शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

"५ कोटींच्या बंगल्यात राहणाऱ्या माणसापेक्षा शेतकरी जास्त सुखी"; अभिनेते सयाजी शिंदेंचा नवा उपक्रम

By प्रविण मरगळे | Updated: September 29, 2020 16:48 IST

अभिनेते सयाजी शिंदे यांनी वडगाव दडसवाडा याठिकाणी शहीद जवानांचे कुटुंब आणि ग्रामस्थांसोबत माळरानावर वृक्ष लागवडीचा शुभारंभ केला.

सातारा – आपली ताकद ही स्वच्छ हवेत आहे, आपल्या इथं पूर्वी किती प्रमाणात झाडे होती, आता तेच आपल्याला परत लावायचं आहे असं सांगत प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराईच्या माध्यमातून जय जवान जय किसान ही नवीन संकल्पना राबवली आहे. यात साताऱ्यातील प्रत्येक शहीद जवानाच्या नावाने झाड लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले की, जिथं शेतकरी आहे त्याच्या एवढा ताकदवान कोणी नाही, शेतकऱ्यांची ताकद अजून शेतकऱ्यांना कळत नाही, ५ कोटींच्या बंगल्यात राहणाऱ्या माणसापेक्षा शेतकरी जास्त सुखी आहे. दहा कोटींचा बंगला घेण्यापेक्षा झाड होऊन माळरानावर सावली घ्या. आपल्याला सैनिकांच्या सन्मानासाठी झाडे लावायची आहेत, प्रत्येक लहान झाडाची लहान बाळाप्रमाणे काळजी घ्या असं त्यांनी सांगितले.

तसेच गावात लय राजकारणी, लय पक्ष, मारामाऱ्या, दोन भाव वेगवेगळ्या पक्षाचे असतात यातून बाहेर पडत तुम्ही गावकऱ्यांनी सैनिकांच्या नावे झाडं लावण्याचा ठराव केला तो कौतुकास्पद आहे. मला नेहमी येता येणार नाही, पण वर्षातून एकदा मी येईन तेव्हा सगळ्यांचे वाढदिवस एकत्र साजरे करुया असं आवाहन करत आकाशाला गवसणी घालण्यासाठी पक्षाप्रमाणे वागावं लागतं असं सयाजी शिंदेंनी सांगितले. आज वडगाव दडसवाडा याठिकाणी शहीद जवानांचे कुटुंब आणि ग्रामस्थांनी माळरानावर वृक्ष लागवडीचा शुभारंभ केला. त्यात जांभूळ, चिंच, आवळा यासारखी १ हजार ५०० झाडे लावण्याचा संकल्प अभिनेते सयाजी शिंदे आणि ग्रामस्थांनी केला.

सयाजी शिंदे यांचे वृक्षप्रेम सर्वश्रूत आहे. यापूर्वीही त्यांनी वृक्ष लागवडीबाबत अनेक उपक्रम घेतले आहेत. झाडांचे वाढदिवस साजरे व्हायला हवेत व प्रत्येक गाव, तालुक्यातील सर्वात जुनी झाडे हेच त्या त्या भागातील आपले सेलिब्रेटी आहेत, आईनंतर वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देऊन जगवतात, त्यामुळे आपण सर्वांनी प्रत्येकी पाच झाडे तरी लावून वाढवली पाहिजेत. प्रत्येक शाळेत, संस्थेत वृक्ष बँक सुरू व्हावी. शाळा, कॉलेजच्या अभ्यासक्रमात पर्यावरण विषयाला महत्त्व आले पाहिजे. झाडांचे वाढदिवस साजरे व्हायला हवेत. गेली दोनशे, तीनशे वर्षे आपल्या अनेक पिढ्यांना ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचे आपण ऋणी राहिले पाहिजे. धोरणकर्त्यांनी आता पर्यावरणाची हानी न करणारी धोरणे आखली पाहिजेत. विचार सगळे कपाटात बंद आहेत. आता प्रत्येकाने कृती करण्यास सुरुवात करायला हवी अशाप्रकारे आवाहन सयाजी शिंदे यांनी लोकांना केले आहे.

टॅग्स :sayaji shindeसयाजी शिंदे