शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

"५ कोटींच्या बंगल्यात राहणाऱ्या माणसापेक्षा शेतकरी जास्त सुखी"; अभिनेते सयाजी शिंदेंचा नवा उपक्रम

By प्रविण मरगळे | Updated: September 29, 2020 16:48 IST

अभिनेते सयाजी शिंदे यांनी वडगाव दडसवाडा याठिकाणी शहीद जवानांचे कुटुंब आणि ग्रामस्थांसोबत माळरानावर वृक्ष लागवडीचा शुभारंभ केला.

सातारा – आपली ताकद ही स्वच्छ हवेत आहे, आपल्या इथं पूर्वी किती प्रमाणात झाडे होती, आता तेच आपल्याला परत लावायचं आहे असं सांगत प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराईच्या माध्यमातून जय जवान जय किसान ही नवीन संकल्पना राबवली आहे. यात साताऱ्यातील प्रत्येक शहीद जवानाच्या नावाने झाड लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले की, जिथं शेतकरी आहे त्याच्या एवढा ताकदवान कोणी नाही, शेतकऱ्यांची ताकद अजून शेतकऱ्यांना कळत नाही, ५ कोटींच्या बंगल्यात राहणाऱ्या माणसापेक्षा शेतकरी जास्त सुखी आहे. दहा कोटींचा बंगला घेण्यापेक्षा झाड होऊन माळरानावर सावली घ्या. आपल्याला सैनिकांच्या सन्मानासाठी झाडे लावायची आहेत, प्रत्येक लहान झाडाची लहान बाळाप्रमाणे काळजी घ्या असं त्यांनी सांगितले.

तसेच गावात लय राजकारणी, लय पक्ष, मारामाऱ्या, दोन भाव वेगवेगळ्या पक्षाचे असतात यातून बाहेर पडत तुम्ही गावकऱ्यांनी सैनिकांच्या नावे झाडं लावण्याचा ठराव केला तो कौतुकास्पद आहे. मला नेहमी येता येणार नाही, पण वर्षातून एकदा मी येईन तेव्हा सगळ्यांचे वाढदिवस एकत्र साजरे करुया असं आवाहन करत आकाशाला गवसणी घालण्यासाठी पक्षाप्रमाणे वागावं लागतं असं सयाजी शिंदेंनी सांगितले. आज वडगाव दडसवाडा याठिकाणी शहीद जवानांचे कुटुंब आणि ग्रामस्थांनी माळरानावर वृक्ष लागवडीचा शुभारंभ केला. त्यात जांभूळ, चिंच, आवळा यासारखी १ हजार ५०० झाडे लावण्याचा संकल्प अभिनेते सयाजी शिंदे आणि ग्रामस्थांनी केला.

सयाजी शिंदे यांचे वृक्षप्रेम सर्वश्रूत आहे. यापूर्वीही त्यांनी वृक्ष लागवडीबाबत अनेक उपक्रम घेतले आहेत. झाडांचे वाढदिवस साजरे व्हायला हवेत व प्रत्येक गाव, तालुक्यातील सर्वात जुनी झाडे हेच त्या त्या भागातील आपले सेलिब्रेटी आहेत, आईनंतर वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देऊन जगवतात, त्यामुळे आपण सर्वांनी प्रत्येकी पाच झाडे तरी लावून वाढवली पाहिजेत. प्रत्येक शाळेत, संस्थेत वृक्ष बँक सुरू व्हावी. शाळा, कॉलेजच्या अभ्यासक्रमात पर्यावरण विषयाला महत्त्व आले पाहिजे. झाडांचे वाढदिवस साजरे व्हायला हवेत. गेली दोनशे, तीनशे वर्षे आपल्या अनेक पिढ्यांना ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचे आपण ऋणी राहिले पाहिजे. धोरणकर्त्यांनी आता पर्यावरणाची हानी न करणारी धोरणे आखली पाहिजेत. विचार सगळे कपाटात बंद आहेत. आता प्रत्येकाने कृती करण्यास सुरुवात करायला हवी अशाप्रकारे आवाहन सयाजी शिंदे यांनी लोकांना केले आहे.

टॅग्स :sayaji shindeसयाजी शिंदे