शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
4
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
5
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
6
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
7
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
8
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
9
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
10
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
11
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
12
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
13
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
14
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
15
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
16
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
17
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
18
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
19
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासाचा साक्षीदार अजिंक्यतारा असंरक्षित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:48 IST

प्रगती जाधव-पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मराठा साम्राज्याची चौथी व अखेरची राजधानी राहिलेला अजिंक्यतारा किल्ला भाडेतत्त्वावर दिला ...

प्रगती जाधव-पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : मराठा साम्राज्याची चौथी व अखेरची राजधानी राहिलेला अजिंक्यतारा किल्ला भाडेतत्त्वावर दिला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य लाभलेला हा किल्ला पुरातत्त्व विभागाच्या दृष्टीने तितकासा महत्त्वाचा नसावा, त्यामुळेच तो आजअखेर असंरक्षित राहिला. शासनाच्या नव्या धोरणानुसार छत्रपती शिवरायांचा हा किल्ला पुढील किमान ३० किंवा ६० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यास पात्र ठरला आहे. गड-किल्ल्यांवरून राज्यभरात उठलेलं वावटळ खाली बसलं असलं तरी मराठा साम्राज्याची चौथी राजधानी अजूनही दुर्लक्षाच्या गर्तेत आहे.खासगी विकासकाच्या नरड्यात किल्ला घालण्याऐवजी शासनाने खास बाब म्हणून स्वनिधीतून किल्ल्याची दुरुस्ती, सुधारणा व सुविधा यांचा विकास करावा, अशी शिवप्रेमी शाहूनगरवासीयांची अपेक्षा आहे. राज्यातील २५ गड-किल्ले भाडेतत्त्वावर देण्याचा वादग्रस्त निर्णय राज्य सरकारच्या अंगलट आला. प्रसार माध्यमातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर राज्य सरकारने वर्ग दोनचेच किल्ले भाडेतत्त्वावर दिले जातील, असे स्पष्टीकरण दिले आहे. वर्ग १ मधील म्हणजे राज्य किंवा केंद्र शासनाच्या पुरातत्त्व विभागातर्फे संरक्षित केलेल्या किल्ल्यांचा विकास शासन स्वतंत्रपणे करते. रायगडाप्रमाणे या वर्गवारीतील किल्ल्यांचे ऐतिहासिक वारसा म्हणून जतन केले जाते. राज्यातील उर्वरित ३०० किल्ले हे असंरक्षित म्हणजे वर्ग २ मधील आहेत. त्यांचाच पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आल्याचे स्पष्टीकरण पर्यटन विभागाच्या सचिव विनिता सिंघल यांनी दिले आहे.अजिंक्यतारा इतिहासात अनेक कारणांनी महत्त्वपूर्ण राहिला आहे. पहिल्या आदिलशाहाची पत्नी चांदबिबी, बजाजी निंबाळकर याच किल्ल्यावर कैदेत होते. आजारपणात छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुमारे दोन महिने वास्तव्य या किल्ल्यावर होते. शिवाजी महाराजांच्या पश्चात मुघल साम्राज्याचा सम्राट औरंगजेब हा किल्ला ताब्यात मिळवण्यासाठी आपल्या दोन मुलांसह किल्ल्याला वेढा टाकून बसला होता. चार महिन्यांपेक्षा अधिक काळ त्याला अजिंक्यताऱ्यावरील मूठभर मावळ्यांनी साताºयात रोखले होते.रायगड मोगलांच्या ताब्यात गेल्यानंतर जिंजी व त्यानंतर अजिंक्यतारा किल्ला हा मराठा साम्राज्याची राजधानी राहिला. छत्रपती संभाजीपुत्र शाहू महाराजांचे राज्यारोहण याच किल्ल्यावर झालं. राजमाता येसूबाई, महाराणी ताराबाई, छत्रपती शाहू महाराज यांचे वास्तव्य याच किल्ल्यावरील वाड्यात राहिले. स्थापत्य शास्त्राच्या दृष्टीनेही हा किल्ला महत्त्वपूर्ण आहे.संरक्षित स्मारकाचे कवच मिळणार कधी ?‘छत्रपती शिवाजी महाराजांचा, हिंदवी साम्राज्याचा मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित असलेल्या किल्ल्यांना नखही लावू देणार नाही,’ अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा इरादा स्पष्ट केला आहे. पुरातत्त्व विभागाने अद्याप अजिंक्यतारा किल्ल्याला ‘संरक्षित स्मारक’ म्हणून सुरक्षा कवच दिलेले नाही. त्यामुळे हा किल्ला वर्ग २ मध्येच राहिला आहे. परिणामी अजिंक्यतारा किल्ला भाडेतत्त्वावर देण्यासाठी विकासकांना पायघड्या घातल्या जाणार आहेत. शाहूनगरवासीय याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात? हे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे.