शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

‘हायवे मेगाब्लॉक’नंतर गतिरोधके उद्ध्वस्त

By admin | Updated: November 15, 2015 23:53 IST

दहा किलोमीटरसाठी तीन तास : लिंब-खिंड ते पाचवड अन् शेंद्रे ते नागठाणे मार्गावर पाच तास वाहतुकीचा खोळंबा

भुर्इंज/नागठाणे : पुणे-बेंगलोर महामार्गावर पाचवड ते लिंबखिंडीपर्यंत प्रचंड ट्रॅफिक जाम असल्याने रविवारी दुपारपासून वाहनचालक व प्रवाशांचे बेफाम हाल झाले. केवळ दहा किलोमीटर अंतर पार पाडण्यासाठी वाहनांना तब्बल पाच तास लागले. हीच परिस्थिती शेंद्रे ते नागठाणे दरम्यानही निर्माण झाली.दिवाळीच्या सुट्या संपल्याने महामार्ग शनिवार पासूनचे वाहनांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहे. या गर्दीचा रविवारी कहर झाला. पाचवड येथे सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक सेवा रस्त्याने वळविण्यात आली आहे. त्यामुळे पाचवड ते थेट गौरीशंकर कॉलेज या दहा किलोमीटर अंतरापर्यंत ट्रॅफिक जाम झाले आणि त्यामुळे वाहन चालकांसह प्रवाशांचे बेफाम हाल झाले. वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रवासी अक्षरश: रडवेले झाले होते. टोल नाक्यावरील अंदाधुंदी या ट्रॅफिक जाममध्ये भर घालणारी ठरली. फक्त अर्थपूर्ण कारणासाठी टोल नाक्यावर उभे असणारे वाहतूक पोलिसही ट्रॅफिक जाम दूर करताना दिसून आले नाहीत. दिवाळीची सुटी तसेच शनिवारी दुसरा शनिवार व रविवार अशा सलग सुट्या आल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांची पावले महाबळेश्वर, पाचगणी, कास, बामणोलीच्या दिशेने वळाला लागले आहेत. महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यावर वाहनांची गर्दी होत आहे.सलग सुट्या साजऱ्या करण्यासाठी पुणे, मुंबईसह गुजरात राज्यातून मोठ्या संख्येने पर्यटक महाबळेश्वरला येणे पसंत करत असतात. त्यामुळेच महाबळेश्वर पाचगणी मार्गावर शनिवारी वाहनांच्या लांबचलाब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सुमारे दोन ते तीन तास वाहतुकीची कोंडी झाली होती.आनेवाडी टोलनाक्यावरही शनिवारी व रविवारी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे टोलनाक्यावर लेन वाढविण्याची मागणी वाहनचालकांमधून केली जात आहे. दिवाळीच्या सुट्या संपल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र.४ वर साताराहून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. उडतारे गावापासून पाचवड फाट्यापर्यंत महामार्गावर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. सातारहून पुणे-मुंबईकडे जाणारा मोठा नोकदारवर्ग आहे. दिवाळीच्या सुट्या संपल्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला मोठ्या फाट्यांवर ठिकठिकाणी हा नोकरदारवर्ग पुणे-मुंबईकडे प्रवासासाठी थांबल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडताना दिसत होती. सुट्यांमध्ये सातारा-कोल्हापूरकडे येणाऱ्या पर्यटकांचीही संख्या सध्या जास्त असून, हे पर्यटक सध्या परतीच्या मार्गावर आहेत. शनिवारपासून सुरू झालेली वाहतुकीची कोंडी रविवारी सायंकाळपर्यंत वाढत गेली. साताराकडून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या होत्या. वाहतुकीच्या कोंडीमुळे काही वाहनचालकांमध्ये वादावादीच्या घटनाही घडल्या. पाचवड फाट्यावरील चौकामध्ये भुर्इंज पोलिसांचा मोठा फौैजफाटा तैणात करण्यात आला असून, रविवारी उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न पोलिसांमार्फत सुरू होते. (प्रतिनिधी)पोलीस खाते बनले आक्रमकलिंबखिंड ते पाचवड दरम्यान सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे पर्यायी रस्त्यावर जागोजागी ठेकेदाराने गतिरोधक उभे केले आहेत. या गतिरोधकांमुळेच रविवारी सायंकाळपासून वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा पोलीस खात्यानेच पुढाकार घेऊन ही सर्व गतिरोधके उखडण्याची मोहिम संबंधितांना हाती घ्यायला लावली. जवळपास एक तास जेसीबी यंत्रांनी वीसपेक्षाही जास्त गतिरोधके उद्ध्वस्त करण्यात आली. तरीही रात्री दहापर्यंत वाहतूक सुरळीत होण्याची चिन्हे दिसत नव्हती.