शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
4
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
5
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
6
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
7
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
8
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
9
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
10
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
11
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
12
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
13
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
14
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
15
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
17
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
18
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
19
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
20
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलींचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले

कंबरडं मोडल्यानंतरच होतंय देवाचं दर्शन

By admin | Updated: January 23, 2015 23:39 IST

शिखर शिंगणापूर रस्त्याची दुरवस्था : उपाययोजनेची मागणी; यात्रेच्या तोंडावर भाविकांची कुचंबणा

पळशी : महाराष्ट्राचे कुलदैवत शिखर शिंगणापूर येथील शिंगणापूर बसस्थानक ते शिखर शिंगणापूर मंदिर या एक किलोमीटर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत तर विश्रामगृहाजवळील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. बऱ्याच ठिकाणी साईडपट्ट्याही खचलेल्या आहेत. मुळातच हा रस्ता एकेरी असून, ठिकठिकाणी खडी उखडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. शिखर शिंगणापूर यात्रा अवघ्या अडीच महिन्यांवर येऊन ठेपली आहे, असे असताना याची कोणतीही दखल घेतली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.या रस्त्यावरच्या साईडपट्ट्या खराब झाल्याने धोकादायक बनल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी दोन वाहने समोरासमोर आल्यास वाहन बाजूला घेताना अतिशय अडचणी येत आहेत. रस्त्याकडेलाच विश्रामगृहाजवळच खडीचे ढीग वापराविना तसेच पडून आहेत. मंदिराकडे जाणारा पेठेतील रस्ता नागमोडी असून, ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहनचालक तसेच ग्रामस्थांत नाराजी आहे. येथे महाराष्ट्रासह परराज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. येणाऱ्या भाविकांना रस्त्यावरून अडचणींचा सामना करतच जावे लागते. यामुळे संबंधित विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीची सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे रस्ता दुरुस्तीबाबत सातत्याने मागणी करूनही अद्यापही रस्त्यातील खड्डे भरून घेतले नाहीत. या रस्त्याचे टेंडर मंजूर होऊनही संबंधित ठेकेदाराने काम केलेले नाही. जिल्हा परिषदेने दुसऱ्या ठेकेदाराला काम द्यावे व यात्रेपूर्वी रस्ता दुरुस्ती करावी.-राजाराम बोराटे, उपसरपंच, शिखर शिंगणापूरयात्रा अवघ्या अडीच महिन्यांवर शिखर शिंगणापूरची यात्रा ३१ मार्चला असून, या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. यात्राकाळात वाहनांची वर्दळ वाढणार असून, अद्यापही रस्ता दुरुस्ती करण्यात आलेली नाही. तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूरची सर्वदूर ओळख आहे. राज्यातील इतर देवस्थानांच्या मानाने इथला विकास खुंटलेलाच आहे. येथे येणाऱ्या लाखो भाविकांना रस्त्यांच्या गैरसोयीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. - दीपकराव तंटे-बडवेग्रामस्थ, शिखर शिंगणापूरबसस्थानक ते मंदिर रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी. रस्त्याच्या दुरवस्थामुळे भाविक हैराण झाले आहेत. संबंधित विभागाने यात्रेपूर्वी दुरुस्ती करावी. यात्रा अवघ्या अडीच महिन्यांवर आली तरी प्रशासनाचे अद्याप दुर्लक्ष आहे. -संपत शेंडे,ग्रामस्थ, शिखर शिंगणापूर