शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

"५ कोटींच्या बंगल्यात राहणाऱ्या माणसापेक्षा शेतकरी जास्त सुखी"; अभिनेते सयाजी शिंदेंचा नवा उपक्रम

By प्रविण मरगळे | Updated: September 29, 2020 16:48 IST

अभिनेते सयाजी शिंदे यांनी वडगाव दडसवाडा याठिकाणी शहीद जवानांचे कुटुंब आणि ग्रामस्थांसोबत माळरानावर वृक्ष लागवडीचा शुभारंभ केला.

सातारा – आपली ताकद ही स्वच्छ हवेत आहे, आपल्या इथं पूर्वी किती प्रमाणात झाडे होती, आता तेच आपल्याला परत लावायचं आहे असं सांगत प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराईच्या माध्यमातून जय जवान जय किसान ही नवीन संकल्पना राबवली आहे. यात साताऱ्यातील प्रत्येक शहीद जवानाच्या नावाने झाड लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले की, जिथं शेतकरी आहे त्याच्या एवढा ताकदवान कोणी नाही, शेतकऱ्यांची ताकद अजून शेतकऱ्यांना कळत नाही, ५ कोटींच्या बंगल्यात राहणाऱ्या माणसापेक्षा शेतकरी जास्त सुखी आहे. दहा कोटींचा बंगला घेण्यापेक्षा झाड होऊन माळरानावर सावली घ्या. आपल्याला सैनिकांच्या सन्मानासाठी झाडे लावायची आहेत, प्रत्येक लहान झाडाची लहान बाळाप्रमाणे काळजी घ्या असं त्यांनी सांगितले.

तसेच गावात लय राजकारणी, लय पक्ष, मारामाऱ्या, दोन भाव वेगवेगळ्या पक्षाचे असतात यातून बाहेर पडत तुम्ही गावकऱ्यांनी सैनिकांच्या नावे झाडं लावण्याचा ठराव केला तो कौतुकास्पद आहे. मला नेहमी येता येणार नाही, पण वर्षातून एकदा मी येईन तेव्हा सगळ्यांचे वाढदिवस एकत्र साजरे करुया असं आवाहन करत आकाशाला गवसणी घालण्यासाठी पक्षाप्रमाणे वागावं लागतं असं सयाजी शिंदेंनी सांगितले. आज वडगाव दडसवाडा याठिकाणी शहीद जवानांचे कुटुंब आणि ग्रामस्थांनी माळरानावर वृक्ष लागवडीचा शुभारंभ केला. त्यात जांभूळ, चिंच, आवळा यासारखी १ हजार ५०० झाडे लावण्याचा संकल्प अभिनेते सयाजी शिंदे आणि ग्रामस्थांनी केला.

सयाजी शिंदे यांचे वृक्षप्रेम सर्वश्रूत आहे. यापूर्वीही त्यांनी वृक्ष लागवडीबाबत अनेक उपक्रम घेतले आहेत. झाडांचे वाढदिवस साजरे व्हायला हवेत व प्रत्येक गाव, तालुक्यातील सर्वात जुनी झाडे हेच त्या त्या भागातील आपले सेलिब्रेटी आहेत, आईनंतर वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देऊन जगवतात, त्यामुळे आपण सर्वांनी प्रत्येकी पाच झाडे तरी लावून वाढवली पाहिजेत. प्रत्येक शाळेत, संस्थेत वृक्ष बँक सुरू व्हावी. शाळा, कॉलेजच्या अभ्यासक्रमात पर्यावरण विषयाला महत्त्व आले पाहिजे. झाडांचे वाढदिवस साजरे व्हायला हवेत. गेली दोनशे, तीनशे वर्षे आपल्या अनेक पिढ्यांना ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचे आपण ऋणी राहिले पाहिजे. धोरणकर्त्यांनी आता पर्यावरणाची हानी न करणारी धोरणे आखली पाहिजेत. विचार सगळे कपाटात बंद आहेत. आता प्रत्येकाने कृती करण्यास सुरुवात करायला हवी अशाप्रकारे आवाहन सयाजी शिंदे यांनी लोकांना केले आहे.

टॅग्स :sayaji shindeसयाजी शिंदे