शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सातारा लोकसभा निवडणुकीनंतर अजूनही आचारसंहिता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 16:10 IST

लोकसभा निवडणुकीचे कुरुक्षेत्र आता शांत झाले आहे. मंगळवारी (दि.२३ एप्रिल) मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मात्र, अजूनही आचारसंहिता कायम असल्याने दैनंदिन व्यवहारांवर काही प्रमाणात निर्बंध असल्याचे स्पष्ट चित्र आहे.

ठळक मुद्दे सातारा लोकसभा निवडणुकीनंतर अजूनही आचारसंहिता कायम दैनंदिन व्यवहारांवर काही प्रमाणात निर्बंध

सागर गुजरसातारा : लोकसभा निवडणुकीचे कुरुक्षेत्र आता शांत झाले आहे. मंगळवारी (दि.२३ एप्रिल) मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मात्र, अजूनही आचारसंहिता कायम असल्याने दैनंदिन व्यवहारांवर काही प्रमाणात निर्बंध असल्याचे स्पष्ट चित्र आहे.गेल्या दोन महिन्यांपासून सातारा जिल्ह्यात लोकसभेचे कुरुक्षेत्र सुरू होती. २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील ११ लाख ९ हजार ४३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. लोकसभा निवडणुकीसाठी यंदा १८ लाख ३८ हजार ९८७ मतदारांपैकी तब्बल ११ लाख ९ हजार ४३४ मतदारांनी मतदान केले. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत ९ लाख ७६ हजार ६८१ मतदारांनी मतदान केले होते. यंदा ४ टक्क्यांनी मतदान वाढले आहे.राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले व शिवसेनेचे नरेंद्र पाटील, वंचित बहुजन आघाडीचे सहदेव ऐवळे, आनंदा थोरवडे (बहुजन समाज पार्र्टी), दिलीप जगताप (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), पंजाबराव पाटील (बळीराजा शेतकरी संघटना), शैलेंद्र वीर, सागर भिसे, अभिजित बिचुकले (अपक्ष) या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त झाले आहे.आता २३ मे पर्यंत निकालाची वाट पाहावी लागणार आहे. मतदान झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल होईल, असा अंदाज जिल्ह्यातील नागरिकांना होता. मात्र तसे अद्याप झालेले नाही. आचारसंहितेचे निर्बंध अजूनही कायम आहे.

रात्री उशिराच्या कार्यक्रमांवर बंदी कायम आहे. फेसबुक, ट्विटर तसेच इतर सोशल मीडियावर निवडणूक आयोगाची अजूनही करडी नजर राहणार आहे. महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यासाठी २९ एप्रिल रोजी मतदान घेतले जाणार आहे. यामुळे आचारसंहितेचे निर्बंध संपूर्ण महाराष्ट्रात कायम ठेवण्यात आले आहेत.२९ मे रोजी या मतदार संघात मतदाननंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरुर, शिर्डी या १७ मतदार संघात २९ एप्रिल रोजी मतदान घेतले जाणार आहे. हे सर्व मतदारसंघ महाराष्ट्रात येतात.कार्यक्रमांवर बंदीजिल्ह्यातील अनेक गावांमध्ये यात्रा सुरू आहेत. या यात्रांमधील ग्रामदैवतांचा छबिना रात्रभर सुरू ठेवण्यात आला. मात्र, दुसऱ्या दिवशी रात्री होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांवर रात्री दहानंतर बंदी घालण्यात आली होती. अनेक गावांनी हे सांस्कृतिक कार्यक्रम सकाळच्या वेळेत घेतले.

लोकसभेची आचारसंहिता कायम आहे. निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतेही निर्देश प्राप्त झाले नाहीत, त्यामुळे आचारसंहितेचे निर्बंध अजूनही लागू आहेत.- श्वेता सिंघल,जिल्हा निवडणूक अधिकारी

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsatara-pcसाताराcollectorजिल्हाधिकारी