शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्याची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:24 IST

सातारा : दहावी निकाल ऑनलाइन प्रसिद्ध झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना लवकरच गुणपत्रक मिळणार आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाची उत्सुकता लागली आहे. ...

सातारा : दहावी निकाल ऑनलाइन प्रसिद्ध झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना लवकरच गुणपत्रक मिळणार आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाची उत्सुकता लागली आहे. अकरावी प्रवेशासाठी आपल्या इच्छित महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी काही विद्यार्थी प्रयत्नशील आहेत, तर काहींनी सीईटीनंतर प्रवेश निश्चित करण्याचे ठरवले आहे.

दहावीचा निकाल लागल्यानंतर, महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये दांडगा उत्साह पाहायला मिळत आहे. कोविडमुळे घराबाहेर न पडलेले अनेक विद्यार्थी महाविद्यालय प्रवेशाची माहिती घेणे, कागदपत्रे गोळा करणे, अर्ज आणण्याचे कारण सांगून घराबाहेर पडू लागले आहेत.

निकाल लागल्यानंतर आठवड्याच्या आतच सीईटी प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरून घेतले जाणार आहेत. २१ ऑगस्ट रोजी ही सीईटी परीक्षा होणार आहे. सीईटी परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे या चार विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. त्यामध्ये चार विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असणार आहेत. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध आहे. फॉर्म भरण्याची मुदत २६ जुलैपर्यंत आहे.

महिन्यातच सीईटी!

दहावीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना मागील गुणांच्या आधारावर उत्तीर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे दहावीतील अभ्यास अभ्यासक्रम आपल्याला किती स्मरतोय, हे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सीईटीचा पर्याय निवडला आहे. बोर्डाने सरसकट उत्तीर्ण केलं असलं, तरीही आपल्या अभ्यासाची पातळी समजण्यासाठी ही सीईटी आत्मपरीक्षण करणारी परीक्षा ठरणार आहे.