शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
4
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
5
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
6
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
7
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
8
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
9
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
10
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
11
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
12
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
13
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
14
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
15
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
16
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
17
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
18
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
19
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी

सातारा लोकसभा निवडणुकीनंतर अजूनही आचारसंहिता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 16:10 IST

लोकसभा निवडणुकीचे कुरुक्षेत्र आता शांत झाले आहे. मंगळवारी (दि.२३ एप्रिल) मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मात्र, अजूनही आचारसंहिता कायम असल्याने दैनंदिन व्यवहारांवर काही प्रमाणात निर्बंध असल्याचे स्पष्ट चित्र आहे.

ठळक मुद्दे सातारा लोकसभा निवडणुकीनंतर अजूनही आचारसंहिता कायम दैनंदिन व्यवहारांवर काही प्रमाणात निर्बंध

सागर गुजरसातारा : लोकसभा निवडणुकीचे कुरुक्षेत्र आता शांत झाले आहे. मंगळवारी (दि.२३ एप्रिल) मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मात्र, अजूनही आचारसंहिता कायम असल्याने दैनंदिन व्यवहारांवर काही प्रमाणात निर्बंध असल्याचे स्पष्ट चित्र आहे.गेल्या दोन महिन्यांपासून सातारा जिल्ह्यात लोकसभेचे कुरुक्षेत्र सुरू होती. २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील ११ लाख ९ हजार ४३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. लोकसभा निवडणुकीसाठी यंदा १८ लाख ३८ हजार ९८७ मतदारांपैकी तब्बल ११ लाख ९ हजार ४३४ मतदारांनी मतदान केले. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत ९ लाख ७६ हजार ६८१ मतदारांनी मतदान केले होते. यंदा ४ टक्क्यांनी मतदान वाढले आहे.राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले व शिवसेनेचे नरेंद्र पाटील, वंचित बहुजन आघाडीचे सहदेव ऐवळे, आनंदा थोरवडे (बहुजन समाज पार्र्टी), दिलीप जगताप (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), पंजाबराव पाटील (बळीराजा शेतकरी संघटना), शैलेंद्र वीर, सागर भिसे, अभिजित बिचुकले (अपक्ष) या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले आहे.आता २३ मे पर्यंत निकालाची वाट पाहावी लागणार आहे. मतदान झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल होईल, असा अंदाज जिल्ह्यातील नागरिकांना होता. मात्र तसे अद्याप झालेले नाही. आचारसंहितेचे निर्बंध अजूनही कायम आहे.

रात्री उशिराच्या कार्यक्रमांवर बंदी कायम आहे. फेसबुक, ट्विटर तसेच इतर सोशल मीडियावर निवडणूक आयोगाची अजूनही करडी नजर राहणार आहे. महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यासाठी २९ एप्रिल रोजी मतदान घेतले जाणार आहे. यामुळे आचारसंहितेचे निर्बंध संपूर्ण महाराष्ट्रात कायम ठेवण्यात आले आहेत.२९ मे रोजी या मतदार संघात मतदाननंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरुर, शिर्डी या १७ मतदार संघात २९ एप्रिल रोजी मतदान घेतले जाणार आहे. हे सर्व मतदारसंघ महाराष्ट्रात येतात.कार्यक्रमांवर बंदीजिल्ह्यातील अनेक गावांमध्ये यात्रा सुरू आहेत. या यात्रांमधील ग्रामदैवतांचा छबिना रात्रभर सुरू ठेवण्यात आला. मात्र, दुसऱ्या दिवशी रात्री होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांवर रात्री दहानंतर बंदी घालण्यात आली होती. अनेक गावांनी हे सांस्कृतिक कार्यक्रम सकाळच्या वेळेत घेतले.

लोकसभेची आचारसंहिता कायम आहे. निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतेही निर्देश प्राप्त झाले नाहीत, त्यामुळे आचारसंहितेचे निर्बंध अजूनही लागू आहेत.- श्वेता सिंघल,जिल्हा निवडणूक अधिकारी

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsatara-pcसाताराcollectorजिल्हाधिकारी