शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

राज्याभिषेकाकडे सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या नजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 11:11 IST

त्यांचा योग्य तो सन्मान करण्याचा निर्णय पवार घेतील. मात्र, हा सन्मान कधी होतोय आणि सातारा जिल्ह्यातील विकासकामे कधी पूर्ण होतात? याचीच उत्सुकता सातारा जिल्ह्यातील जनतेला लागू राहिलेली आहे.

ठळक मुद्देक-हाडातील कार्यक्रमात त्यांनी आ. बाळासाहेब पाटील यांना मतदारसंघापुरते न ठेवता राज्याच्या सत्तेत नेणार असल्याचे स्पष्ट केले.

सागर गुजर ।सातारा : सध्याच्या राजकीय परिस्थितीत जिल्ह्याला किमान चार मंत्रिपदे मिळतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. वाईचे आमदार मकरंद पाटील, क-हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील आणि पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा आहे. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव झाल्याशिवाय जिल्ह्याच्या मंत्रिपदाचे स्वप्न सत्यात उतरणार नाही. विश्वासदर्शक ठराव कधी होतोय? याकडे जिल्हावासीयांच्या नजरा लागल्या आहेत.

भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेवर आले असते तर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई यांच्या मंत्रिपदावर शिक्कामोर्तब झाले असते. मात्र सत्तास्थापनेच्या काळात राज्याच्या राजकारणाने अनेक हेलकावे खाल्ले. भाजपला सत्तेपासून वंचित राहावे लागले, त्यामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आ. जयकुमार गोरे यांचे स्वप्न भंगले. मात्र शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँगे्रस यांच्या मदतीने सत्ता स्थापन केल्याने आ. शंभूराज देसाई यांना निश्चितपणे मंत्रिपद मिळेल, अशी कार्यकर्त्यांना आशा आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँगे्रस हे दोन्ही पक्ष आता सत्तेत सहभागी झाले आहेत. विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर भर पावसात खासदार शरद पवार यांची भव्य सभा झाली अन् या सभेने निवडणुकीतील रंगच बदलून गेले. संपूर्ण महाराष्ट्रभर या सभेचे पडसाद उमटले आणि राष्ट्रवादी आणि काँगे्रस या दोन्ही पक्षांच्या आमदारांच्या संख्येने मोठी वाढ झाली. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे ४१ आमदार होते, तेच आता ५४ झाले. तर काँग्रेसच्या आमदारांची संख्या ४२ वरून ४४ वर पोहोचली.

जिल्ह्यात आठपैकी ४ जागा राष्ट्रवादी आणि काँगे्रस या दोन्ही पक्षांनी पटकावल्या. बालेकिल्ल्यातील जनतेने राष्ट्रवादीला साथ दिली. त्याचबरोबर पवारांचे हात बळकट केले. त्यामुळे साताºयाचा यथोचित सन्मान करण्याचा निर्धार पवारांनी केला. क-हाडातील कार्यक्रमात त्यांनी आ. बाळासाहेब पाटील यांना मतदारसंघापुरते न ठेवता राज्याच्या सत्तेत नेणार असल्याचे स्पष्ट केले. तर राष्ट्रवादी-काँगे्रस आघाडीची सत्ता येण्याची धूसर कल्पना नसतानाही आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील आणि आ. दीपक चव्हाण हे तिघेजण राष्ट्रवादीत पाय रोवून राहिले. साहजिकच, या आमदारांविषयी पवारांना आत्मीयता आणि जिव्हाळा आहे.

त्यांचा योग्य तो सन्मान करण्याचा निर्णय पवार घेतील. मात्र, हा सन्मान कधी होतोय आणि सातारा जिल्ह्यातील विकासकामे कधी पूर्ण होतात? याचीच उत्सुकता सातारा जिल्ह्यातील जनतेला लागू राहिलेली आहे.

  • बाबांच्या नावाची केवळ घोषणाच बाकी

माजी मुख्यमंत्री आणि काँगे्रसचे अभ्यासू नेते पृथ्वीराज चव्हाण हे कºहाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत. मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी कºहाड जिल्हा करण्याच्या हालचाली केल्या होत्या. जिल्ह्याच्या अनुषंगाने लागणारी प्रशासकीय इमारत, भूकंप संशोधन केंद्र, पोलिसांची आधुनिक वसाहत त्यांनी कºहाडात उभारली होती. कºहाड जिल्ह्याची जणू घोषणाच बाकी होती. आता पृथ्वीराज चव्हाण यांना राज्याच्या सत्तेत महत्त्वाचे पद मिळणार, याची खात्री  असल्याने  क-हाडकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यांना मानाचे पद मिळणार असून, त्याची घोषणा ऐकण्याकडे  क-हाडकरांचे कान लागले आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर