शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्याची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:24 IST

सातारा : दहावी निकाल ऑनलाइन प्रसिद्ध झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना लवकरच गुणपत्रक मिळणार आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाची उत्सुकता लागली आहे. ...

सातारा : दहावी निकाल ऑनलाइन प्रसिद्ध झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना लवकरच गुणपत्रक मिळणार आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाची उत्सुकता लागली आहे. अकरावी प्रवेशासाठी आपल्या इच्छित महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी काही विद्यार्थी प्रयत्नशील आहेत, तर काहींनी सीईटीनंतर प्रवेश निश्चित करण्याचे ठरवले आहे.

दहावीचा निकाल लागल्यानंतर, महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये दांडगा उत्साह पाहायला मिळत आहे. कोविडमुळे घराबाहेर न पडलेले अनेक विद्यार्थी महाविद्यालय प्रवेशाची माहिती घेणे, कागदपत्रे गोळा करणे, अर्ज आणण्याचे कारण सांगून घराबाहेर पडू लागले आहेत.

निकाल लागल्यानंतर आठवड्याच्या आतच सीईटी प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरून घेतले जाणार आहेत. २१ ऑगस्ट रोजी ही सीईटी परीक्षा होणार आहे. सीईटी परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्रे या चार विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. त्यामध्ये चार विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असणार आहेत. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध आहे. फॉर्म भरण्याची मुदत २६ जुलैपर्यंत आहे.

महिन्यातच सीईटी!

दहावीची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना मागील गुणांच्या आधारावर उत्तीर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे दहावीतील अभ्यास अभ्यासक्रम आपल्याला किती स्मरतोय, हे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी सीईटीचा पर्याय निवडला आहे. बोर्डाने सरसकट उत्तीर्ण केलं असलं, तरीही आपल्या अभ्यासाची पातळी समजण्यासाठी ही सीईटी आत्मपरीक्षण करणारी परीक्षा ठरणार आहे.