाला पश्चिम महाराष्ट्राची अ‍ॅलर्जी झाली असल्यामुळेच जनहिताच्या प्रकल्पांवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे.सध्याच्या शासनकर्त्यांना सत्तेची धुंदी चढली आहे. ती धुंदी लवकरच उतरेल, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSatara areaसातारा परिसरPoliticsराजकारण