शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

अखेर श्रमाच्या घामाला मिळालं फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 23:12 IST

सातारा : कायम दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवला. ...

सातारा : कायम दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवला. त्यामधील १९८ गावांनी तब्बल ५० दिवस घाम गाळून श्रमदान करत लाखो घनमीटरचे जलसंधारणाचे काम केले. त्यानंतर पडलेल्या पहिल्याच पावसात केलेल्या पाणलोटच्या कामामुळे शिवारातील समतल चर, ओढ्या-नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला आहे.राज्यात दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये अनेक गावांमध्ये दुष्काळ पडल्याने हंडाभर पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर वणवण करावी लागते. तर जनावरांच्या चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने शेतकºयाला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेल्या जनावरांना विकण्याची वेळ येते. त्यानंतर प्रशासन जागे होऊन टँकर आणि चारा छावण्या सुरू करण्याची धडपड करत असते. या दुष्काळी चक्रातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी चार वर्षांपूर्वी अभिनेता अमीर खान याने पाणी फाउंडेशनची सुरुवात केली. त्यांनी सुरू केलेल्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेली अनेक गावे टँकरमुक्त होऊन जलयुक्त झाली.यंदाच्या वॉटर कप स्पर्धेत राज्यातील अनेक गावांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील १९८ गावांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेच्या निमित्ताने पाण्याबाबत साक्षरता होऊन पडणाºया पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब वाचवण्याचा दुष्काळग्रस्तांनी निर्धार केला. त्यासाठी अडीच वर्षांच्या बालकापासून ९० वर्षांच्या वृद्धापर्यंत सर्वच जण हातात टिकाव, खोºयाच्या साह्याने शिवारात पाणी साठवण भांडी तयार करण्यासाठी घाम गाळला. अनेक वर्षांपासून राजकारण, निवडणुकीतील गट-तटांमुळे दुंभगलेली मन एकत्र आली. विद्यार्थी, तरुण, नोकरदार, व्यावसायिक, महिल आणि वृद्धांनी एकमेकांच्या मदतीने सलग ५० दिवस श्रमदान केले.श्रमदान आणि मशीनद्वारे गावोगावी हजारो घनमीटर पाणी क्षमतेची जलसंधारणाची कामे झाली. स्पर्धा संपल्यानंतर सर्वांचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागले होते. त्यात मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणलोट विकासाच्या कामांमध्ये पाणी साठले आहे. वाहून जाणारे पाणी ठिकठिकाणी अडवल्यामुळे ते जमिनीत मुरले. पहिल्याच पावसात कोरड्या पडलेल्या कूपनलिका व विहिरी काटोकाट भरल्याने श्रमकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.वृक्षारोपणासाठी पुढाकारवॉटर कप स्पर्धेच्या काळात अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविण्यासाठी जलसंधारणाचे काम करण्यात आले. तसेच स्पर्धेचा भाग असलेल्या वृक्षारोपणासाठी उन्हाळ्यात खड्डे खणले होते. पाऊस पडल्याने शिवारात पाणी उपलब्ध झाले. त्या खणलेल्या खड्ड्यांमध्ये गावोगावी वृक्षारोपण करण्याची जोरात सुरुवात झाली आहे.