शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आबासाहेब वीर यांचा स्वराज्याचे सुराज्य करण्यात मोलाचा वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:24 IST

वाई : ‘देशभक्त किसन वीर यांनी देशाला पारतंत्र्यातून मुक्त करणाऱ्या स्वातंत्र्य चळवळीचे जिल्ह्यात नेतृत्व केले होते. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात ...

वाई : ‘देशभक्त किसन वीर यांनी देशाला पारतंत्र्यातून मुक्त करणाऱ्या स्वातंत्र्य चळवळीचे जिल्ह्यात नेतृत्व केले होते. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात स्वराज्याचे सुराज्य व्हावे म्हणून विविध सामाजिक व शैक्षणिक सुधारणांसाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांचे आचार-विचार नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना दिशादर्शक ठरत आहेत,’ असे प्रतिपादन आमदार मकरंद पाटील यांनी केले.

येथील पंचायत समितीच्या सभागृहात देशभक्त किसन वीर यांच्या जयंती समारंभात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, शारदा ननावरे, संगीता मस्कर, रंजना डगळे, नगराध्यक्ष अनिल सावंत, महादेव मस्कर, दिलीप बाबर, सत्यजित वीर, कांतीलाल पवार, लक्ष्मण पिसाळ, शशिकांत पवार, रमेश गायकवाड, राजाभाऊ सोनावणे, चरण गायकवाड, प्रदीप जायगुडे, अमोल कदम, कुमार जगताप यांची उपस्थिती होती. यावेळी निवृत्त शिक्षक, गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. गटशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी याच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘माझे घर - गाव व माझी शाळा’ या भित्तिपत्रकांचे प्रकाशन करण्यात आले.

पाटील म्हणाले, ‘किसन वीर आबाचे व्यक्तिमत्त्व साधी राहणी, स्वच्छ चारित्र्य, शिस्त व करारीपणा असे होते. त्यांनी

सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून दूरदुष्टीचे समाजकारण व राजकारण केले. शेतीला पाणी मिळावे यासाठी धोम धरण तसेच जिल्हा बँक, साखर कारखाना, जनता व यशवंत शिक्षण संस्था तसेच विविध सहकारी संस्थांची उभारणी केली.

प्रतापराव भोसले, लक्ष्मण पाटील, मदन पिसाळ, के. बी. जमदाडे यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते घडविले. जिल्हा बँकेचा कारभार करताना आबांनी लावलेली आर्थिक शिस्त व शिकवण यामुळे आज बँकेला नाबार्ड व बॅंकिंग क्षेत्रातील अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांचे ऋण कधीही विसरता कामा नये. आजच्या पिढीला राजकारण व समाजकारण काय हे समजले पाहिजे. त्यासाठी आबांचे विचार मार्गदर्शक ठरतील. स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य संस्थामधील पदे ही केवळ मिरविण्यासाठी किंवा उपभोग घेण्यासाठी नसतात, तर त्याचा वापर समाजातील गोरगरीब, उपेक्षित व सर्वसामान्यांच्या हितासाठी झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.

सदस्य अनिल जगताप, मधुकर भोसले, सुनीता कांबळे, रजनी भोसले, प्रभारी गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले, गटशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी, साईनाथ वाळेकर यांनी स्वागत केले. सभापती संगीता चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. विठ्ठल माने यांदर सूत्रसंचालन केले. उपसभापती विक्रांत उर्फ भैेया डोंगरे यांनी आभार मानले.