शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

‘अर्जुन पुरस्कार’ मिळविण्याचे बाळगलेले स्वप्न साकार- आदिती स्वामी

By दीपक शिंदे | Updated: December 21, 2023 01:40 IST

जागतिक पातळीवर लौकिक मिळविणारी साताऱ्याची पहिली महिला तिरंदाज

दीपक शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: सातारा तालुक्यातील शेरेवाडी येथील आदिती गोपीचंद स्वामी ही क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च ‘अर्जुन पुरस्कार’ मिळविणारी जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरली. क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अर्जुन पुरस्कार मिळविण्याचे स्वप्न उराशी बाळगून खेळातील वाटचाल सुरू ठेवली होती. ते स्वप्न साकार झाल्याची प्रतिक्रिया आदितीने लोकमतशी बोलताना व्यक्त केली. या यशामुळे सातारा जिल्ह्याच्या लौकिकात भर पडली आहे.

आदिती ही अत्यंत कमी वयात जागतिक पातळीवर सर्वोच्च कामगिरी करणारी खेळाडू आहे. २०२३ मध्ये जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कम्पाऊंड तिरंदाजीमध्ये तिने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. तसेच वरिष्ठ पातळीवरील तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय तिरंदाज ठरली. जागतिक करंडक स्पर्धेत २००६ नंतर सुवर्णपदक मिळवणारी ती सर्वांत लहान वयाची खेळाडू ठरली होती. आदितीने भारताला १४ वर्षांनंतर वर्ल्ड कपमध्ये ७२० पैकी ७११ गुण मिळवून वर्ल्ड रेकॉर्ड करून भारताचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले आहे. भारताला एशियन गेम्स, एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप अशा अनेक स्पर्धांमधून तिने सुवर्णपदके मिळवून दिली आहेत.

माझं स्वप्न होत की, मला ‘अर्जुन’ पुरस्कार घ्यायचाच आहे; पण मला जेव्हा समजले की देशातील खेळाडूंच्यासाठी दिला जाणारा सर्वोत्कृष्ट अर्जुन पुरस्कार मला जाहीर झाला तेव्हा मला खूप आनंद झाला. हा पुरस्कार ज्यांच्यामुळे मला मिळाला, त्यामध्ये तिरंदाजी खेळाचे प्रशिक्षक प्रवीण सावंत आणि माझ्या आई-वडिलांचा खूप मोठा वाटा आहे.-आदिती स्वामी, अर्जुन पुरस्कार विजेती, तिरंदाज

आदिती स्वामीची कामगिरी

  • आशियाई गेम्स २०२२ चीन - १ सुवर्ण, १ कांस्यपदक
  • आशियाई चॅम्पियनशिप बँकॉक - २ सुवर्णपदक
  • युथ चॅम्पियनशिप - आयर्लंड (लीमरिक) २ सुवर्णपदक
  • वर्ल्ड सीनियर चॅम्पियनशिप जर्मनी (बर्लिन) - २ सुवर्णपदक
  • वर्ल्ड कप १ अंटलिया (टर्की)
टॅग्स :Satara areaसातारा परिसर