शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

कोयनेच्या आपात्कालीन झडपेतून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा जलाशय, वीजगृहाला धोका नाही!

By दीपक शिंदे | Updated: November 8, 2022 20:30 IST

कोयना जलविद्युत टप्पा: सर्ज विहिरीची लवकरच दुरुस्ती करण्याची आवश्यकता

दीपक शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: कोयना जलविद्युत टप्पा क्र. १ व २ च्या आपत्कालीन झडप भुयार येथील भिंतीमधून व छतामधून पाण्याची गळती होत आहे. मात्र, यामुळे घाबरून न जाता ही गळती बोगद्याच्या सर्ज वेलला तडे गेल्यामुळे होत असून त्यामुळे घाबरून जाऊ नये. यामुळे धरणाच्या जलाशय, वीजगृह किंवा डोंगराला कोणताही धोका नसल्याची माहिती जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव दीपक मोडक यांनी दिली आहे.

मोडक यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, कोयना प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याकरिता विद्युत निर्मितीसाठी जे पाणी नवजा टॉवरमधून अधिजल भुयार किंवा हेड रेस टनेलमार्गे निघते त्या बोगद्याच्या शेवटी एक उल्लोळ विहीर किंवा सर्ज वेल बांधलेली आहे. या विहिरीपासून पुढे दाब बोगद्यातून पाणी वीजगृहाकडे जातं. ही सर्ज वेल १९६० साली बांधून पूर्ण झाली असून ती कातळात १०० मीटर खोल आणि २२ ते २५ मीटर व्यास असलेली आहे. त्याला अर्ध्या मीटर रुंदीचं काँक्रीट अस्तरीकरण केलेलं आहे. ही विहीर गेली साठ वर्षं तिथे असून तिने अनेक भूकंपाचे धक्के पचवलेले आहेत. मात्र, आता काही ठिकाणी अस्तरीकरणाला तडे गेल्यामुळे सर्ज वेल मधून हे झिरपलेलं पाणी इमर्जन्सी व्हॉल्व्ह टनेल किंवा आपत्कालीन झडपद्वारे भुयारामध्ये जातं आणि तिथून ते वाहत डोंगराच्या उतारावरून बाहेर पडतं.या पाण्याचा वीजगृहाला, जलाशयाला किंवा डोंगराला कोणताही धोका नाही. दुरुस्तीसाठी वीजनिर्मिती बंद ठेवावी लागेल. सद्यस्थितीमध्ये ही गळतीचे अण्वेषण झालेले असून यासाठी गळती बंद करण्याची उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. सध्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्याठिकाणी जाऊन दुरुस्ती करता येणार नाही. मात्र, उन्हाळ्यात महाजनको आणि जलसंपदा विभागाने ही दुरुस्ती करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली आहे.

डोंगरातून ३ घनफूट प्रति सेकंद वाहते पाणी- सर्ज वेलला तडे गेल्याने त्यातून झिरपलेले पाणी हे डोंगरातून बाहेर पडत आहे. हे पाणी ३ घनफूट प्रति सेकंद वेगाने बाहेर पडत असून त्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. ही गळती ६० वर्षांनंतर समोर आली आहे. त्यामुळे ती दुरुस्त करण्यात आल्यानंतर पाणी बंद होईल, असा विश्वासही मोडक यांनी व्यक्त केला आहे.