शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

पूरबाधितांसाठी धावले प्रशासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:39 IST

सातारा : पूरबाधित, अतिवृष्टीमुळे भूस्खलनबाधित ५ हजार ७०३ कुटुंबांतील २६ हजार १२८ व्यक्तींना जिल्हा प्रशासनामार्फत अन्नधान्य व केरोसीनचे ...

सातारा : पूरबाधित, अतिवृष्टीमुळे भूस्खलनबाधित ५ हजार ७०३ कुटुंबांतील २६ हजार १२८ व्यक्तींना जिल्हा प्रशासनामार्फत अन्नधान्य व केरोसीनचे वाटप सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली आहे.

पूरबाधितांमध्ये वाई तालुक्यातील २९० कुटुंबांची संख्या असून १ हजार ५०३ व्यक्तींची संख्या आहे. कऱ्हाड तालुक्यातील १ हजार ४११ कुटुंबांतील ६ हजार १५५, पाटण तालुक्यातील २ हजार ४२५ कुटुंबांतील १० हजार ३०७, महाबळेश्वर तालुक्यातील ७३ कुटुंबांतील २६०, जावली तालुक्यातील १ हजार ७५० कुटुंबांतील ७ हजार ६९१ व सातारा तालुक्यातील ४४ कुटुंबांतील २१२ व्यक्ती अशा एकूण ५ हजार ७०३ कुटुंबांतील २६ हजार १२८ व्यक्तींना जिल्हा प्रशासनाकडून अन्नधान्य व केरोसीनचे वाटप सुरू करण्यात आले आहे.

स्वस्तधान्य दुकानदारांना सक्त सूचना पूरबाधित, अतिवृष्टीमुळे भूस्खलनबाधित कुटुंबांना शासन आदेशाप्रमाणे मंजूर केलेले धान्यवाटप करताना कोणत्याही पात्र लाभार्थ्याला डावलले जाऊ नये, यासाठी अत्यंत जबाबदारपणे वाटप करावे. तसेच या कामी तहसीलदार यांनी लक्ष ठेवावे, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या आहेत.

नेत्यांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप

कऱ्हाड तालुक्यात पालकमंत्री बाळासाहेब पाटील, पाटण तालुक्यात गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई, जावली तालुक्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व महाबळेश्वर तालुक्यात आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

फाेटो ओळ : कऱ्हाड तालुक्यामध्ये पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पूरग्रस्तांना मदतीचे वाटप करण्यात आले.