शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

कोयनेच्या आपात्कालीन झडपेतून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा जलाशय, वीजगृहाला धोका नाही!

By दीपक शिंदे | Updated: November 8, 2022 20:30 IST

कोयना जलविद्युत टप्पा: सर्ज विहिरीची लवकरच दुरुस्ती करण्याची आवश्यकता

दीपक शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: कोयना जलविद्युत टप्पा क्र. १ व २ च्या आपत्कालीन झडप भुयार येथील भिंतीमधून व छतामधून पाण्याची गळती होत आहे. मात्र, यामुळे घाबरून न जाता ही गळती बोगद्याच्या सर्ज वेलला तडे गेल्यामुळे होत असून त्यामुळे घाबरून जाऊ नये. यामुळे धरणाच्या जलाशय, वीजगृह किंवा डोंगराला कोणताही धोका नसल्याची माहिती जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव दीपक मोडक यांनी दिली आहे.

मोडक यांनी याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, कोयना प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याकरिता विद्युत निर्मितीसाठी जे पाणी नवजा टॉवरमधून अधिजल भुयार किंवा हेड रेस टनेलमार्गे निघते त्या बोगद्याच्या शेवटी एक उल्लोळ विहीर किंवा सर्ज वेल बांधलेली आहे. या विहिरीपासून पुढे दाब बोगद्यातून पाणी वीजगृहाकडे जातं. ही सर्ज वेल १९६० साली बांधून पूर्ण झाली असून ती कातळात १०० मीटर खोल आणि २२ ते २५ मीटर व्यास असलेली आहे. त्याला अर्ध्या मीटर रुंदीचं काँक्रीट अस्तरीकरण केलेलं आहे. ही विहीर गेली साठ वर्षं तिथे असून तिने अनेक भूकंपाचे धक्के पचवलेले आहेत. मात्र, आता काही ठिकाणी अस्तरीकरणाला तडे गेल्यामुळे सर्ज वेल मधून हे झिरपलेलं पाणी इमर्जन्सी व्हॉल्व्ह टनेल किंवा आपत्कालीन झडपद्वारे भुयारामध्ये जातं आणि तिथून ते वाहत डोंगराच्या उतारावरून बाहेर पडतं.या पाण्याचा वीजगृहाला, जलाशयाला किंवा डोंगराला कोणताही धोका नाही. दुरुस्तीसाठी वीजनिर्मिती बंद ठेवावी लागेल. सद्यस्थितीमध्ये ही गळतीचे अण्वेषण झालेले असून यासाठी गळती बंद करण्याची उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. सध्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्याठिकाणी जाऊन दुरुस्ती करता येणार नाही. मात्र, उन्हाळ्यात महाजनको आणि जलसंपदा विभागाने ही दुरुस्ती करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली आहे.

डोंगरातून ३ घनफूट प्रति सेकंद वाहते पाणी- सर्ज वेलला तडे गेल्याने त्यातून झिरपलेले पाणी हे डोंगरातून बाहेर पडत आहे. हे पाणी ३ घनफूट प्रति सेकंद वेगाने बाहेर पडत असून त्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. ही गळती ६० वर्षांनंतर समोर आली आहे. त्यामुळे ती दुरुस्त करण्यात आल्यानंतर पाणी बंद होईल, असा विश्वासही मोडक यांनी व्यक्त केला आहे.