शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

आजीच्या विरहानं तिनं घर सोडलं; पण...

By admin | Updated: August 11, 2015 00:01 IST

रिक्षाचालक, पोलिसांच्या सावधगिरीमुळं चिमुकली सुखरूप स्वगृही

शेखर जाधव - वडूज -पंधरा दिवसांपूर्वी आजी गेली. तिच्या विरहानं अकरा वर्षांची चिमुकली एकटी झाली. याच विरहवेदनेमुळं तिनं घर सोडलं खरं; पण त्यानंतरचा तिचा दिवसभराचा प्रवास तिची कसोटी पाहणारा ठरला. रहिमतपूर येतील कन्या प्रशालेमध्ये सातवीत शिकणारी ऊर्मिला शरद कुंभार हिला एकूण पाच बहिणी. दोघींची लग्नं झालेली. एक बहीण शुभांगी बारावीत शिकतेय. दुसरी कोमल नववीत आहे. या तिघींच्यांत किरकोळ कारणावरून नेहमी भांडणे व्हायची. सर्वांत लहान ऊर्मिला असल्यामुळे थोरल्या दोघी तिला रागवायच्या. त्यावेळी लाडकी आजीच ऊर्मिलाची बाजू आजी घ्यायची. अशी आजी अचानक जगातून निघून गेल्यामुळं ऊर्मिलाला घरात एकटं वाटू लागलं. आता आपली बाजू घेणारं कुणी नाही, असा विचार तिच्या मनात येऊ लागला.रविवारी (दि. ९) सकाळी ९ वाजता डब्यात साठविलेले १४० रुपये घेऊन ती रहिमतपूरहून वडूजला जाणाऱ्या एसटीत बसली. बसमध्ये कुणी ओळखणारं भेटलंच तर त्याला सांगायला बरीच कारणं तिनं तयार ठेवली होती. परंतु बसमध्ये ओळखीचं कुणीच नव्हतंं. कुठं जायचं, हे निश्चित नसतानाही तिनं हे पाऊल उचललं होतं. आपल्या नशिबी पुढे काय आहे, हेही तिला ज्ञात नव्हतं. इकडे आई-वडील ,दोन बहिणी आणि नातलग तिचा शोध घेऊ लागले.रिक्षाचालकाला हा प्रकार वेगळा असल्याचा संशय आल्याने त्याने रिक्षा पोलीस ठाण्यात आणली. हवालदार शांताराम आेंबासे यांना ऊर्मिलेची कहाणी रिक्षावाल्याने सांगतिली. ‘आम्ही सर्वजण गेल्या महिन्यापासून इथेच राहतो. वडील सातारला पेट्रोलपंपावर कामाला असतात,’ असं ऊर्मिलानं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी विचारल्यावर पूर्ण नावही सांगितलं. ‘माझी बहीण खटाव कालेजमध्ये अकरावीत शिकत असून तिने मला घरी जाण्यास सांगितलंय; पण मला घर सापडेना,’ असं ती म्हटल्यावर पोलिसांनी तत्काळ खटाव कालेज गाठलं. परंतु रविवार असल्याने कालेजला सुटी होती.मग मात्र पोलिसांनी कसून चौकशी केली, तेव्हा तिने मावशीबद्दल आणि साताऱ्यात राजवाड्याजवळ पडकं घर असल्याचं सांगितलं. त्या दिशेनंही पोलिसांनी जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर संपर्क साधला; पण हाती काहीच लागेने. नंतर महिला पोलीस आशाताई काळे यांनी तिला नाष्टा आणून दिला आणि पुन्हा चौकशी केली. ही मात्राही लागू न झाल्यानं ठाणे अंमलदार धनाजी वायदंडे यांनी तिला पेन दिलं आणि ‘तुला आठवेल तो मोबाइल नंबर लिही’ असं सांगितलं. कागदावर तिने भरकन वडिलांचा नंबर लिहिला आणि अखेर ती रहिमतपूरच्या शरद कुंभार यांची मुलगी असल्याचं स्पष्ट झालं. रहिमतपूरहून रात्री उशिरा ऊर्मिलाचे वडील आणि नातलग आले. पोलीस ठाण्यातले सोपस्कार उरकून ऊर्मिलाला घेऊन गेले. जाता-जाता पोलीस कर्मचारी शांताराम ओंबासे, धनाजी वायदंडे एवढंच म्हणाले... ‘नशीब बलवत्तर म्हणूनच ती ऊर्मिला वडूजमध्ये आली.’ मुला-मुलींचे अपहरण होण्याच्या घटना वाढत असताना ऊर्मिलाने उचललेले हे पाउल आत्मघातकीच म्हणावं लागेल. सुमारे तीस हजार लोकवस्ती असलेल्या वडूजनगरीचा बसस्थानकावर ऊर्मिला सकाळी ११ वाजता पोहोचली आणि रिक्षाकडे धावली. रिक्षावाल्याने ‘कुठं जायचंय’ विचारलं असता ‘सरळ चला’ असं तिनं सांगितलं. रिक्षा कर्मवीरनगरमध्ये आली तेव्हा रिक्षाचालकाने पुन्हा विचारलं. नेमकं उत्तर न मिळाल्याने संभ्रमावस्थेत सापडलेल्या रिक्षाचालकाला हा प्रकार वेगळाच असल्याची चाहूल लागली.