शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

रहिमतपुरात मास्क न घालणाऱ्यांवर कारवाईचा दंडुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:41 IST

रहिमतपूर : रहिमतपुरात पोलिसांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दुचाकींवर विनामास्क फिरणाऱ्या व दुकानामध्ये सोशल डिस्टन्स न ठेवणाऱ्या दुकानदारावर दंडात्मक कारवाई ...

रहिमतपूर : रहिमतपुरात पोलिसांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दुचाकींवर विनामास्क फिरणाऱ्या व दुकानामध्ये सोशल डिस्टन्स न ठेवणाऱ्या दुकानदारावर दंडात्मक कारवाई करून, ५० हजार ४०० रुपये वसूल केले आहेत.

कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरासह जिल्हाभर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी इतर प्रशासकीय यंत्रणेबरोबर पोलीस दलही ठोस पावले उचलत आहे.

विनामास्क दुचाकींवर फिरून कोरोना विषाणूला आमंत्रण देणाऱ्या वाहन चालकांमुळे संसर्ग वाढत आहे, तसेच दुकानासमोर सोशल डिस्टन्स न ठेवल्याने गर्दी होऊन मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांनी गेल्या दहा दिवसांत रहिमतपूर येथील गांधी चौक, बस स्थानक परिसर, चांदणी चौक, आदर्श शाळा चौक, कोरेगाव चौक आदी ठिकाणी फिरणाऱ्या २१२ वाहन चालकांकडून प्रत्येकी दोनशे रुपये याप्रमाणे ४२ हजार ४०० रु. दंड वसूल केला, तर ८ दुकानदारांवरही कारवाई करून प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे ८ हजार रुपये दंड वसूल केला.

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. मात्र, शासकीय आदेशाचे उल्लंघन केले जात असल्यामुळे दंडात्मक कारवाई केली जात आहे. अत्यंत गरजेच्या कामासाठी बाहेर पडताना तोंडाला सर्वांनी मास्क लावणे गरजेचे आहे, तसेच दुकानांसमोर सोशल डिस्टन्स पाळून उभे राहावे. स्वत:ची काळजी स्वत:च घ्या, अन्यथा शासकीय आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा रहिमतपूरचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश कड यांनी दिला आहे.