शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

राज्याभिषेकाकडे सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या नजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 11:11 IST

त्यांचा योग्य तो सन्मान करण्याचा निर्णय पवार घेतील. मात्र, हा सन्मान कधी होतोय आणि सातारा जिल्ह्यातील विकासकामे कधी पूर्ण होतात? याचीच उत्सुकता सातारा जिल्ह्यातील जनतेला लागू राहिलेली आहे.

ठळक मुद्देक-हाडातील कार्यक्रमात त्यांनी आ. बाळासाहेब पाटील यांना मतदारसंघापुरते न ठेवता राज्याच्या सत्तेत नेणार असल्याचे स्पष्ट केले.

सागर गुजर ।सातारा : सध्याच्या राजकीय परिस्थितीत जिल्ह्याला किमान चार मंत्रिपदे मिळतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. वाईचे आमदार मकरंद पाटील, क-हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील आणि पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा आहे. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव झाल्याशिवाय जिल्ह्याच्या मंत्रिपदाचे स्वप्न सत्यात उतरणार नाही. विश्वासदर्शक ठराव कधी होतोय? याकडे जिल्हावासीयांच्या नजरा लागल्या आहेत.

भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेवर आले असते तर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे आणि शंभूराज देसाई यांच्या मंत्रिपदावर शिक्कामोर्तब झाले असते. मात्र सत्तास्थापनेच्या काळात राज्याच्या राजकारणाने अनेक हेलकावे खाल्ले. भाजपला सत्तेपासून वंचित राहावे लागले, त्यामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आ. जयकुमार गोरे यांचे स्वप्न भंगले. मात्र शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँगे्रस यांच्या मदतीने सत्ता स्थापन केल्याने आ. शंभूराज देसाई यांना निश्चितपणे मंत्रिपद मिळेल, अशी कार्यकर्त्यांना आशा आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँगे्रस हे दोन्ही पक्ष आता सत्तेत सहभागी झाले आहेत. विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच साताऱ्यातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर भर पावसात खासदार शरद पवार यांची भव्य सभा झाली अन् या सभेने निवडणुकीतील रंगच बदलून गेले. संपूर्ण महाराष्ट्रभर या सभेचे पडसाद उमटले आणि राष्ट्रवादी आणि काँगे्रस या दोन्ही पक्षांच्या आमदारांच्या संख्येने मोठी वाढ झाली. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे ४१ आमदार होते, तेच आता ५४ झाले. तर काँग्रेसच्या आमदारांची संख्या ४२ वरून ४४ वर पोहोचली.

जिल्ह्यात आठपैकी ४ जागा राष्ट्रवादी आणि काँगे्रस या दोन्ही पक्षांनी पटकावल्या. बालेकिल्ल्यातील जनतेने राष्ट्रवादीला साथ दिली. त्याचबरोबर पवारांचे हात बळकट केले. त्यामुळे साताºयाचा यथोचित सन्मान करण्याचा निर्धार पवारांनी केला. क-हाडातील कार्यक्रमात त्यांनी आ. बाळासाहेब पाटील यांना मतदारसंघापुरते न ठेवता राज्याच्या सत्तेत नेणार असल्याचे स्पष्ट केले. तर राष्ट्रवादी-काँगे्रस आघाडीची सत्ता येण्याची धूसर कल्पना नसतानाही आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील आणि आ. दीपक चव्हाण हे तिघेजण राष्ट्रवादीत पाय रोवून राहिले. साहजिकच, या आमदारांविषयी पवारांना आत्मीयता आणि जिव्हाळा आहे.

त्यांचा योग्य तो सन्मान करण्याचा निर्णय पवार घेतील. मात्र, हा सन्मान कधी होतोय आणि सातारा जिल्ह्यातील विकासकामे कधी पूर्ण होतात? याचीच उत्सुकता सातारा जिल्ह्यातील जनतेला लागू राहिलेली आहे.

  • बाबांच्या नावाची केवळ घोषणाच बाकी

माजी मुख्यमंत्री आणि काँगे्रसचे अभ्यासू नेते पृथ्वीराज चव्हाण हे कºहाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत. मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी कºहाड जिल्हा करण्याच्या हालचाली केल्या होत्या. जिल्ह्याच्या अनुषंगाने लागणारी प्रशासकीय इमारत, भूकंप संशोधन केंद्र, पोलिसांची आधुनिक वसाहत त्यांनी कºहाडात उभारली होती. कºहाड जिल्ह्याची जणू घोषणाच बाकी होती. आता पृथ्वीराज चव्हाण यांना राज्याच्या सत्तेत महत्त्वाचे पद मिळणार, याची खात्री  असल्याने  क-हाडकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यांना मानाचे पद मिळणार असून, त्याची घोषणा ऐकण्याकडे  क-हाडकरांचे कान लागले आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर