शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर श्रमाच्या घामाला मिळालं फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 23:12 IST

सातारा : कायम दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवला. ...

सातारा : कायम दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण, खटाव आणि कोरेगाव तालुक्यांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवला. त्यामधील १९८ गावांनी तब्बल ५० दिवस घाम गाळून श्रमदान करत लाखो घनमीटरचे जलसंधारणाचे काम केले. त्यानंतर पडलेल्या पहिल्याच पावसात केलेल्या पाणलोटच्या कामामुळे शिवारातील समतल चर, ओढ्या-नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला आहे.राज्यात दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये अनेक गावांमध्ये दुष्काळ पडल्याने हंडाभर पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर वणवण करावी लागते. तर जनावरांच्या चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने शेतकºयाला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेल्या जनावरांना विकण्याची वेळ येते. त्यानंतर प्रशासन जागे होऊन टँकर आणि चारा छावण्या सुरू करण्याची धडपड करत असते. या दुष्काळी चक्रातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी चार वर्षांपूर्वी अभिनेता अमीर खान याने पाणी फाउंडेशनची सुरुवात केली. त्यांनी सुरू केलेल्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेली अनेक गावे टँकरमुक्त होऊन जलयुक्त झाली.यंदाच्या वॉटर कप स्पर्धेत राज्यातील अनेक गावांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील १९८ गावांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेच्या निमित्ताने पाण्याबाबत साक्षरता होऊन पडणाºया पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब वाचवण्याचा दुष्काळग्रस्तांनी निर्धार केला. त्यासाठी अडीच वर्षांच्या बालकापासून ९० वर्षांच्या वृद्धापर्यंत सर्वच जण हातात टिकाव, खोºयाच्या साह्याने शिवारात पाणी साठवण भांडी तयार करण्यासाठी घाम गाळला. अनेक वर्षांपासून राजकारण, निवडणुकीतील गट-तटांमुळे दुंभगलेली मन एकत्र आली. विद्यार्थी, तरुण, नोकरदार, व्यावसायिक, महिल आणि वृद्धांनी एकमेकांच्या मदतीने सलग ५० दिवस श्रमदान केले.श्रमदान आणि मशीनद्वारे गावोगावी हजारो घनमीटर पाणी क्षमतेची जलसंधारणाची कामे झाली. स्पर्धा संपल्यानंतर सर्वांचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागले होते. त्यात मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणलोट विकासाच्या कामांमध्ये पाणी साठले आहे. वाहून जाणारे पाणी ठिकठिकाणी अडवल्यामुळे ते जमिनीत मुरले. पहिल्याच पावसात कोरड्या पडलेल्या कूपनलिका व विहिरी काटोकाट भरल्याने श्रमकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.वृक्षारोपणासाठी पुढाकारवॉटर कप स्पर्धेच्या काळात अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविण्यासाठी जलसंधारणाचे काम करण्यात आले. तसेच स्पर्धेचा भाग असलेल्या वृक्षारोपणासाठी उन्हाळ्यात खड्डे खणले होते. पाऊस पडल्याने शिवारात पाणी उपलब्ध झाले. त्या खणलेल्या खड्ड्यांमध्ये गावोगावी वृक्षारोपण करण्याची जोरात सुरुवात झाली आहे.