शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

रोजगाराच्या प्रश्नावर कृती हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 22:52 IST

सागर गुजर । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : लोकसभा निवडणुकीत स्थानिक बेरोजगारी, उद्योगांची सुरक्षितता आदी मुद्दे चर्चेला आले आहेत. ...

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : लोकसभा निवडणुकीत स्थानिक बेरोजगारी, उद्योगांची सुरक्षितता आदी मुद्दे चर्चेला आले आहेत. हेच मुद्दे निवडणुकीनंतरही तितक्याच तडफेने मांडून जिल्ह्यातील बेरोजगारी हद्दपार करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा जिल्ह्यातील स्थानिक जनतेची आहे.साताऱ्यातील विविध शासकीय, खासगी आयटीआय तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयांतून कुशल मनुष्यबळ तयार होते. मात्र, त्यांना अपेक्षित पगाराची नोकरी मिळविण्यासाठी पुणे अथवा मुंबई गाठावी लागते. अनेकजण बेंगलोरलाही जातात, काहीजण परदेशात जाऊन नोकरी करत तिथंच स्थायिक होताना दिसतात. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे पाहायला मिळते.सातारा शहरासह इतर शहरे व गावांमध्ये सहज जरी फेरफटका मारला तरी तरुण कमी आणि वयस्कर लोकच जास्त पाहायला मिळतात. स्थानिक तरुण नोकरीनिमित्त सातारा जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात गेलेला असतो. गावात अपेक्षित रोजगार मिळत नसल्याने सातारा, वाई, फलटण, शिरवळ, लोणंद, कºहाड येथील औद्योगिक वसाहतीत अल्प मोबदल्यात काम करणारे अनेक तरुण आपण पाहतो. मात्र, त्यापुढे जाऊन भविष्याचा विचार करून पुणे-मुंबईत राहून नोकरी करणाऱ्यांची संख्या वाढली असल्याने गावे ओस पडलेली पाहायला मिळतात.शेतीमधील उत्पादनांना हमी भाव मिळाला तर स्थानिक शहरात नोकरी करून गावातील शेतीकडेही तरुणांना लक्ष देता येईल, मात्र तसे होत नाही. लोकप्रतिनिधींनी या समस्या ओळखून योजनांची अंमलबजावणी करावी, अशी तरुणांची अपेक्षा आहे. त्याबरोबरच उद्योजकांना सुरक्षित वातावरण मिळाले तर उद्योग वाढून रोजगार निर्मिती होईल, अशी अपेक्षा उद्योजकांची आहे.बेरोजगार तरुणांना काय हवे?1मुले-मुली तांत्रिक शिक्षण घेतात, मात्र त्यांना रोजगार देण्याच्या बाबतीत सातारा शहरात मर्यादा येताना दिसतात. त्यामुळे पुणे-मुंबईतल्या नोकºया साताºयात मिळाल्या पाहिजेत.2सातारा शहराच्या १६ ते २० किलोमीटर परिघात मोठे उद्योग येणे गरजेचे आहे. साताºयातील विशाल औद्योगिक वसाहतीचा विकास झाला पाहिजे.3 आयटीआय किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयातून कॅम्पस इंटरव्ह्यूतून उत्तम पगाराची कायमस्वरुपी नोकरी मिळावी.रोजगाराचा लेखाजोखारोजगार कार्यालयातील नोंदीनुसार पाच वर्षांत ७४ हजार ४९८ बेरोजगारांची नोंद आहे. त्यामध्ये ३१ हजार ८८८ लोकांना पाच वर्षांच्या काळात रोजगार उपलब्ध झाला.उद्योजकांच्या या आहेत अपेक्षा1उद्योजकांना सुरक्षित वातावरण असणे गरजेचे आहे. खंडणीखोर लोकांवर पोलीस यंत्रणा तसेच लोकप्रतिनिधींनीही वचक ठेवावा.2औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची दुरुस्ती वेळच्यावेळी होणे गरजेचे आहे. आर्थिक मंदीच्या काळात कामगार आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्यांनीही कंपनीला सहकार्य करणे गरजेचे आहे.3 तांत्रिक ज्ञान असणाºया तरुण-तरुणींना नोकरी देण्यात अडचणी येत नाहीत, कारण कामाच्या पहिल्या दिवसापासूनच हे लोक संबंधित संस्थेला फायद्याचे ठरतात.