शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
4
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
5
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
6
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
7
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
8
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
9
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
10
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
11
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
12
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
14
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
15
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
16
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
17
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
18
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
19
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
20
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...

साताऱ्यात विनाकारण फिरणाऱ्या १० दुचाकीस्वारांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:42 IST

सातारा : कोरोना महामारीत विनाकारण दुचाकी फिरवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर, शाहूपुरी, सातारा तालुका पोलिसांनी १० दुचाकीस्वारांवर ...

सातारा : कोरोना महामारीत विनाकारण दुचाकी फिरवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर, शाहूपुरी, सातारा तालुका पोलिसांनी १० दुचाकीस्वारांवर कारवाई केली आहे.

कोविडचा संसर्ग वाढू नये म्हणून सातारा जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. असे असतानाही बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात दुचाकी चालवून आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गोविंद शेखर झडगे (वय २१, रा. लक्ष्मी टेकडी, सदर बझार, सातारा), बाळकृष्ण गुलाब साळुंखे (४५, रा. कुशी, ता. सातारा) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार पोलीस हवालदार सतीश साबळे यांनी दिली असून, अधिक तपास पोलीस हवालदार पी. एल. भिसे करीत आहेत.

पोवई नाका परिसरात विनाकारण दुचाकी फिरविणाऱ्या लक्ष्मण भिकू जाधव (२९, रा. कामाठीपुरा मठाजवळ, ता. सातारा), शेखर गुलाबराव मोरे (३८, रा. १९९, पाण्याच्या टाकीजवळ, गोडोली, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार पोलीस हवालदार संतोष इष्टे यांनी दिली असून, अधिक तपास पोलीस नाईक आर. व्ही. घाडगे करीत आहेत.

पोवई नाका परिसरात विनाकारण दुचाकी फिरवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी किरण दत्तात्रय गोडसे (३०, रा. जनाई मळाई मंदिर, खिंडवाडी, ता. सातारा), उमेश शांताप्पा कैनूर (३९, रा. लक्ष्मी मंदिराजवळ, लक्ष्मी टेकडी, सातारा), सुजाता धनंजय देगांवकर (४०, रा. कुंभारवाडा, केसरकर पेठ, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार पोलीस नाईक सचिन पोळ यांनी दिली असून, अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत.

बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात विनाकारण दुचाकी फिरविणाऱ्या अमृत अर्जुन कुंभार (३१, रा. आदित्यनगर, सातारा), साहिल इन्नुस आत्तार (२६, रा. शेंद्रे, ता. सातारा), सागर बाबासोा फरांदे (२७) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार पोलीस नाईक अब्दुल खलिफा यांनी दिली असून अधिक तपास पोलीस नाईक आर. व्ही. घाडगे करीत आहेत.

चौकट : तरुण मुले पडताहेत घराबाहेर

शहरामध्ये विनाकारण फिरू नका, असे पोलीस वारंवार लोकांना सांगत आहेत; मात्र तरीसुद्धा अनेकजण पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत आहेत. विशेषत: तरुण मुले काहीही काम नसताना घराबाहेर पडत आहेत. अशा मुलांवर नाइलाजास्तव कारवाई करावी लागत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.