शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

केवळ पोपटपंची करून विकास होत नाही अजित पवार; चाफळमध्ये विक्रमसिंह पाटणकरांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 01:08 IST

चाफळ : ‘विधानसभेच्या पराभवाची पाटणकरांची खंत २०१९ मध्ये भरून काढण्याची तयारी केली आहे. नुसती पोपटपंची करून विकास होत नाही.

चाफळ : ‘विधानसभेच्या पराभवाची पाटणकरांची खंत २०१९ मध्ये भरून काढण्याची तयारी केली आहे. नुसती पोपटपंची करून विकास होत नाही. त्यासाठी धमक असावी लागते. ती धमक पाटणच्या विद्यमान आमदारांकडे नाही,’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

चाफळ येथे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा अमृत महोत्सव वर्ष प्रारंभप्रसंगी बुधवारी मेळावा पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर होते. ज्येष्ठ नेते तात्यासाहेब दिवशीकर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार नरेंद्र पाटील, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, सत्यजित पाटणकर, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुनील माने, माजी आमदार प्रभाकर घाडगे, सारंग पाटील, वसंतराव मानकुमरे, राजेश पाटील, सुजित पाटील, सभापती उज्ज्वला जाधव, बाजार समितीचे उपसभापती दादासाहेब यादव उपस्थित होते.

रामराजे म्हणाले, ‘दुर्गम पाटण तालुक्यातील गावागावांत विकासाची गंगा पाटणकरांनी पोहोचवली. राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत.’विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, ‘तरुणांनी फसवणाºयांच्या मागे न लागता राष्ट्रवादीची ताकद मजबूत करून २०१९ ची तयारी अशी करा की विरोधकाला थेट साताºयाच्या घरी पाठवण्याची सोय होईल.’सत्यजित पाटणकर, आमदार नरेंद्र पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. विक्रमसिंह पाटणकर यांना दिलेल्या मानपत्राचे वाचन प्रा. दीपक डांगे- पाटील यांनी केले. रुपाली पाटील, चंद्रकांत देशमुख, शिवाजीराव पाटील, सरपंच विनोद कदम यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती व सरपंच, सदस्य उपस्थित होते. सभापती राजेश पवार यांनी प्रास्ताविक केले. दादासाहेब यादव यांनी आभार मानले.रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसादचाफळ येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यानिमित्त निसरे फाटा ते चाफळपर्यंत भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. यामध्ये तरुणांसह तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यावेळी तरुणांच्या घोषणाबाजीने संपूर्ण चाफळ परिसर दणाणून गेला होता.जनतेला देशोधडीला लावण्याचे काम!राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जिवाभावाचे सहकारी म्हणून विक्रमसिंह पाटणकर यांची संपूर्ण राज्यात ओळख आहे. महापुरुषांची नावे घेऊन भावनिक राजकारण करणारा भाजप हा जातीयवादी पक्ष सामान्य जनतेला न्याय देणार नाही. राज्यावर कर्ज करणाºया या भाजप सरकारला हाकलून देण्याची वेळ आली आहे. राज्यातील व केंद्रातील भाजप सरकार केवळ सामान्य जनतेला देशोधडीला लावण्याचे काम करत आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्याची दुर्दशा झाली आहे, अशी टिका अजित पवार यांनी केली.फडणवीस नव्हे ‘फसवणूक’ सरकार !सध्याचे भाजप, शिवसेना सरकार शेतकºयांना कर्जमाफीचे गाजर दाखवून त्यांची उघडपणे फसवणूक करीत आहे. हे फडणवीस नव्हे तर ‘फसवणूक सरकार’ आहे. भाजप, शिवसेना शासनाला पश्चिम महाराष्ट्राची अ‍ॅलर्जी झाली असल्यामुळेच जनहिताच्या प्रकल्पांवर जाणीवपूर्वक अन्याय केला जात आहे.सध्याच्या शासनकर्त्यांना सत्तेची धुंदी चढली आहे. ती धुंदी लवकरच उतरेल, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSatara areaसातारा परिसरPoliticsराजकारण